शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

नंदुरबारात पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 19:32 IST

टंचाई : टँकर व जार पुरवठा करणाऱ्यांना मागणी

नंदुरबार : पाणी टंचाईची तीव्रता जशी वाढत आहे तसे पाणी विक्री करणाऱ्यांचे देखील फावत आहे. विशेषत: टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्यांना मोठी मागणी वाढली आहे. सध्या पाच हजार लिटरचे टँकर पाचशे रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. शुद्ध आणि गार पाण्याचे जार पुरविणाºयांकडेही मागणी वाढली आहे.नंदुरबार शहरालगत परंतु नगरपालिका हद्दीत नसलेल्या अनेक नवीन वसाहतींमध्ये तसेच लगतच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. कुपनलिका, विहिरी कोरड्या झाल्या आहेत. काही कुपनलिकांच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि पाण्याचा स्त्रोतच नसल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी देखील अशा कुपनलिकांना येवू लागले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी टँकरने पाणी पुरवठा करणाºयांचे चांगलेच फावले आहे. नंदुरबार शहर आणि लगतच्या परिसरात दररोज किमान ५० पेक्षा जास्त खाजगी टँकरच्या फेºया होत असल्याचे एका टँकर चालकाने सांगितले.५०० रुपये दरएका टँकरला अर्थात पाच हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरसाठी किमान ५०० रुपये मोजावेल लागत आहे. येत्या काळात मागणी वाढल्यानंतर त्यात काहीअंशी वाढ करण्याचे सुतोवाच टँकर चालक, मालक यांनी व्यक्त केली आहे. पाच हजार लिटर पाणी साठवण्याची सोय नसलेले नागरिक दोन किंवा तीनजण मिळून एक टँकर पाणी मागवत आहेत. महिन्याला विकतच्या पाण्यासाठी किमान तीन ते चार हजार रुपये मोजावे लागत आहे. पाच हजार लिटर क्षमतेच्या टँकरमध्ये पुर्ण क्षमतेचे पाणी असतेच असे नाही. वाहतूक करतांना काही प्रमाणात पाणी वाया जात असतेच.फिल्टर प्लान्ट चालकही तेजीतफिल्टर पाणी जार पुरवठा करणाºयांचाही धंदा सध्या चांगलाच तेजीत आला आहे. गेल्या महिनाभरापासून मागणी वाढली असल्याचे या क्षेत्रातील व्यावसायिकांनी सांगितले. नियमित ग्राहकांसह ज्यांच्या घरी कार्यक्रम, लग्न सोहळा आहे अशा ठिकाणी अतिरिक्त जार पुरवावे लागत आहेत. सध्या २० रुपये प्रतीनग जार अशा पद्धतीने पुरवठा केला जात आहे. सर्वच विक्रेत्यांची सेवा ही घरपोच आहे. १०० पेक्षा अधीक जारची मागणी असेल तर दरात सूट दिली जात आहे. नंदुरबारात गेल्या दोन वर्षात फिल्टर प्लान्टची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.पालिकेचे मशीन बंदपालिकेने पाच ते सहा ठिकाणच्या चौकात फिल्टर पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. पाच रुपयाच्या कॉईन टाकल्यावर पाच लिटर पाणी मिळविण्याची सोय त्यात आहे. अनेकांनी ते सोयीचे ठरले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यातील अनेक मशीन बंद अवस्थेत आहेत. सरू करण्याची मागणी आहे.शहरात पाणी टंचाईची तीव्रता वाढली असतांना पालिकेने शहरालगतच्या काही वसाहतींसाठी संबधीत ग्रामपंचायतींना मिटरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात ज्या ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठ्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही अशा ठिकाणीच पालिकेने पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात शहरवासीयांच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही असे पालिकेने स्पष्ट केले आहे.