शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

मिरचीचे भाव घसरल्याने मिरची उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST

यावर्षी सुरूवातीला मिरचीला अपेक्षित भाव मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी एप्रिलच्या शेवटी विकतचे पाणी घेऊन व मोठा खर्च करुन मिरची लागवडीचे ...

यावर्षी सुरूवातीला मिरचीला अपेक्षित भाव मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी एप्रिलच्या शेवटी विकतचे पाणी घेऊन व मोठा खर्च करुन मिरची लागवडीचे नियोजन केले. सुरुवातीला बाजारात मिरचीची आवक कमी असल्याने क्विंटलला चार ते पाच हजारापर्यंत भाव मिळाला. मात्र जसजशी मिरचीची आवक वाढली तसतसे मिरचीचे भाव उतरतच गेले. सध्या हे भाव ५०० ते ७०० रुपये प्रती क्विंटल पोहोचले आहे. परिसरात सध्या सुरू असलेल्या रिमझीम पावसामुळे मिरची पिकावर बुरशीजन्य रोग पडला असल्याने शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करुन मिरची वाचविण्याचे प्रयत्न केले. या सर्व परिस्थितीचा परिणाम शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मरावे की जगावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अचानकच दीड हजार रुपयांनी भाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले आहे. मिरची लागवडीपासून ते आतापर्यंत भरपूर असा खर्च व विविध रोगांचा सामना करावा लागतो. परंतु अचानकच मिरची पिकाची आवक वाढल्याने व भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी लावलेला खर्च व मजुरांचे पैसे निघत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. पूर्वहंगामी लावलेल्या मिरचीला सुरुवातीला काही शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी असल्याने लागवड केली. त्यात काही शेतकऱ्यांकडे पाणी नसल्याने टँकरद्वारे विकत पाणी घेऊन मिरची पिकाला पाऊस पडेपर्यंत कसेबसे जगवले. त्यामध्ये आठ दिवसापूर्वी १५ ते २० दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. परंतु इतर राज्यात मिरची पिकाची आवक वाढल्याने राज्यातील व्यापारीही मिरचीची कमी भावाने खरेदी करीत आहेत. त्याचाच परिणाम दोडाईचा, नंदुरबार येथील मिरची मार्केटमध्ये जाणवू लागला आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली असल्यामुळे येथील मिरची मार्केटमध्ये आवक वाढली आहे.

एप्रिल महिन्यामध्ये १६ हजार रोपांची लागवड केली आहे. आत्तापर्यंत रासायनिक खते, कीटकनाशक औषधे असा भरपूर खर्च मिरची पिकावर केलेला आहे. आतापर्यंत तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल विक्री केली. परंतु भाव घसरल्याने खर्चही निघत नाही. तोच मिरचीची आवक वाढल्याने अडीच हजार रुपयांनी भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मजुरांचा खर्चही निघत नसल्याने इतर खर्च कसा निघेल? असा प्रश्न पडला आहे. यावर्षी वेळोवेळी औषध फवारणी करून विविध रोगांचा सामना करत कसेबसे मिरची पिकाला जगवले आहे. नुकताच माल निघायला सुरुवात झाली व भावात मोठी घसरण झाल्याने हिरवी मिरची मातीमोल भावाने नाईलाजाने विकावी लागत आहे. पुढे जर असाच भाव राहिला तर मिरची पिकामुळे शेतकरी कर्जबाजारी होईल.

-धर्मा दत्तू धनगर, शेतकरी