शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोंबड्या नष्ट करण्याची सर्वात मोठी मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : येथील चार पोल्ट्रीमधील आठ कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने रविवारपासून राज्यातील सर्वात मोठ्या किलिंग ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : येथील चार पोल्ट्रीमधील आठ कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने रविवारपासून राज्यातील सर्वात मोठ्या किलिंग ऑपरेशनला नवापुरात सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी यंत्रणेची कमतरता असल्याने पिंपळनेर चौफुलीजवळील डायमंड पोल्ट्रीत ४० हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले. दुसऱ्या दिवशी ८२ पथकांव्दारे नवापूर शहरातील डायमंड, परवेज पठाण, आमलीवाला, सहयोग, वासीम या पोल्ट्रीत कुक्कुट पक्षी नष्ट करण्याच्या कामास सकाळी साडे सातपासून सुरुवात झाली आहे.सकाळी सर्व पथकातील कर्मचाऱ्यांना पीपीई किट परिधान करून टॉमी फ्लूच्या गोळ्या घेऊन कलिंग करण्यासाठी पोल्ट्रीतील शेड मध्ये पाठवण्यात आले. एक किलोमीटर परिसरातील दीड लाख कुकुट पक्षी दोन दिवसात नष्ट करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाचे आहे. त्याच्या एक किलोमीटर परिसरातील १० पोल्ट्री फार्म मधील पाच लाख पक्षी अगोदर नष्ट केले जाणार आहेत.पोल्ट्री व्यवसायिक यांचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. तर यावर अवलंबून असलेल्या उद्योगातील हजारो तरुण बेरोजगार होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.नवापूर मधील चार पोल्ट्री मधील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे समोर आले त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या किलिंग ऑपरेशन मध्ये काल दिवसभरात २०० पशुवैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ४० हजार कोंबड्या नष्ट केल्यात आज कर्मचारी संख्या वाढल्याने दुप्पट कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत. अगोदर चार पोल्ट्री मधील दीड लाख पक्षी नष्ट केले जातील. त्यानंतर एक किलो मिटर परिसरात येणाऱ्या पोल्ट्री मधील ४ लाख ९० हजार पक्षी नष्ट केलं जाणार आणि उर्वरित पक्ष्यांसंदर्भात पाठविलेले अहवाल आल्या नंतर निर्णय घेण्यात येणार आहेत .पहिल्या टप्प्यात जवळपास ६ लाख कोंबड्या नष्ट केल्या जातील तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ३ लाख कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी दिली.महसूल आयुक्तांची भेट व पाहणीनवापुरातील बर्ड फ्लू झालेल्या पोल्ट्रीची दुसऱ्या दिवशी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भेट देऊन पाहणी केली व व्यावसायिक व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्या. बर्ड फ्लू नियंत्रणासाठी योग्य कामगिरी करण्याचा सूचना केल्या.

बर्ड फ्लूनंतर व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, त्या अनुषंगाने शासननिर्णयानुसार मिळणारी नुकसान भरपाई तोडकी आहे, असे मत व्यावसायिकांनी मत व्यक्त केले आहे. कोंबड्यां सोबत अंडी आणि कोंबड्यांचे खाद्य नष्ट केले जात असल्याने होणारे नुकसान मोठे आहे. नवापूरमध्ये जवळपास करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. एकूणच पोल्ट्री व्यवसाय नष्ट होण्याचा मार्गावर आहे.बर्ड फ्ल्यू मुळे पोल्ट्री व्यसायिकाना कोट्यवधी चा फटका बसला असला तरी पशुसंवर्धन विभागाची अनास्था कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.