शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

बेडकी ते कोंडाईबारी रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेडकी ते कोंडाईबारी रस्त्याची दोन वर्षापासून अक्षरश: चाळण झालेली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेडकी ते कोंडाईबारी रस्त्याची दोन वर्षापासून अक्षरश: चाळण झालेली आहे. बेडकी ते चिंचपाडा या 15 किलोमीटर अंतरात येणा:या तीन पुलांची अत्यंत दयनिय अवस्था झाल्याने अधिकारी महाड सारखी दुर्घटना होण्याची वाट बघत आहेत की, काय असा प्रश्न उपस्थित होत असून, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेल्या 93 लाख रुपयांच्या खर्चाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम करणा:या कंपनीकडून कामे होत नसल्याने रस्त्याचे अर्धवट काम झाले आहे. त्यामुळे जागो जागी वळण रस्ते करून ठेवले आहेत. महामार्गावरुन होत असलेली अवजड वाहतूक पाहता रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य तयार झाले असल्याने वाहतुकदारांमधून रस्ता दुरुस्तीसाठी दबाव वाढल्याने 93 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सामाजिक कार्यकत्र्याकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका:यांना रस्त्याची दुर्दशा व होत असलेले अपघात याबाबत अवगत करुन दिले होते. आंदोलनाच्या माध्यमातून व पाठपुरावा केल्याने ब:याच कालावधी नंतर रस्ता दुरुस्तीची सुरुवात करण्यात आली. माती मुरुमाचा भराव व थातुर मातुर अर्धवट दुरुस्ती केल्याने महामार्गावरील नियमित अवजड वाहतुकीमुळे पहिल्याच पावसात रस्त्याची दयनिय अवस्था पूर्ववत झाली आहे. रोजच होणारी वाहतुकीची कोंडी व होणारे अपघात पाहता पावसाळ्यात या रस्त्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भ्वणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने 93 लाख रुपयांचा निधी रस्ता दुरुस्तीसाठी खर्च केल्याचे कागदोपत्री दाखवले आहेत. सामाजिक कार्यकर्ते मं.गं. येवले व माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी 25 जून रोजी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे व निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिका:यांना जवाबदार ठरविण्यात येऊन त्यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे येथील अधिका:यांच्या हलगर्जीपणामुळे हे काम अर्धवट सोडून लोकांच्या जीवाशी जीवघेणा खेळ होत असल्याने कायदा सुव्यवस्था बिघडल्यास संबधित अधिका:यांची जवाबदारी निश्चित करावी. रस्ता दुरुस्तीसाठी मंजूर झालेले 93 लाख रुपये कोठे व कसे वापरण्यात आले याबाबत चौकशी करून कार्यवाही व्हावी असे निवेदनात म्हटले आहे.

बेडकी ते चिंचपाडा या 15 किलोमीटर अंतरात वाकीपाडा, नवापूर शहर व रांयगण येथील तीन पुलांची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. तिनही पूल क्षतीग्रस्त  झाल्याने पूल पार करतांना वाहनचालक जीवमुठीत धरून मार्गक्रमण करीत आहेत. याआधीही या पुलांची दुर्दशा व दुरुस्ती झाली आहे. मात्र अशी दुरुस्ती अल्पकाळ टिकून राहिल्यानंतर परिस्थिती जैसे थे होत आली आहे. हे पाहता 93 लाख रुपये खर्चात तिनही पुलांची तातडीने व चांगल्या स्वरुपाची गुणात्मक व दर्जेदार अशी दुरुस्ती होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे झाले नसल्याने अधिकारी महाड सारखी दुर्घटना होण्याची वाट बघत आहेत की, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.