शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
11
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
12
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
13
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
14
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
15
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
16
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
17
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
18
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
19
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
20
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू

३५ टक्के पावसाची तूट, जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर सरासरीचा अवघा ३१ टक्के पाऊस, प्रशासन उदासीन, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST

एकूण पावसाचा अंदाज, खरिपाची स्थिती याचा अभ्यास करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाला भाग पाडणे ...

एकूण पावसाचा अंदाज, खरिपाची स्थिती याचा अभ्यास करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाला भाग पाडणे आवश्यक असताना केवळ राजकीय वर्चस्वाचा खेळ खेळला जात आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी डीपीडीसीमध्ये दुष्काळी जिल्ह्याचा ठराव करावा, अशी मागणी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे केले होती. परंतु डीपीडीसीमध्ये साधी चर्चाही झाली नाही. त्यानंतर भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु प्रशासकीय पातळीवर उदासीनता असल्याचे चित्र आहे. कुठल्या मुहूर्ताची वाट पाहिली जात आहे? असा प्रश्न शेतकरी व सर्वसामान्य जिल्हावासीयांना पडला आहे.

कृषी विभागाने डीपीडीसीच्या बैठकीत १८ तारखेपासून जिल्ह्यात पावसाचा अंदाज असल्याने तोपर्यंत थांबा आणि वाट पहा असे म्हटले होते. आता कृषी विभाग किती आणि कोणती वाट पहावयास लावणार आहे? असा संतप्त प्रश्नही विचारला जात आहे. कृषी विभागाचे आतापर्यंंतचे पावसाचे सर्वच अंदाज फेल गेलेले आहेत. त्यामुळे आतातरी शेतकऱ्यांचा बाजूचा विचार व्हावा अशी अपेक्षाही शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.