शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

शिक्षक बदली धोरणातील त्रुटी दुरुस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकांच्या बदली धोरणात सुधारणा होऊन सर्वसमावेशक शासन निर्णय येईल अशी शिक्षकांना अपेक्षा होती. गेली ...

निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकांच्या बदली धोरणात सुधारणा होऊन सर्वसमावेशक शासन निर्णय येईल अशी शिक्षकांना अपेक्षा होती. गेली दोन वर्षे अभ्यास गट यावर काम करत होता. परंतु त्यात सुधारणा होण्याऐवजी आणखी त्रासदायक बदली धोरण आल्याची शिक्षकांत भावना झाली आहे. ऑनलाइन बदलीचा निर्णय हा अवघड-सोपे क्षेत्र केंद्रबिंदू मानून झाला होता. या शासन निर्णयात अवघड क्षेत्राचे निकष जटिल करून अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होणार आहे. तसेच अवघड व प्रतिकूल क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी एक वर्षानंतर बदलीचा अधिकार काढण्यात आलेला आहे. एकल शिक्षकांचा कोणताही विचार झालेला नाही त्यामुळे संघटनेने बदल्यात दुरुस्ती सुचवली असून, त्यानुसार शुद्धिपत्रक काढण्याची मागणी केली आहे.

विनंती बदलीसाठी तीन वर्षे सेवा धरण्यात यावी

महिलांसाठी प्रतिकूल क्षेत्रात कार्यरत महिला शिक्षिकांचा बदलीचा अधिकार कायम ठेवावा. सन २०१८ व सन २०१९ च्या बदल्यांमध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांना बदलीमध्ये प्राधान्य द्यावे. बदलीसाठी सेवा कालावधी ३१ मेऐवजी ३० जून धरण्यात यावा. सन २०१७ च्या शासन निर्णयानुसार निश्चित झालेल्या अवघड क्षेत्रामध्ये तीन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना बदली अधिकार देण्यात यावा व अवघड क्षेत्रातून सोप्या क्षेत्रात बदली झाल्यानंतर तीन वर्षांनंतर विनंती बदलीची संधी देण्यात यावी. सध्या ३० किलोमीटरच्या आत असणाऱ्या व यावर्षी बदलीपात्र पती-पत्नी शिक्षकांना एकत्र फाॅर्म भरण्याची सवलत देण्यात यावी. तसेच आंतरजिल्हा बदलीसाठी १० टक्के रिक्त जागेची अट रद्द करावी. पेसा व नक्षलग्रस्त क्षेत्रातील शिक्षकांना प्राधान्य देण्याबाबत मागणी केली असून, या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. नंदुरबार जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अवघड व साधारण क्षेत्र निश्चित करून बदलीपात्र, बदली अधिकारपात्र व रिक्त शाळांच्या याद्या जाहीर कराव्यात. महिलांसाठी अवघड क्षेत्रातील प्रतिकूल व अनुकूल शाळा कायम ठेवाव्यात, अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे जिल्हाध्यक्ष मोहन बिसनारीया, सरचिटणीस अशोक देसले, उपसरचिटणीस उमेश कोळपकर, अजय शिंपी, कार्याध्यक्ष ओजू पाडवी, फुलसिंग वसावे, उपाध्यक्ष महेंद्र बैसाणे, आतिराम पवार, लक्ष्मण परदेशी, रत्नकांत भोईटे, संजय खैरनार, संजय देवरे, अमृत पाटील, जितेंद्र वळवी, दारासिंग वळवी, किशोर चौधरी, लोटन जगदाळे, शंकर वसावे, कैलास लोहार, जुगनू वसावे, महेंद्र चौधरी, रवींद्र बैसाणे, राजू चौरे, विशाल पाटील, नितीन शिंपी, योगेश सोनवणे, मोना वसावे, सोनू ठाकरे, सुरूपसिंग वळवी, मोगीलाल चौधरी, कोमलसिंग पाडवी यांनी मागणी केली आहे.