शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बसेस आणि रेल्वेस्थानकातील गाडय़ा ‘स्टँडबाय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे प्रथमच रेल्वे आणि महामंडळाच्या बसेस एवढय़ा दीर्घ कालावधीसाठी बंद आहेत़ या काळात त्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे प्रथमच रेल्वे आणि महामंडळाच्या बसेस एवढय़ा दीर्घ कालावधीसाठी बंद आहेत़ या काळात त्यांची स्वच्छता करण्यासह दैनंदिन पाहणी करुन सर्वच गाडय़ा सज्ज ठेवण्यात आल्याचे रेल्वे आणि एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आल़े एसटी महामंडळाने जिल्ह्यातील चारही आगारातील प्रत्येकी 20 बसेस ह्या अत्यावश्यक  सेवेसाठी सज्ज ठेवल्या आहेत़ गर्दी होऊन कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असल्याने रेल्वेची सर्वच कामे बंद करण्यात आली आहेत़ प्रवासी गाडय़ा बंद असल्या तरी कोळसा, धान्य, फळे, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तू वाहून नेणा:या मालगाडय़ा धावत आहेत़ या पाश्र्वभूमीवर गँगमन, ट्रॅकमन आणि अधिकारी हे नियमित कामकाज करत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आल़े नवापुर ते दोंडाईचा दरम्यान नियमित ट्रॅक तपासणी, गेटची पाहणी व इतर कामांवर भर दिला जात आह़े मजूर आणि कर्मचा:यांची गर्दी टाळली जावी म्हणून रेल्वेकडून सुरु असलेली बांधकामेही बंद ठेवण्यात आली आहेत़ केंद्र शासनाकडून आदेश आल्यानंतरच रेल्वे सुरु होणार असली तरीही अत्यावश्यक वेळेसाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आल़े दुसरीकडे राज्य परिवहन मंडळाच्या शहादा, नंदुरबार, नवापुर आणि अक्कलकुवा आगारात पूर्णपणे शुकशुकाट आह़े प्रत्येक आगारात बसेस लावून ठेवण्यात आल्या आहेत़ बसेस यापूर्वीच स्वच्छ करण्यात आल्या असल्याने त्यांची दैनंदिन स्वच्छता करणे थांबवण्यात आले आह़े यंत्रशाळांमध्ये कर्मचारी एकमेकांच्या संपर्कात येणे शक्य असल्याने त्यांना सुटी देण्यात आली आह़े शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक आगारात 20 गाडय़ा ह्या सज्ज ठेवण्यात आल्या असून त्यासाठीचे चालक-वाहकही तयार ठेवण्यात आले आहेत़ परंतू अद्याप या गाडय़ांना बाहेर काढण्याची गरज पडलेली नसल्याने नियुक्त चालक वाहक केवळ हजेरी लावून परत जात आहेत़ नंदुरबारसह इतर चारही आगारांचे सरासरी 30 लाख रुपयांचे नुकसान दर दिवशी होत आह़े परंतू येत्या काळात बसेस पुन्हा सुरु झाल्यास नुकसान भरुन काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आल़े  उन्हाळ्यात यात्रा, सुटय़ा, लगAसराई यामुळे बसेसमध्ये प्रवासी वाढून उत्पन्न वाढीवर भर दिला जात होता़ परंतू लॉकडाऊनमुळे या उत्पन्नावर यंदा पाणी फेरले गेले आह़े