शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

नंदुरबार मार्गावरील रेल्वेगाडय़ांच्या वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेल्वेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 1 जुलैपासून अंमलात येणार आहे. या वेळापत्रकात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रेल्वेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 1 जुलैपासून अंमलात येणार आहे. या वेळापत्रकात ‘नंदुरबार-उधना-मेमू’ आणि ‘उधना-पाळधी-मेमू’ या रेल्वेगाडय़ांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.रेल्वेचे नवीन वार्षिक वेळापत्रक जाहीर झाले असून अनेक रेल्वे गाडय़ांच्या वेळेत बदल झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पित झालेली नंदुरबार-उधना मेमू दुपारी दीड वाजता सुटायची. त्यापाठोपाठ भुसावळ-सुरत पॅसेंजर अडीच वाजता नंदुरबारहून सुटायची. त्यामुळे मेमू ट्रेन रिकामीच धावत होती. परंतु आता मेमू ट्रेन साडेतीन तास अगोदर म्हणजेच सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी नंदुरबारहून सुटणार आहे. त्यामुळे उधना जाणा:या प्रवाशांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचप्रमाणे उधना-पाळधी मेमू दुपारी दोन वाजून 35 मिनीटांनी नंदुरबार स्टेशनवर येत होती. त्याचवेळेस भुसावळ-सुरत पॅसेंजर स्टेशनवर उभी असायची. एकाचवेळेस दोन  पॅसेंजर ट्रेन स्टेशनवर असल्यामुळे मेमू ट्रेन रिकामीच धावत होती. परंतु नवीन वेळापत्रकानुसार उधना-पाळधी  मेमू दुपारी चार वाजता नंदुरबार स्टेशनवर येऊन चार वाजून पाच मिनिटांनी सुटणार आहे. त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासाला मेमू ट्रेन रात्री साडेबाराऐवजी रात्री एक वाजता नंदुरबारहून सुटणार आहे.याव्यतिरीक्त अहमदाबाद-इलाहाबाद एक्सप्रेस रात्री साडेआठ वाजता नंदुरबार स्टेशनवर येऊन रात्री आठ चाळीसला सुटत होती. त्याऐवजी आता नऊ पस्तीसला येऊन पावणेदहा वाजता सुटणार आहे. उधना-जयनगर अंत्योदय एक्सप्रेस सकाळी अकरा चाळीसऐवजी दुपारी सव्वा बाराला नंदुरबारहून सुटेल. अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्सप्रेस दुपारी दोन बावीसला सुटत होती. त्याऐवजी आता दोन वाजून 12 मिनीटांनी नंदुरबारहून सुटणार आहे. सुरत-भुसावळ पॅसेंजर रात्री नऊ पस्तीसला सुटत होती त्याऐवजी आता नऊ पंचवीसला सुटणार आहे. राजकोट-रिवा एक्सप्रेस रात्री बारा पस्तीसला सुटत होती त्याऐवजी रात्री एक दहाला नंदुरबार स्टेशनवरून सुटेल.अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस, ओखा-पुरी एक्सप्रेस आणि अहमदाबाद-यशवंतपूर एक्सप्रेस वेगवेगळ्या दिवसांना रात्री एक वाजून वीस मिनिटांनी सुटत होत्या त्याऐवजी आता रात्री पावणे दोन वाजता सुटणार आहे. उधना-वाराणसी एक्सप्रेस रात्री बारा चाळीसला नंदुरबारहून सुटत होती त्याऐवजी आता रात्री एक वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. वलसाड-मुज्जफरपूर एक्सप्रेस आणि वलसाड-कानपूर एक्सप्रेस रात्री बारा चाळीसला सुटत होती त्याऐवजी रात्री बारा वाजून 55 मिनीटांनी सुटणार आहे.