शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

मोकाट गुरांमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 13:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद :  शहादा तालुक्यातील म्हसावद गावात व गावालगत मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे व वराहांचा त्रास ग्रामस्थांसह ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद :  शहादा तालुक्यातील म्हसावद गावात व गावालगत मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे व वराहांचा त्रास ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना होत असून, शेतात नुकसानही होत आहे. म्हसावद गावालगत असलेल्या पिंपरी येथील शेतकऱ्याच्या चार एकर उसापैकी चक्क दीड एकर ऊस या मोकाट गुरांनी फस्त करून नुकसान केले आहे. ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाने यावर उपाययोजना करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.म्हसावद गावालगत असलेल्या केळी व उसाच्या शेतात वराहांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. केळीच्या शेताला चोहोबाजूने तारेची जाळी बसवून कुंपण केले आहे. तरीही जाळी वाकवून खालून वराह घुसतात. काही वराहांचा मुक्काम तर उसाच्या शेतातच असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी करावे तरी काय?हा प्रश्न पडला आहे. पिंपरी येथील शेतकरी रघुनाथ अर्जुन पाटील यांचे म्हसावद गावालगत चार एकर क्षेत्रात उसाची लागवड केलेली असून शेताला काटेरी तारेचे कुंपणही केलेले असूनही मोकाट गुरांनी चक्क दीड एकर ऊस फस्त केला आहे. शिल्लक उसाची ऊंची एक फुटावर तर खाऊन नुकसान केलेला ऊस जमीनदोस्त झालेला आहे. टवळाई रस्त्यालगत असलेल्या म्हसावद येथील नगीन छगन चौधरी यांचा एक एकर क्षेत्रातील ऊस फस्त केला आहे. दुसरीकडे गावालगत रिकाम्या गुरांच्या झुंडीच्या झुंडी गहू, हरभरा पेरणी केलेल्या शेतांमध्ये घुसून नुकसान करीत आहेत. पिकांचे खाऊन नुकसानीपेक्षा पिके पायदळी जास्त तुडवले जात असल्याने जास्त नुकसान होत आहे. रिकाम्या गुरांना पकडणे म्हणजे तारेवरची कसरत असून, पकडण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येतात. यात काही दुभती जनावरेही आहेत. पशुपालक सकाळ-संध्याकाळ दूध काढून घेतात, चारा मात्र टाकत नाही. बेवारस गुरांप्रमाणे सोडून मोकळे होतात. रिकामी गुरे रात्रभर शेतात, तर दिवसा गावात त्रास देत आहेत. रिकामी गुरे पकडून गोशाळेत पाठवावीत, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व ग्रामस्थांनी बोलून दाखवली. अनेकवेळा ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्याकडे कळवूनही काही कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे. रिकामी गुरे पकडून कोंडण्यासाठी ग्रामपंचायतीचा कोंडवाडा आहे. मात्र त्यात चार-पाच वर्षांपासून एकही गुरेढोरे कोंडली गेलेली नाहीत. कोणीही गुरे पकडून आणत नाही. गुरे कोणी पकडली? का पकडली? नुकसान दाखव? यावरून वाद होतात यासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन ग्रामस्थांची समस्या सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.