शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

बर्ड फ्लूवर ‘नंदुरबार पॅटर्न’चा उपाय हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:23 IST

नंदुरबार : देशात आणि राज्यात सध्या बर्ड फ्लूचा धोका वाढत असून, त्यामुळे आधीच कोरोनाने भयभीत झालेल्या जनमानसात अधिकच भीतीचे ...

नंदुरबार : देशात आणि राज्यात सध्या बर्ड फ्लूचा धोका वाढत असून, त्यामुळे आधीच कोरोनाने भयभीत झालेल्या जनमानसात अधिकच भीतीचे वातावरण दिसून येत आहे. या नव्या आजारावर उपायासाठी ‘नंदुरबार पॅटर्न’ उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात २००६ मध्ये काम करणाऱ्या यंत्रणेचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल.

देशात सर्वप्रथम २००६ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे बर्ड फ्लूची लागण झाली होती. नवापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर तेव्हा पोल्ट्री व्यवसाय सुरू होता. ६० पेक्षाही अधिक पोल्ट्री व्यवसाय त्या वेळी सुरू होते. तेथूनच महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश व विविध राज्यांत अंडी आणि कोंबड्यांचा पुरवठा होत होता. अतिशय भरभराटीला आलेल्या या व्यवसायावर त्या वेळी बर्ड फ्लूचे संकट कोसळले होते. त्यामुळे सुमारे ३५ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. बर्ड फ्लूचा एच-५ एन-१ हा मानवाला संक्रमित करणारा पहिला एव्हीएन इन्फ्लूएंझा हा विषाणू त्या वेळी नवापूरमध्ये आढळून आला होता. सुमारे २० हजारपेक्षा अधिक कोंबड्या त्यातून दगावल्या होत्या. देशात असा व्हायरस प्रथमच आल्याने त्या वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शन घेऊन या आजारावर तेव्हा प्रशासनाने मात केली होती. सायंटिफिक पद्धतीने पक्ष्यांची विष्ठा व पक्षी नष्ट करणे, त्यासाठी विशिष्ट आकाराचे खड्डे खोदणे, गावातील बस स्थानक गावाबाहेर तात्पुरत्या स्वरूपात सुरू करणे, रेल्वे थांबा बंद करणे, विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी विशिष्ट प्रकारची फवारणी करणे यासह अनेक उपाययोजना त्या वेळी करण्यात आल्या होत्या. त्यासाठी स्थानिक यंत्रणेला विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. नुकसानधारकांना तब्बल २० कोटींची मदत देण्यात आली होती. राज्य आणि केंद्र शासनाने संयुक्तपणे काम करून या संकटावर त्या वेळी मात केली होती.

सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तसेच राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब आदी काही राज्यांत बर्ड फ्लूची लागण झाली आहे. नवापूरमध्ये जो विषाणू आढळला होता तोच विषाणू या भागातही दिसून येत आहे. ही लागण सध्या तरी प्राथमिक स्तरावर असल्याने त्यावर तत्काळ नियंत्रण मिळविता येऊ शकेल. त्यासाठी नवापूरमध्ये प्रशिक्षित करण्यात आलेल्या यंत्रणेचा वापर होणे आवश्यक आहे. या ठिकाणी काम करणारे त्या काळातील अधिकारी सध्या राज्यातील विविध भागांत कार्यरत आहेत. त्यांचाही शोध घेऊन बर्ड फ्लूवर नियंत्रणासाठी नियोजनाची गरज आहे.

- डाॅ. पी. अन्बलगण यांचा अनुभव मोलाचा ठरेल

नवापूरमध्ये बर्ड फ्लू आला त्या वेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगण होते. ते स्वत: व्हेटर्नरी डाॅक्टर होते. त्यामुळे त्यांनी स्वत: त्यावर लक्ष केंद्रित केले होते. विशेष म्हणजे राज्य शासनाने त्यांना बर्ड फ्लूच्या प्रशिक्षणासाठी बँकॉकला पाठविले होते. सध्या ते औद्याेगिक विकास महामंडळाचे राज्याचे संचालक आहेत. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी जयंत गायकवाड यांचीही मोलाची भूमिका होती.