शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

शिक्षक बदली धोरणातील त्रुटी दुरुस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकांच्या बदली धोरणात सुधारणा होऊन सर्वसमावेशक शासन निर्णय येईल अशी शिक्षकांना अपेक्षा होती. गेली ...

निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकांच्या बदली धोरणात सुधारणा होऊन सर्वसमावेशक शासन निर्णय येईल अशी शिक्षकांना अपेक्षा होती. गेली दोन वर्षे अभ्यास गट यावर काम करत होता. परंतु त्यात सुधारणा होण्याऐवजी आणखी त्रासदायक बदली धोरण आल्याची शिक्षकांत भावना झाली आहे. ऑनलाइन बदलीचा निर्णय हा अवघड-सोपे क्षेत्र केंद्रबिंदू मानून झाला होता. या शासन निर्णयात अवघड क्षेत्राचे निकष जटिल करून अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होणार आहे. तसेच अवघड व प्रतिकूल क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी एक वर्षानंतर बदलीचा अधिकार काढण्यात आलेला आहे. एकल शिक्षकांचा कोणताही विचार झालेला नाही त्यामुळे संघटनेने बदल्यात दुरुस्ती सुचवली असून, त्यानुसार शुद्धिपत्रक काढण्याची मागणी केली आहे.

विनंती बदलीसाठी तीन वर्षे सेवा धरण्यात यावी

महिलांसाठी प्रतिकूल क्षेत्रात कार्यरत महिला शिक्षिकांचा बदलीचा अधिकार कायम ठेवावा. सन २०१८ व सन २०१९ च्या बदल्यांमध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांना बदलीमध्ये प्राधान्य द्यावे. बदलीसाठी सेवा कालावधी ३१ मेऐवजी ३० जून धरण्यात यावा. सन २०१७ च्या शासन निर्णयानुसार निश्चित झालेल्या अवघड क्षेत्रामध्ये तीन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना बदली अधिकार देण्यात यावा व अवघड क्षेत्रातून सोप्या क्षेत्रात बदली झाल्यानंतर तीन वर्षांनंतर विनंती बदलीची संधी देण्यात यावी. सध्या ३० किलोमीटरच्या आत असणाऱ्या व यावर्षी बदलीपात्र पती-पत्नी शिक्षकांना एकत्र फाॅर्म भरण्याची सवलत देण्यात यावी. तसेच आंतरजिल्हा बदलीसाठी १० टक्के रिक्त जागेची अट रद्द करावी. पेसा व नक्षलग्रस्त क्षेत्रातील शिक्षकांना प्राधान्य देण्याबाबत मागणी केली असून, या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. नंदुरबार जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अवघड व साधारण क्षेत्र निश्चित करून बदलीपात्र, बदली अधिकारपात्र व रिक्त शाळांच्या याद्या जाहीर कराव्यात. महिलांसाठी अवघड क्षेत्रातील प्रतिकूल व अनुकूल शाळा कायम ठेवाव्यात, अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे जिल्हाध्यक्ष मोहन बिसनारीया, सरचिटणीस अशोक देसले, उपसरचिटणीस उमेश कोळपकर, अजय शिंपी, कार्याध्यक्ष ओजू पाडवी, फुलसिंग वसावे, उपाध्यक्ष महेंद्र बैसाणे, आतिराम पवार, लक्ष्मण परदेशी, रत्नकांत भोईटे, संजय खैरनार, संजय देवरे, अमृत पाटील, जितेंद्र वळवी, दारासिंग वळवी, किशोर चौधरी, लोटन जगदाळे, शंकर वसावे, कैलास लोहार, जुगनू वसावे, महेंद्र चौधरी, रवींद्र बैसाणे, राजू चौरे, विशाल पाटील, नितीन शिंपी, योगेश सोनवणे, मोना वसावे, सोनू ठाकरे, सुरूपसिंग वळवी, मोगीलाल चौधरी, कोमलसिंग पाडवी यांनी मागणी केली आहे.