शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

तळोद्यात वराहांच्या मृत्यूचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 14:58 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  गेल्या आठ, १० दिवसांपासून शहरातील सर्वच भागात वराहांचा रोजच अचानक मृत्यू होत असल्याच्या ...

  लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  गेल्या आठ, १० दिवसांपासून शहरातील सर्वच भागात वराहांचा रोजच अचानक मृत्यू होत असल्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. तीन दिवसांपूर्वी म्हणजे एकाच दिवशी तब्बल ४० मेलेले वराह पालिका सफाई कामगारांनी उचलल्याचेदेखील सांगितले जात आहे. वराह मृत्यूच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पालिका व पशुसंवर्धन विभागाने ठोस प्रयत्न  करावे, अशी नागरिकांची मागणी  आहे. तळोदा शहरात वराहांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे वराह सर्वच भागात मोकाट फिरत असतात. साहजिकच त्यांचा उपद्रवामुळे शहरातील रहिवाशी अतिशय त्रस्त झाले आहे. त्यांच्या बंदोबस्ताबाबत सातत्याने मागणी होवूनही ठोस अशी कार्यवाही होत नाही. त्यामुळे वराहांची संख्या वाढत आहे. आता तर गेल्या आठ दिवसांपासून शहरातील सर्वच भागात अचानक चालता, चालता हे वराह खाली पडतात. आणि झोपेत मारतात, असे नागरीक सांगतात. त्यांचा अशा अचानक मृत्यूमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. एवढेच नव्हे त्यांचा दुर्गंधीमुळे अक्षरशः हैराण झाले आहे. जो पावेतो पालिका कर्मचारी येत नाही तो पावेतो रहिवाशांना दुर्गंधी सहन करावी लागत असते. या मेलेल्या वराहांचे मोकाट कुत्रे लचके तोडून इतरत्र फेकत असतात.पालिका सफाई कर्मचारी मेलेले वराह उचलून, उचलून अक्षरशः हैराण झाल्याचे कामगार सांगतात. एकाच दिवशी तब्बल ४० मेलेले वराह उचलल्याचे सांगण्यात आले.            वास्तविक एवढ्या मोठ्या संख्येने रोज वराह मरत असताना त्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस प्रयत्न केले जात नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वराहांचा अशा अचानक मृत्यूच्या कारणाबाबत येथील पशु वैद्यकीय अधिकारींना विचारले                  असता सद्या वातावरणातील बदलांमुळे ताप, न्युमोनिया अथवा भुखमारीमुळे वराहांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. आधीच कोरोनाच्या लाटमुळे नागरिकांमध्ये अजूनही दहशत आहे. त्यात               वरहांच्या मृत्यूचा घटनेने भर टाकली आहे. वराहांचा वाढता उपद्रवाबाबत पालिकेने ठोस कार्यवाही हाती            घ्यावी अशी नागरिकांची मागणी       आहे.