शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

कापूस खरेदी केंद्राच्या परवानगीस आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या शासनाच्या महामंडळाकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या शासनाच्या महामंडळाकडे तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती दरवर्षी मागणी प्रस्ताव पाठवित असली तरी संबंधीत यंत्रणा केवळ जिनिंग मिल्स् अथवा सुतगिरणीची सबब पुढे करून सातत्याने नाकारत आहे. साहजिकच तालुक्यातील कापूस उत्पादक शेतक:यांना आपला माल कवडीमोल किंमतीत खासगी व्यावसायिकांना विकावा लागत आहे.यंदा तर या व्यावसयिकांनी आद्रतेच्या नावावर अक्षरश: लुबाडणूक करीत असल्याची शेतक:यांची व्यथा आहे. शेतक:यांची ही आर्थिक फसगत लक्षात घेऊन महामंडळाने बाजार समितीच्या खरेदी केंद्राच्या प्रस्तावावर तातडीने उपाय शोधून खरेदी केंद्र सुरू करावे, अशी शेतक:यांची मागणी आहे.तळोदा तालुक्यात सातत्याने पजर्न्यामानामुळे साहजिकच शेतकरी केळी, पपई, उस या पाण्याच्या पिकांऐवजी कापूस व धान पिकाकडे वळला आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन गेल्या तीन ते चार वर्षापासून कापसाच्या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. यंदा तर साधारण सात ते आठ हजार क्षेत्रावर कापसाची लागवड झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे कापसाचे चांगले उत्पादन येत असते. ताथापि या कापूस उत्पादक शेतक:यांना चांगला भाव मिळत नसल्याचा आज पावेतोचा अनुभव आहे. अगदी शासनाच्या आधारभूत भावापासून सुद्धा शेतक:यांना वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे. कापसाची बाजारपेठ तालुक्यात नसल्यामुळे समाधानकारक भावापासून उपेक्षित राहावे लागत आहे. कापसाचे वाढते उत्पादन आणि शेतक:यांची होत असलेली कोंडी लक्षात घेऊन येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाने गेल्या तीन ते चार वर्षापूर्वी कापूस-खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सातत्याने दरवर्षी प्रस्ताव पाठविण्यात येत आहे.हा प्रस्ताव राज्यशासनाच्या नागपूर व औरंगाबाद येथील कॉटन कार्पोरेशन इंडिया लिमिटेड यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवित आहे. मात्र सहकारी सुतगिरणी अथवा जिनिंग मिल्सची सबब पुढे करून बाजार समितीचा हा प्रस्स्ताव कार्यवाही आधीच नाकारण्यात येत आहे. साहजिकच खरेदी केंद्राचाही प्रश्न आजतागायत रखडला आहे. वास्तुवक तालुक्यात अल्पभूधारक शेतक:यांची संख्या मोठी आहे. त्यातही हे सर्व आदिवासी शेतकरी आहेत. या शेतक:यांचा भर केळी, पपई, ऊस, ऐवजी दुबार पिकांवरच असतो. मुख्यता कापूस व इतर धानपीक घेत असतात. म्हणूनच यंदा कापसाची विक्रमी लागवड करण्यात आली आहे. मात्र कापसाच्या दराबाबत सातत्याने होणा:या घसरणीमुळे त्याची पूर्ण आर्थिक कोंडी झाली आहे. यंदा पाऊस जुलै महिन्याच्या शेवटी आला. तोही थेट ऑक्टोबरच्या अखेर्पयत सुरूच राहिला. त्यामुळे कापसाचा हंगामदेखील लांबला. त्यातच पुन्हा अवकाळीने हजेरी लावली. परिणामी कापसाच्या उत्पादनावर प्रचंड परिणाम होऊन उत्पादनाही घट येणार आहे.शेतक:यांपुढे अशा अडचणी असतांना कापसाच्या दराबाबत खाजगी व्यापा:यांनी अडवणूकीचे धोरण घेत चार हजार 300 रूपये क्विंटलने खरेदी करीत आहेत. कापसात ओलावा असल्याचे कारण पुढे करून शेतक:यांची प्रचंड आर्थिक कोंडी करीत असल्याचा आरोप आहे. ढगाळ वातावरणामुळे आधीच कापसाचे बोंड फुटत नाही. जेमतेम वातावरण निवळल्यानंतर शेतकरी बोंडे फुटण्याची वाट पाहतो. त्यातच चोरीचा आणि मजुरांना पैसे अदा करण्यासाठी व्यापारी देईल त्या दामामध्ये नाईलाजास्तव विकत असतो. कमी माल गोळा होत असल्यामुळे पुरेशा गाडीचा भार व खर्चामुळे बाहेर सुतगिरणी अथवा सरकारी जिनिंग प्रेसलाही घेऊन जावू शकत नसल्याची व्यथा काही शेतक:यांनी बोलून दाखविली आहे.  एकूणच्4तालुक्यातील कापूस उत्पादक शेतक:यांना शासनाच्या हमीभावा पेक्षा अधिक भाव मिळावा यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कापूस खरेदी केंद्राच्या परवानगीसाठी संबंधीत यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. पत्र व्यवहाराला संबंधीत कॉटन कार्पोरेशन दाद देत नसल्याने माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती उदेसिंग पाडवी यांनी आपल्या संचालक मंडळासह नागपूर कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन संबंधीत अधिका:यांशी चर्चा केली होती. तेव्हाही संबंधीत उपस्थित अधिका:यांनी तालुक्यात जिनिंग मिल अथवा सहकारी सुतगिरणीची सबब पुढे केली होती. असेल तर परवानगी देतो. त्या वेळी संचालक मंडळाने प्रकाशा येथील पर्याय सूचविला होता. तरीही कापसाच्या वाहतुकीचा खर्च, रस्त्यातील संभाव्य दुर्घटना याची जोखीम बाजार समितीवरच ढकलल्यामुये खरेदी केंद्राच्या परवानगीचा हा प्रश्न तसाच रेंगाळत ठेवला आहे. साहजिकच हमीभावाअभावी कापूस उत्पादकांची आर्थिक कोंडी केली जात आहे.ा कापसाच्या उत्पन्नातील घट व कमी दरामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला असून, निदान शासनाच्या हमी भावाबाबत खाजगी व्यापा:यांची मनमानीस जिल्हा प्रशासनाने वचक ठेवावा, अशी शेतक:यांची मागणी आहे.