शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

हागणदारीमुक्त योजनेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST

ब्राह्मणपुरी : गावे हागणदारीमुक्त व्हावीत म्हणून शासन निर्मल ग्राम योजनेंतर्गत विविध योजना राबवित आहे. खेडोपाडी घरोघरी शौचालयाचे बांधकाम करण्यात ...

ब्राह्मणपुरी : गावे हागणदारीमुक्त व्हावीत म्हणून शासन निर्मल ग्राम योजनेंतर्गत विविध योजना राबवित आहे. खेडोपाडी घरोघरी शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. परंतु घरी शौचालय असतानाही उघड्यावर शौचास जाणे, घाण करणे सुरू असून, हागणदारीमुक्त योजनेचा बोजवारा उडाल्याचे वास्तव तालुक्यातील ग्रामीण भागात बघायला मिळत आहे.

शहादा तालुक्यात एकूण १५० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. गावागावात शौचालय बांधण्यात आले. असे असतानाही गावखेड्यात शौचालयाचा फारसा वापर होत नसल्याचे वास्तव आहे. ग्रामीण भागात कुठल्याही गावात प्रवेश करताना घाणीचे चित्र नजरेस पडते. नाकाला रूमाल लावूनच गावात प्रवेश करावा लागतो. ही बाब छोट्या गावातच नव्हे तर मोठ्या गावांमध्येही घाणीची समस्या पहायला मिळते. रस्त्याच्या दुतर्फा घाण केली जाते. गावे हागणदारीमुक्त व्हावीत म्हणून शासनाने निर्मल ग्राम योजना अनेक वर्षे राबविली. यासाठी गावागावात कलापथक, लघुपटाद्वारे जनजागृती केली गेली. परंतु आजची परिस्थिती पाहून ग्रामीण भागात हागणदारीमुक्तीचा फज्जा उडाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

साथरोग पसरण्याचा धोका

तालुक्यातील बहुतांश गावात उघड्यावर शौचास जाणे सुरूच आहे. यामुळे साथरोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाणीने बरबटलेले रस्ते, प्रदूषित हवा आरोग्यास धोकादायक ठरू शकते. घरी शौचालय आहे. परंतु त्याचा नियमित वापर करणे, शौचालय स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक सुजाण नागरिकांची सामाजिक जबाबदारी आहे. गाव परिसरातील नदीनाल्यांचे पाणी दूषित झाल्यास मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे निर्जंतुकीकरण करून, परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.