शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शेतांचे नदी-नाल्यात रुपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परिवर्धे : परिसरातील शेतांमध्ये वाकी नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने केळी, पपई, ऊसासह इतर पिकांसह शेती वाहून ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरिवर्धे : परिसरातील शेतांमध्ये वाकी नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने केळी, पपई, ऊसासह इतर पिकांसह शेती वाहून गेल्याने शेतक:यांचे प्रचंड नुकसान झाले. नदीतील गाळ व वाळू घुसल्याने शेतांचे नदी-नाल्यात रुपांतर झाले आहे.अतिवृष्टी व महापुराने शहादा तालुक्यातील परिवर्धे, कोठली, त:हाडी, कलसाडी, सोनवल, जावदा, वाडी पुर्नवसन, कलमाडी आदी गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाकी नदीला आलेला महापुराने कोठली व परिवर्धे गावाला चोहोबाजूंनी वेढा दिला असून शेकडो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. अनेक घरांची पडझड झाली. पुराचे पाणी गावात घुसल्याने कोठली ग्रामस्थांनी त:हाडी गावात आसरा घेतला. वाकी नदीचा उगम धडगाव रस्त्यावरील नणंद-भावजयी घाटापासून आहे. नदीच्या उगम क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने नदीला महापूर आला होता. हा महापूर 2006 पेक्षाही भयानक होता. नदीजवळील शेतातील पपई, ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिके वाहून गेल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी नदीने वेगळेच वळण घेतल्याने वाघोदा ते परिवर्धा,   परिवर्धा ते कोठली रस्ता वाहून     गेला. सपाट शेतजमिनींचे नाल्यात रुपांतर झाले आहे. परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा शनिवारी रात्रीर्पयत सुरळीत होईल, असे सांगण्यात आले.दरम्यान, शनिवारी येथे नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक आले असता गामस्थांनी त्यांना पंचनामे करु दिले नाही. ज्यांनी अवैध जागेवर घर बांधलेले आहे त्यांचेही पंचनामे शासनाने करावे, अशी मागणी करण्यात आली.आमदारांकडून पाहणीशहादा तालुक्यातील परिवर्षे, त:हाडी, सोनवल इतर शिवारात पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी रविवारी कृषी अधिकारी किशोर हडपे व कृषी सहायक धनराज निकुंभे आदींनी केली. शासनाने शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी संबंधित विभागांच्या सुटय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज शासनाला कळवावा लागणार असल्याने रविवारी कृषी अधिकारी यांनी या भागात पाहणी केली.  संध्याकाळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनीही परिवर्धे  व कोठली गावातील नुकसानीची पाहणी केली. वाकी नदीवरील वाहून गेलेली संरक्षण  भिंत, विजेचे खांब आदींचीही पाहणी केली. कोठली गावाचे इतरत्र  पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.