शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

वित्त विभागाचा गाडा रिक्त पदांमुळे अडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वित्त विभागात धनादेश लिहिण्यासाठी देखील कर्मचारी नाहीत, अधिकारी व कर्मचारी देखील भेटत नाहीत अशा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वित्त विभागात धनादेश लिहिण्यासाठी देखील कर्मचारी नाहीत, अधिकारी व कर्मचारी देखील भेटत नाहीत अशा तक्रारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी केल्या. संबधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली. दरम्यान, वित्त विभागात तब्बल १५ कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे कामांना विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आॅनलाईन झाली. सभेत आरोग्य व शिक्षणावर चर्चा करण्यात आली. सभेला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, सभापती निर्मला राऊत, रतन पाडवी, सदस्य देवमन पवार, मधुकर नाईक, विजय पराडके, धनराज पाटील, सी.के.पाडवी आदी सहभागी झाले होते. बैठकीत वित्त विभागाच्या तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. ठराविक मर्जीतल्या लोकांकडे महत्वाचे टेबल आहेत. कामे लवकर होत नाहीत, मनमानी कारभार चालविला जातो त्यामुळे या विभागाला शिस्त लावावी अशी मागणी देखील यावेळी सदस्य सी.के.पाडवी व इतर सदस्यांनी केली. त्यावर वित्त अधिकारी अतुलकुमार गायकवाड यांनी सांगितले, वित्त विभागात एकुण २९ पदे मंजुर आहेत. त्यातील केवळ १४ पदे भरलेली असून १५ पदे रिक्त आहेत. त्यात कर्मचारी रजा व इतर बाबी लक्षात घेता कमी कर्मचाऱ्यांवरच कामाचा गाडा चालविला जात आहे. त्यामुळे काही कामांबाबत विलंब होऊ शकतो असे स्पष्टीकरण दिले. अध्यक्षा वळवी यांनी याबाबत गांभिर्याने घ्यावे व महत्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे अशा सुचना दिल्या.दुर्गम भागात ठेकेदारांकडून कमी दराने अर्थात अगदी २५ ते ३० टक्के कमी दराने कामे घेतली जात आहेत. याचा अर्थ या कामांचा दर्जा काय असू शकतो याचा अंदाज येतो. त्यामुळे कामांच्या दर्जाबाबत काहीही तडजोड होता कामा नये. या ठिकाणी संबधीत विभागांनी लक्ष द्यावे अशी मागणी सी.के.पाडवी, विजय पराडके यांनी केली. त्यावर सीईओ रौंदळ यांनी सांगितले, इतक्या कमी दराने कामे घेणे चुकीचे आहे. कामांच्या दर्जाबाबतची हमी बांधकाम विभागाने द्यावी तरच पुढील प्रक्रिया राबवावी अशा सुचना दिल्या. अंगणवाडी, मिनीअंगणवाडीतील सेविका व मदतनीस नियुक्तीसाठी स्थानिक उमेदवार महिला असावी अशी अट आहे त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी पराडके यांनी केली. आरोग्य विभागातील ३२ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्याची पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. मधुकर नाईक यांनी अधिकारी भेटत नसल्याची तक्रार नागरिक करीत असल्याचे सांगितले.