शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

सावधान ११० गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध पाणी योजना आणि जलस्त्रोतांच्या जलनमुन्यांची तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात येते. गेल्या वर्षातील संकलित करण्यात ...

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध पाणी योजना आणि जलस्त्रोतांच्या जलनमुन्यांची तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात येते. गेल्या वर्षातील संकलित करण्यात आलेल्या सुमारे आठ हजार नमुन्यांपैकी ६०० नमुने हे दूषित असून हे नमुने ११० गावांमधून संकलित केले गेले आहेत.

दूषित असलेल्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाकडे देण्यात आली आहे. आरोग्य विभागाने गावोगावी नियुक्त केलेले मल्टीपल हेल्थ वर्कर अर्थात एमपीडब्ल्यू या पाणी नमुन्यांचे संकलन करत आहेत. त्यांच्याकडून हातपंप, पाणी योजना, विहिरी, सार्वजनिक नळ या ठिकाणांहून हे नमुने संकलित करून ते जिल्हा प्रयोगशाळेत आणले जातात. याठिकाणी त्याची तपासणी करून ते पिण्यायोग्य किंवा अयोग्य याचा अहवाल देत, ग्रामपंचायतींना सूचित केले जात आहे. यातून त्या-त्या गावांमध्ये उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात क्षारयुक्त, फ्लोराईडयुक्त तसेच इतर द्रव असलेले पाणी अजिबात नसल्याचा दावा केला जातो. परंतु, जलजन्य आजार पसरवणारे दूषित नमुने मात्र आढळून येत असल्याने त्याठिकाणी उपाय केले जात असल्याचे सांगितले गेले आहे. हे नमुने शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात गोळा केले जात आहेत. जिल्ह्यातून यंदा सर्वाधिक दीड हजार पाणी नमुने हे नवापूर तालुक्यातून गोळा करून त्यांची तपासणी करण्यात आली होती. यातील १० टक्के नमुने हे दूषित आहेत.

सर्वच ग्रामपंचायतींमधून नमुन्यांचे संकलन

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात जिल्ह्यातून हे पाणी नमुने संकलित करण्यात आले आहेत. नमुन्यांमध्ये दूषितपणा हा १०० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात बहुतांश सर्वच गावांचे पाणी नमुने तपासणी करण्यात आल्याचा दावा आरोग्य विभागाचा आहे. तालुक्यात यंदा जलजन्य आजाराची एकही घटना नसल्याचा दावाही आरोग्य विभागाचा आहे.

जिल्ह्यात पाणी योजनांचे पाईप हे वर्षानुवर्ष जुनाट आहेत. यामुळे काही गावांच्या पिण्याच्या पाण्याची योजनाच निकामी असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १० ते १५ हजारपेक्षा अधिक पाणी नमुने तपासणी करून त्याचा अहवाल दिला जातो. परंतु गेल्या वर्षापासून आलेला कोरोना या कामांना ब्रेक लावत आहे.गेल्या वर्षातील मार्च ते मे या तीन महिन्यांच्या काळात केवळ हजार नमुने संकलित करून तपासणी केली होती. सर्व सहा तालुक्यांतून प्रत्येक महिन्याला हजारापेक्षा कमीच नमुने संकलित करण्यात आल्याची माहिती आहे.

पावसाळ्यात जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे अतिसार, जुलाब, डायरिया तसेच पोटाचे विकार होण्याची सर्वाधिक शक्यता असते. यामुळे पावसाळ्यापूर्वी नमुने तपासून त्याचा अहवाल देण्यावर भर दिला जातो. यातून पुढील उपाययोजनांसाठी आरोग्य विभाग लेखी आदेश काढत आहे.

जिल्ह्यात ५८६ ग्रामपंचायती, चार नगरपालिका व एक नगरपंचायत हद्दीतील विविध जलस्त्रोतांची माहिती संकलित केली गेली आहे. ज्या ठिकाणचे नमुने दूषित आहेत त्याठिकाणी आरोग्य विभागाचे पथक भेट देत उपाययोजनांना गती देत असल्याची माहिती देण्यात आली.

आजारी पडायचे नसले तर पाणी उकळून प्या

n दरम्यान, आरोग्य विभागाकडून जलजन्य आजारांपासून नागरिकांना स्वत:चा बचाव करता यावा यासाठी मार्गदर्शन केले जाते.

n यात प्रामुख्याने पाणी उकळून पिणे हा सल्ला असतो.

n तसेच पिण्याच्या पाण्यात जंतुनाशकाचा नियमित वापर करणे, पिण्याचा पाण्याचा माठ किंवा इतर तत्सम साहित्य स्वच्छ जागी ठेवावे, पाणी घेण्यासाठी स्वच्छ भांड्यांचा वापर करावा.