शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

मिरचीचे भाव घसरल्याने मिरची उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST

यावर्षी सुरूवातीला मिरचीला अपेक्षित भाव मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी एप्रिलच्या शेवटी विकतचे पाणी घेऊन व मोठा खर्च करुन मिरची लागवडीचे ...

यावर्षी सुरूवातीला मिरचीला अपेक्षित भाव मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी एप्रिलच्या शेवटी विकतचे पाणी घेऊन व मोठा खर्च करुन मिरची लागवडीचे नियोजन केले. सुरुवातीला बाजारात मिरचीची आवक कमी असल्याने क्विंटलला चार ते पाच हजारापर्यंत भाव मिळाला. मात्र जसजशी मिरचीची आवक वाढली तसतसे मिरचीचे भाव उतरतच गेले. सध्या हे भाव ५०० ते ७०० रुपये प्रती क्विंटल पोहोचले आहे. परिसरात सध्या सुरू असलेल्या रिमझीम पावसामुळे मिरची पिकावर बुरशीजन्य रोग पडला असल्याने शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करुन मिरची वाचविण्याचे प्रयत्न केले. या सर्व परिस्थितीचा परिणाम शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मरावे की जगावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अचानकच दीड हजार रुपयांनी भाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले आहे. मिरची लागवडीपासून ते आतापर्यंत भरपूर असा खर्च व विविध रोगांचा सामना करावा लागतो. परंतु अचानकच मिरची पिकाची आवक वाढल्याने व भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी लावलेला खर्च व मजुरांचे पैसे निघत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. पूर्वहंगामी लावलेल्या मिरचीला सुरुवातीला काही शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी असल्याने लागवड केली. त्यात काही शेतकऱ्यांकडे पाणी नसल्याने टँकरद्वारे विकत पाणी घेऊन मिरची पिकाला पाऊस पडेपर्यंत कसेबसे जगवले. त्यामध्ये आठ दिवसापूर्वी १५ ते २० दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. परंतु इतर राज्यात मिरची पिकाची आवक वाढल्याने राज्यातील व्यापारीही मिरचीची कमी भावाने खरेदी करीत आहेत. त्याचाच परिणाम दोडाईचा, नंदुरबार येथील मिरची मार्केटमध्ये जाणवू लागला आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली असल्यामुळे येथील मिरची मार्केटमध्ये आवक वाढली आहे.

एप्रिल महिन्यामध्ये १६ हजार रोपांची लागवड केली आहे. आत्तापर्यंत रासायनिक खते, कीटकनाशक औषधे असा भरपूर खर्च मिरची पिकावर केलेला आहे. आतापर्यंत तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल विक्री केली. परंतु भाव घसरल्याने खर्चही निघत नाही. तोच मिरचीची आवक वाढल्याने अडीच हजार रुपयांनी भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मजुरांचा खर्चही निघत नसल्याने इतर खर्च कसा निघेल? असा प्रश्न पडला आहे. यावर्षी वेळोवेळी औषध फवारणी करून विविध रोगांचा सामना करत कसेबसे मिरची पिकाला जगवले आहे. नुकताच माल निघायला सुरुवात झाली व भावात मोठी घसरण झाल्याने हिरवी मिरची मातीमोल भावाने नाईलाजाने विकावी लागत आहे. पुढे जर असाच भाव राहिला तर मिरची पिकामुळे शेतकरी कर्जबाजारी होईल.

-धर्मा दत्तू धनगर, शेतकरी