शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

वित्त विभागाचा गाडा रिक्त पदांमुळे अडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वित्त विभागात धनादेश लिहिण्यासाठी देखील कर्मचारी नाहीत, अधिकारी व कर्मचारी देखील भेटत नाहीत अशा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वित्त विभागात धनादेश लिहिण्यासाठी देखील कर्मचारी नाहीत, अधिकारी व कर्मचारी देखील भेटत नाहीत अशा तक्रारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी केल्या. संबधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली. दरम्यान, वित्त विभागात तब्बल १५ कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे कामांना विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आॅनलाईन झाली. सभेत आरोग्य व शिक्षणावर चर्चा करण्यात आली. सभेला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, सभापती निर्मला राऊत, रतन पाडवी, सदस्य देवमन पवार, मधुकर नाईक, विजय पराडके, धनराज पाटील, सी.के.पाडवी आदी सहभागी झाले होते. बैठकीत वित्त विभागाच्या तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. ठराविक मर्जीतल्या लोकांकडे महत्वाचे टेबल आहेत. कामे लवकर होत नाहीत, मनमानी कारभार चालविला जातो त्यामुळे या विभागाला शिस्त लावावी अशी मागणी देखील यावेळी सदस्य सी.के.पाडवी व इतर सदस्यांनी केली. त्यावर वित्त अधिकारी अतुलकुमार गायकवाड यांनी सांगितले, वित्त विभागात एकुण २९ पदे मंजुर आहेत. त्यातील केवळ १४ पदे भरलेली असून १५ पदे रिक्त आहेत. त्यात कर्मचारी रजा व इतर बाबी लक्षात घेता कमी कर्मचाऱ्यांवरच कामाचा गाडा चालविला जात आहे. त्यामुळे काही कामांबाबत विलंब होऊ शकतो असे स्पष्टीकरण दिले. अध्यक्षा वळवी यांनी याबाबत गांभिर्याने घ्यावे व महत्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे अशा सुचना दिल्या.दुर्गम भागात ठेकेदारांकडून कमी दराने अर्थात अगदी २५ ते ३० टक्के कमी दराने कामे घेतली जात आहेत. याचा अर्थ या कामांचा दर्जा काय असू शकतो याचा अंदाज येतो. त्यामुळे कामांच्या दर्जाबाबत काहीही तडजोड होता कामा नये. या ठिकाणी संबधीत विभागांनी लक्ष द्यावे अशी मागणी सी.के.पाडवी, विजय पराडके यांनी केली. त्यावर सीईओ रौंदळ यांनी सांगितले, इतक्या कमी दराने कामे घेणे चुकीचे आहे. कामांच्या दर्जाबाबतची हमी बांधकाम विभागाने द्यावी तरच पुढील प्रक्रिया राबवावी अशा सुचना दिल्या. अंगणवाडी, मिनीअंगणवाडीतील सेविका व मदतनीस नियुक्तीसाठी स्थानिक उमेदवार महिला असावी अशी अट आहे त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी पराडके यांनी केली. आरोग्य विभागातील ३२ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्याची पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. मधुकर नाईक यांनी अधिकारी भेटत नसल्याची तक्रार नागरिक करीत असल्याचे सांगितले.