शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

हागणदारीमुक्त योजनेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST

ब्राह्मणपुरी : गावे हागणदारीमुक्त व्हावीत म्हणून शासन निर्मल ग्राम योजनेंतर्गत विविध योजना राबवित आहे. खेडोपाडी घरोघरी शौचालयाचे बांधकाम करण्यात ...

ब्राह्मणपुरी : गावे हागणदारीमुक्त व्हावीत म्हणून शासन निर्मल ग्राम योजनेंतर्गत विविध योजना राबवित आहे. खेडोपाडी घरोघरी शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. परंतु घरी शौचालय असतानाही उघड्यावर शौचास जाणे, घाण करणे सुरू असून, हागणदारीमुक्त योजनेचा बोजवारा उडाल्याचे वास्तव तालुक्यातील ग्रामीण भागात बघायला मिळत आहे.

शहादा तालुक्यात एकूण १५० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. गावागावात शौचालय बांधण्यात आले. असे असतानाही गावखेड्यात शौचालयाचा फारसा वापर होत नसल्याचे वास्तव आहे. ग्रामीण भागात कुठल्याही गावात प्रवेश करताना घाणीचे चित्र नजरेस पडते. नाकाला रूमाल लावूनच गावात प्रवेश करावा लागतो. ही बाब छोट्या गावातच नव्हे तर मोठ्या गावांमध्येही घाणीची समस्या पहायला मिळते. रस्त्याच्या दुतर्फा घाण केली जाते. गावे हागणदारीमुक्त व्हावीत म्हणून शासनाने निर्मल ग्राम योजना अनेक वर्षे राबविली. यासाठी गावागावात कलापथक, लघुपटाद्वारे जनजागृती केली गेली. परंतु आजची परिस्थिती पाहून ग्रामीण भागात हागणदारीमुक्तीचा फज्जा उडाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

साथरोग पसरण्याचा धोका

तालुक्यातील बहुतांश गावात उघड्यावर शौचास जाणे सुरूच आहे. यामुळे साथरोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाणीने बरबटलेले रस्ते, प्रदूषित हवा आरोग्यास धोकादायक ठरू शकते. घरी शौचालय आहे. परंतु त्याचा नियमित वापर करणे, शौचालय स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक सुजाण नागरिकांची सामाजिक जबाबदारी आहे. गाव परिसरातील नदीनाल्यांचे पाणी दूषित झाल्यास मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे निर्जंतुकीकरण करून, परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.