शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट गुरांमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 13:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद :  शहादा तालुक्यातील म्हसावद गावात व गावालगत मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे व वराहांचा त्रास ग्रामस्थांसह ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद :  शहादा तालुक्यातील म्हसावद गावात व गावालगत मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे व वराहांचा त्रास ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना होत असून, शेतात नुकसानही होत आहे. म्हसावद गावालगत असलेल्या पिंपरी येथील शेतकऱ्याच्या चार एकर उसापैकी चक्क दीड एकर ऊस या मोकाट गुरांनी फस्त करून नुकसान केले आहे. ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाने यावर उपाययोजना करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.म्हसावद गावालगत असलेल्या केळी व उसाच्या शेतात वराहांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. केळीच्या शेताला चोहोबाजूने तारेची जाळी बसवून कुंपण केले आहे. तरीही जाळी वाकवून खालून वराह घुसतात. काही वराहांचा मुक्काम तर उसाच्या शेतातच असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी करावे तरी काय?हा प्रश्न पडला आहे. पिंपरी येथील शेतकरी रघुनाथ अर्जुन पाटील यांचे म्हसावद गावालगत चार एकर क्षेत्रात उसाची लागवड केलेली असून शेताला काटेरी तारेचे कुंपणही केलेले असूनही मोकाट गुरांनी चक्क दीड एकर ऊस फस्त केला आहे. शिल्लक उसाची ऊंची एक फुटावर तर खाऊन नुकसान केलेला ऊस जमीनदोस्त झालेला आहे. टवळाई रस्त्यालगत असलेल्या म्हसावद येथील नगीन छगन चौधरी यांचा एक एकर क्षेत्रातील ऊस फस्त केला आहे. दुसरीकडे गावालगत रिकाम्या गुरांच्या झुंडीच्या झुंडी गहू, हरभरा पेरणी केलेल्या शेतांमध्ये घुसून नुकसान करीत आहेत. पिकांचे खाऊन नुकसानीपेक्षा पिके पायदळी जास्त तुडवले जात असल्याने जास्त नुकसान होत आहे. रिकाम्या गुरांना पकडणे म्हणजे तारेवरची कसरत असून, पकडण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येतात. यात काही दुभती जनावरेही आहेत. पशुपालक सकाळ-संध्याकाळ दूध काढून घेतात, चारा मात्र टाकत नाही. बेवारस गुरांप्रमाणे सोडून मोकळे होतात. रिकामी गुरे रात्रभर शेतात, तर दिवसा गावात त्रास देत आहेत. रिकामी गुरे पकडून गोशाळेत पाठवावीत, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व ग्रामस्थांनी बोलून दाखवली. अनेकवेळा ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्याकडे कळवूनही काही कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे. रिकामी गुरे पकडून कोंडण्यासाठी ग्रामपंचायतीचा कोंडवाडा आहे. मात्र त्यात चार-पाच वर्षांपासून एकही गुरेढोरे कोंडली गेलेली नाहीत. कोणीही गुरे पकडून आणत नाही. गुरे कोणी पकडली? का पकडली? नुकसान दाखव? यावरून वाद होतात यासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन ग्रामस्थांची समस्या सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.