शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सातपुड्याच्या दुर्गम भागाला अखेर मंत्रीमंडळात मिळाले प्रतिनिधीत्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:22 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : १९६७ पासून सतत मंत्रीपद मिळणाऱ्या नंदुरबारला पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा मंत्रीपद ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : १९६७ पासून सतत मंत्रीपद मिळणाऱ्या नंदुरबारला पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा मंत्रीपद मिळाले आहे. यावेळी सातपुड्याच्या दुर्गम भागाचे प्रतिनिधीत्व करणाºया आमदारांना प्रथमच संधी देण्यात आली आहे. आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि सतत सात वेळा निवडून आलेल्या लोकप्रतिनिला कॅबीनेट मंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्याला न्याय मिळाला आहे.संयुक्त धुळे जिल्हा असतांना नंदुरबार विभागाला नेहमीच मंत्रीपद मिळाले आहे. थेट डी.एन.पाडवी यांच्यापासून आतापर्यंत अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचा समावेश करता येईल. या नेत्यांनी आपल्या परीने परिसराच्या विकासाला चालना दिली आहे.सतत मंत्रीपदाचा माननंदुरबार विभागाला सतत अर्थात १९६७ पासून उपमंत्री, राज्यमंत्री ते कॅबीनेट मंत्रीपदाचा मान मिळत गेला आहे. तळोदा मतदार संघातून निवडून गेलेले डी.एन.पाडवी यांना तेंव्हाच्या सरकारमध्ये उपमंत्रीपदाचा मान मिळाला होता. त्यानंतर दिलवरसिंग पाडवी यांना राज्यमंत्रीपद मिळाले. काँग्रेसच्या काळात नंदुरबार मतदारसंघातून निवडून आलेले आर.पी.वळवी यांना काही काळ राज्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतरच्या काळात मात्र सातत्याने जिल्ह्याला नवापूर मतदार संघातून कॅबीनेट मंत्रीपद मिळत गेले ते सुरूपिसंग नाईक यांच्या रुपाने. सतत २० वर्ष ते कॅबीनेट मंत्री म्हणून राहिले. त्यानंतर १९९५ मध्ये नंदुरबारातून निवडून आलेले आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी युतीच्या काळात पाच वर्ष राज्यमंत्रीपद मिळविले. नंतर आघाडीच्या तीन सरकारांमध्ये ते कॅबीनेटमंत्री राहिले.आघाडीच्या सत्तेच्या काळात अर्थात १९९९ ते २०१४ पर्यंत जिल्ह्याला दोन कॅबीनेट मंत्री मिळत होते. २०१४ मध्ये सत्तांतर झाले. केंद्रीय राजकारणात भाजपने मुसंडी मारली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्रेझ निर्माण झाल्यानंतर अनेकांनी पक्षांतर केले. त्यात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनीही आघाडीच्या सरकारमधून मंत्रीपदाचा राजीनामा देत कन्येला भाजपमध्ये प्रवेश देत कन्या डॉ.हिना गावीत यांना लोकसभेत निवडून आणले. विधानसभेत ते स्वत: भाजपकडून निवडून आले. परंतू तेंव्हापासून अर्थात गेल्या पंचवार्षीकमध्ये भाजप सत्तेच्या काळात नंदुरबार मंत्रीपदापासून उपेक्षीत राहिले.पाच वर्ष उपेक्षाचभाजपच्या गेल्या पाच वर्षाच्या सत्ता काळात जिल्ह्याला मंत्रीपद मिळू शकले नाही. जिल्ह्यातून भाजपचे आमदार डॉ.विजयकुमार गावीत व उदेसिंग पाडवी हे दोन आमदार निवडून गेले होते. दरवेळी मंत्री मंडळाच्या विस्तारावेळी जिल्ह्याला मंत्रीपद मिळेल म्हणून चर्चा होत होती. परंतु पुर्ण पाच वर्ष जिल्हा मंत्रीपदाविनाच राहिला.दुर्गम भागाला न्यायसतत सात वेळा निवडून येण्याचा मान मिळविणारे आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांना यावेळी काँग्रेसने मंत्रीपदाचा मान दिला. ते निवडून येत असलेला मतदारसंघ अर्थात अक्कलकुवा व धडगाव तालुका पुर्ण डोंगराळ, दुर्गम व अविकसीत आहे. त्यामुळे एका अर्थाने अ‍ॅड.पाडवी यांच्या माध्यमातून दुर्गम भागाला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.काँग्रेस पक्षात आजच्या परिस्थितीत ज्येष्ठ नेत्यांमध्ये आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचा समावेश होतो. यावेळी त्यांना उमेदवार निवडीच्या कोअर कमिटीत स्थान होते. महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या चर्चांमधील प्रमुख नेत्यांमध्ये देखील आमदार अ‍ॅड.पाडवी यांचा समावेश होता. मंत्रीमंडळ विस्तारात त्यांचे नाव काँग्रेसतर्फे सतत वरच्या क्रमांकावरच घेतले जात होते.