शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रस्त्याला लागून भगदाड पडल्याने धोकादायक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

सारंगखेडा-कहाटूळ रस्त्यावरील पांढरी तलावाजवळ पावसाच्या पाण्याने रस्त्याला भगदाड पडल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी संबंधित विभागाने ...

सारंगखेडा-कहाटूळ रस्त्यावरील पांढरी तलावाजवळ पावसाच्या पाण्याने रस्त्याला भगदाड पडल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी संबंधित विभागाने त्वरित संरक्षक भिंत बांधण्याची मागणी सारंगखेडा, कळंबू, पुसनद परिसरातील वाहनधारक, नागरिक व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अनरद ते कळंबू व सारंगखेडा ते न्यू असलोद हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आला आहे. भगदाड पडलेल्या ठिकाणी चौफुली असून, याठिकाणी कळंबूवरून पुसनदकडे जाणारी त्याचबरोबर सारंगखेडाकडून कहाटूळकडे येणारी व जाणारी वाहने यांची मोठी वर्दळ असते. नेमक्या याच चौफुलीवर रस्त्याला लागून मोठे भगदाड पडल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून याठिकाणी संबंधित विभागाने तत्काळ संरक्षक भिंत बांधून पुढे होणारा अनर्थ टाळावा. या रस्त्यावर परिसरातील शेतकऱ्यांचीही मोठी वर्दळ असते. म्हणून येथे त्वरित संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी सारंगखेडा, पुसनद, कहाटूळ, कळंबू व परिसरातील शेतकरी, नागरिक व वाहनधारक करीत आहेत. या दोन्ही रस्त्यांचा सर्व्हे करताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याठिकाणची परिस्थिती लक्षात आली नसावी का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.