शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

या चिमण्यांनो परत फिरा रे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 11:37 IST

जागतिक चिमणी दिवस : नंदुरबारातील अशोक भोई यांची ‘चिमणी वाचवा’ मोहीम

संतोष सूर्यवंशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाढते शहरीकरण, पर्यावरणाचा असमतोल या कारणांमुळे पक्ष्यांच्या विविध जाती सध्या लुप्त होत आहेत़ शहरीकरणाचा फटका बसलेली अशाच पक्ष्यांपैकी एक प्रजात म्हणजे चिमणी़ शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील आता चिमणीचा चिवचिवाट कानावर पडेनासा झालेला आहे़ त्यामुळे ग़दी़ माडगुळकरांच्या रचनेतील या चिमण्यांनो परत फिरा रे... अशी म्हणण्याची वेळ आज आली आहे़यामुळेच नंदुरबार शहरातील अशोक भोई यांनी ‘चिमणी वाचवा’ ही मोहीम हाती घेतली आहे़ त्यांनी सुमारे तिनशेहून अधिक चिमण्यांसाठी घरटी तयार करुन वाटली आहेत़ गेल्या तीन वर्षांपासून ते पुठ्ठ्यापासून चिमण्यांसाठी घरटी करीत आहे़ विशेष म्हणजे ते आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळून लुप्त होत चाललेल्या चिमण्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत़ अत्यंत साध्या व सोप्या पध्दतीने त्यांनी चिमण्यांसाठी उपयुक्त असे घरटे तयार केले आहे़ अशोक भोई यांनी अतिशय साध्या व सहज उपलब्ध होतील अशा वस्तूंचा वापर करून चिमण्यांसाठी घरटे तयार केले आहे़ यात त्यांनी कडक पुठ्ठा, चिगटपट्टी, प्लॅस्टिक कचकडा, काठी आदी साहित्य वापरले आहेत़ या घराची रचनादेखील मानवी घरासारखीच ठेवण्यात आलेली आहे़ जेणेकरुन ते घरटे एखादी शोभेची वस्तू म्हणूनही भासत आहे़ सुरुवातीला कडक पुठ्ठ्याला घराच्या आकाराने मापशिर कापून घेण्यात येते़ त्यानंतर स्टॅपलर किंवा डिंकाने पुठ्ठ्याचे सर्व भाग मोजमापानुसार जोडून घेतले जात असतात़ त्यानंतर पावसाळ्यातही हे घरटे टिकाव धरू शकेल अशा पध्दतीने त्यावर प्लॅस्टिक कचकड्याचे आवरण लावण्यात येत असते़ त्यामुळे हे घरटे वॉटर प्रुफ होते़ घरटे तयार झाल्यावर चिमणी सहज आत प्रवेश करु शकेल या पध्दतीने खिडकी प्रमाणे पुठ्ठा कापून घेण्यात येत असतो़ चिमण्यांना उभं राहण्यास सोयीस्कर अशा पध्दतीने घराच्या मधोमध लाकडी काडी किंवा तत्सम वस्तू रोवण्यात जाते़ देशात चिमण्यांच्या संख्येची गणना करण्यासाठी शासनाची विश्वसनीय अशी यंत्रणाच नसल्याने अनेक वेळा पक्षीप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असते़ देशभरात नेचर फॉरेव्हर सोसायटी सारख्या एनजीओ तसेच इतर स्वयंसेवी संस्थांकडून वेळोवेळी पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात येत असते़ परंतु याला शासकीय प्रोत्साहन मिळत नसल्याचे दिसून येत असते़ चिमणी तसेच कुठलाही पक्षी हा जैव विविधतेचा एक घटक आहे़ या साखळीतील एखादी घटकदेखील वेगळा झाला तरी ही संपूर्ण साखळी कोलमडून पडत असते़ नंदुरबार जिल्ह्याचा विचार करता गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले आहे़ तसेच विविध ठिकाणी मोबाईल टॉवरदेखील उभारण्यात आले आहे़ याचा सर्वाधिक फटका पक्ष्यांना बसत आहे़