शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्याच्या दुर्गम भागाला अखेर मंत्रीमंडळात मिळाले प्रतिनिधीत्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:22 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : १९६७ पासून सतत मंत्रीपद मिळणाऱ्या नंदुरबारला पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा मंत्रीपद ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : १९६७ पासून सतत मंत्रीपद मिळणाऱ्या नंदुरबारला पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा मंत्रीपद मिळाले आहे. यावेळी सातपुड्याच्या दुर्गम भागाचे प्रतिनिधीत्व करणाºया आमदारांना प्रथमच संधी देण्यात आली आहे. आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि सतत सात वेळा निवडून आलेल्या लोकप्रतिनिला कॅबीनेट मंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्याला न्याय मिळाला आहे.संयुक्त धुळे जिल्हा असतांना नंदुरबार विभागाला नेहमीच मंत्रीपद मिळाले आहे. थेट डी.एन.पाडवी यांच्यापासून आतापर्यंत अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचा समावेश करता येईल. या नेत्यांनी आपल्या परीने परिसराच्या विकासाला चालना दिली आहे.सतत मंत्रीपदाचा माननंदुरबार विभागाला सतत अर्थात १९६७ पासून उपमंत्री, राज्यमंत्री ते कॅबीनेट मंत्रीपदाचा मान मिळत गेला आहे. तळोदा मतदार संघातून निवडून गेलेले डी.एन.पाडवी यांना तेंव्हाच्या सरकारमध्ये उपमंत्रीपदाचा मान मिळाला होता. त्यानंतर दिलवरसिंग पाडवी यांना राज्यमंत्रीपद मिळाले. काँग्रेसच्या काळात नंदुरबार मतदारसंघातून निवडून आलेले आर.पी.वळवी यांना काही काळ राज्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतरच्या काळात मात्र सातत्याने जिल्ह्याला नवापूर मतदार संघातून कॅबीनेट मंत्रीपद मिळत गेले ते सुरूपिसंग नाईक यांच्या रुपाने. सतत २० वर्ष ते कॅबीनेट मंत्री म्हणून राहिले. त्यानंतर १९९५ मध्ये नंदुरबारातून निवडून आलेले आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी युतीच्या काळात पाच वर्ष राज्यमंत्रीपद मिळविले. नंतर आघाडीच्या तीन सरकारांमध्ये ते कॅबीनेटमंत्री राहिले.आघाडीच्या सत्तेच्या काळात अर्थात १९९९ ते २०१४ पर्यंत जिल्ह्याला दोन कॅबीनेट मंत्री मिळत होते. २०१४ मध्ये सत्तांतर झाले. केंद्रीय राजकारणात भाजपने मुसंडी मारली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्रेझ निर्माण झाल्यानंतर अनेकांनी पक्षांतर केले. त्यात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनीही आघाडीच्या सरकारमधून मंत्रीपदाचा राजीनामा देत कन्येला भाजपमध्ये प्रवेश देत कन्या डॉ.हिना गावीत यांना लोकसभेत निवडून आणले. विधानसभेत ते स्वत: भाजपकडून निवडून आले. परंतू तेंव्हापासून अर्थात गेल्या पंचवार्षीकमध्ये भाजप सत्तेच्या काळात नंदुरबार मंत्रीपदापासून उपेक्षीत राहिले.पाच वर्ष उपेक्षाचभाजपच्या गेल्या पाच वर्षाच्या सत्ता काळात जिल्ह्याला मंत्रीपद मिळू शकले नाही. जिल्ह्यातून भाजपचे आमदार डॉ.विजयकुमार गावीत व उदेसिंग पाडवी हे दोन आमदार निवडून गेले होते. दरवेळी मंत्री मंडळाच्या विस्तारावेळी जिल्ह्याला मंत्रीपद मिळेल म्हणून चर्चा होत होती. परंतु पुर्ण पाच वर्ष जिल्हा मंत्रीपदाविनाच राहिला.दुर्गम भागाला न्यायसतत सात वेळा निवडून येण्याचा मान मिळविणारे आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांना यावेळी काँग्रेसने मंत्रीपदाचा मान दिला. ते निवडून येत असलेला मतदारसंघ अर्थात अक्कलकुवा व धडगाव तालुका पुर्ण डोंगराळ, दुर्गम व अविकसीत आहे. त्यामुळे एका अर्थाने अ‍ॅड.पाडवी यांच्या माध्यमातून दुर्गम भागाला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.काँग्रेस पक्षात आजच्या परिस्थितीत ज्येष्ठ नेत्यांमध्ये आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचा समावेश होतो. यावेळी त्यांना उमेदवार निवडीच्या कोअर कमिटीत स्थान होते. महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या चर्चांमधील प्रमुख नेत्यांमध्ये देखील आमदार अ‍ॅड.पाडवी यांचा समावेश होता. मंत्रीमंडळ विस्तारात त्यांचे नाव काँग्रेसतर्फे सतत वरच्या क्रमांकावरच घेतले जात होते.