शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्याच्या दुर्गम भागाला अखेर मंत्रीमंडळात मिळाले प्रतिनिधीत्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:22 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : १९६७ पासून सतत मंत्रीपद मिळणाऱ्या नंदुरबारला पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा मंत्रीपद ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : १९६७ पासून सतत मंत्रीपद मिळणाऱ्या नंदुरबारला पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा मंत्रीपद मिळाले आहे. यावेळी सातपुड्याच्या दुर्गम भागाचे प्रतिनिधीत्व करणाºया आमदारांना प्रथमच संधी देण्यात आली आहे. आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि सतत सात वेळा निवडून आलेल्या लोकप्रतिनिला कॅबीनेट मंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्याला न्याय मिळाला आहे.संयुक्त धुळे जिल्हा असतांना नंदुरबार विभागाला नेहमीच मंत्रीपद मिळाले आहे. थेट डी.एन.पाडवी यांच्यापासून आतापर्यंत अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचा समावेश करता येईल. या नेत्यांनी आपल्या परीने परिसराच्या विकासाला चालना दिली आहे.सतत मंत्रीपदाचा माननंदुरबार विभागाला सतत अर्थात १९६७ पासून उपमंत्री, राज्यमंत्री ते कॅबीनेट मंत्रीपदाचा मान मिळत गेला आहे. तळोदा मतदार संघातून निवडून गेलेले डी.एन.पाडवी यांना तेंव्हाच्या सरकारमध्ये उपमंत्रीपदाचा मान मिळाला होता. त्यानंतर दिलवरसिंग पाडवी यांना राज्यमंत्रीपद मिळाले. काँग्रेसच्या काळात नंदुरबार मतदारसंघातून निवडून आलेले आर.पी.वळवी यांना काही काळ राज्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतरच्या काळात मात्र सातत्याने जिल्ह्याला नवापूर मतदार संघातून कॅबीनेट मंत्रीपद मिळत गेले ते सुरूपिसंग नाईक यांच्या रुपाने. सतत २० वर्ष ते कॅबीनेट मंत्री म्हणून राहिले. त्यानंतर १९९५ मध्ये नंदुरबारातून निवडून आलेले आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी युतीच्या काळात पाच वर्ष राज्यमंत्रीपद मिळविले. नंतर आघाडीच्या तीन सरकारांमध्ये ते कॅबीनेटमंत्री राहिले.आघाडीच्या सत्तेच्या काळात अर्थात १९९९ ते २०१४ पर्यंत जिल्ह्याला दोन कॅबीनेट मंत्री मिळत होते. २०१४ मध्ये सत्तांतर झाले. केंद्रीय राजकारणात भाजपने मुसंडी मारली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्रेझ निर्माण झाल्यानंतर अनेकांनी पक्षांतर केले. त्यात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनीही आघाडीच्या सरकारमधून मंत्रीपदाचा राजीनामा देत कन्येला भाजपमध्ये प्रवेश देत कन्या डॉ.हिना गावीत यांना लोकसभेत निवडून आणले. विधानसभेत ते स्वत: भाजपकडून निवडून आले. परंतू तेंव्हापासून अर्थात गेल्या पंचवार्षीकमध्ये भाजप सत्तेच्या काळात नंदुरबार मंत्रीपदापासून उपेक्षीत राहिले.पाच वर्ष उपेक्षाचभाजपच्या गेल्या पाच वर्षाच्या सत्ता काळात जिल्ह्याला मंत्रीपद मिळू शकले नाही. जिल्ह्यातून भाजपचे आमदार डॉ.विजयकुमार गावीत व उदेसिंग पाडवी हे दोन आमदार निवडून गेले होते. दरवेळी मंत्री मंडळाच्या विस्तारावेळी जिल्ह्याला मंत्रीपद मिळेल म्हणून चर्चा होत होती. परंतु पुर्ण पाच वर्ष जिल्हा मंत्रीपदाविनाच राहिला.दुर्गम भागाला न्यायसतत सात वेळा निवडून येण्याचा मान मिळविणारे आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांना यावेळी काँग्रेसने मंत्रीपदाचा मान दिला. ते निवडून येत असलेला मतदारसंघ अर्थात अक्कलकुवा व धडगाव तालुका पुर्ण डोंगराळ, दुर्गम व अविकसीत आहे. त्यामुळे एका अर्थाने अ‍ॅड.पाडवी यांच्या माध्यमातून दुर्गम भागाला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.काँग्रेस पक्षात आजच्या परिस्थितीत ज्येष्ठ नेत्यांमध्ये आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचा समावेश होतो. यावेळी त्यांना उमेदवार निवडीच्या कोअर कमिटीत स्थान होते. महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या चर्चांमधील प्रमुख नेत्यांमध्ये देखील आमदार अ‍ॅड.पाडवी यांचा समावेश होता. मंत्रीमंडळ विस्तारात त्यांचे नाव काँग्रेसतर्फे सतत वरच्या क्रमांकावरच घेतले जात होते.