शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

या चिमण्यांनो परत फिरा रे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 11:37 IST

जागतिक चिमणी दिवस : नंदुरबारातील अशोक भोई यांची ‘चिमणी वाचवा’ मोहीम

संतोष सूर्यवंशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाढते शहरीकरण, पर्यावरणाचा असमतोल या कारणांमुळे पक्ष्यांच्या विविध जाती सध्या लुप्त होत आहेत़ शहरीकरणाचा फटका बसलेली अशाच पक्ष्यांपैकी एक प्रजात म्हणजे चिमणी़ शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील आता चिमणीचा चिवचिवाट कानावर पडेनासा झालेला आहे़ त्यामुळे ग़दी़ माडगुळकरांच्या रचनेतील या चिमण्यांनो परत फिरा रे... अशी म्हणण्याची वेळ आज आली आहे़यामुळेच नंदुरबार शहरातील अशोक भोई यांनी ‘चिमणी वाचवा’ ही मोहीम हाती घेतली आहे़ त्यांनी सुमारे तिनशेहून अधिक चिमण्यांसाठी घरटी तयार करुन वाटली आहेत़ गेल्या तीन वर्षांपासून ते पुठ्ठ्यापासून चिमण्यांसाठी घरटी करीत आहे़ विशेष म्हणजे ते आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळून लुप्त होत चाललेल्या चिमण्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत़ अत्यंत साध्या व सोप्या पध्दतीने त्यांनी चिमण्यांसाठी उपयुक्त असे घरटे तयार केले आहे़ अशोक भोई यांनी अतिशय साध्या व सहज उपलब्ध होतील अशा वस्तूंचा वापर करून चिमण्यांसाठी घरटे तयार केले आहे़ यात त्यांनी कडक पुठ्ठा, चिगटपट्टी, प्लॅस्टिक कचकडा, काठी आदी साहित्य वापरले आहेत़ या घराची रचनादेखील मानवी घरासारखीच ठेवण्यात आलेली आहे़ जेणेकरुन ते घरटे एखादी शोभेची वस्तू म्हणूनही भासत आहे़ सुरुवातीला कडक पुठ्ठ्याला घराच्या आकाराने मापशिर कापून घेण्यात येते़ त्यानंतर स्टॅपलर किंवा डिंकाने पुठ्ठ्याचे सर्व भाग मोजमापानुसार जोडून घेतले जात असतात़ त्यानंतर पावसाळ्यातही हे घरटे टिकाव धरू शकेल अशा पध्दतीने त्यावर प्लॅस्टिक कचकड्याचे आवरण लावण्यात येत असते़ त्यामुळे हे घरटे वॉटर प्रुफ होते़ घरटे तयार झाल्यावर चिमणी सहज आत प्रवेश करु शकेल या पध्दतीने खिडकी प्रमाणे पुठ्ठा कापून घेण्यात येत असतो़ चिमण्यांना उभं राहण्यास सोयीस्कर अशा पध्दतीने घराच्या मधोमध लाकडी काडी किंवा तत्सम वस्तू रोवण्यात जाते़ देशात चिमण्यांच्या संख्येची गणना करण्यासाठी शासनाची विश्वसनीय अशी यंत्रणाच नसल्याने अनेक वेळा पक्षीप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असते़ देशभरात नेचर फॉरेव्हर सोसायटी सारख्या एनजीओ तसेच इतर स्वयंसेवी संस्थांकडून वेळोवेळी पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात येत असते़ परंतु याला शासकीय प्रोत्साहन मिळत नसल्याचे दिसून येत असते़ चिमणी तसेच कुठलाही पक्षी हा जैव विविधतेचा एक घटक आहे़ या साखळीतील एखादी घटकदेखील वेगळा झाला तरी ही संपूर्ण साखळी कोलमडून पडत असते़ नंदुरबार जिल्ह्याचा विचार करता गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले आहे़ तसेच विविध ठिकाणी मोबाईल टॉवरदेखील उभारण्यात आले आहे़ याचा सर्वाधिक फटका पक्ष्यांना बसत आहे़