शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

संविधान जागरसाठी दोन गावांची बार्टीकडून निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समतेवर आधारित समाज निर्मितीसाठी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समतेवर आधारित समाज निर्मितीसाठी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत संविधान साक्षर ग्राम उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांसाठी जिल्ह्यात पातोंडा ता.नंदुरबार व नवलपूर ता. शहादा या दोन गावांची निवड करण्यात आली आहे.आगामी साजरी होणा:या संविधान दिनाच्या पाश्र्वभूमीवर बार्टीमार्फत संपूर्ण राज्यात संविधान साक्षर ग्राम हा उप्रकम हाती  घेण्यात घेण्यात आला आहे. हा उपक्रम बार्टीच्या समता विभागामार्फत राबविण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यात दोन अशा एकुण 72 गावांची निवड करण्यात आली               आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यात  पातोंडा ता.नंदुरबार व नवलपूर ता.शहादा या दोन गावांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमांसाठी नंदुरबार जिल्ह्यात  सात समतादूतांचे पथक कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत हे उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात प्रथम गावाचा सुक्ष्म आराखडा, नकाशा तयार करीत ग्रामस्थांच्या   नियोजित बैठका घेण्यात येत आहे. त्यासाठी सरपंच, पोलीस पाटील, आशा वर्कर्स, अंगणवाडी  कर्मचारी व शाळा मुख्याध्यापक  यांचे सहकार्य घेतले जात आहे. पातोंडा येथे ग्रामस्थांच्या बैठका व शालेय विद्याथ्र्यासाठी जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले.  यावेळी बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी, सारिका दहिवेलकर,  मिनाक्षी दांडवेकर, मुख्याध्यापक राजीव पावरा यांच्या जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.उपक्रमात भारतीय राज्यघटनेचे महत्व, अंमलबजावणी,  कायदे याविषयी माहिती दिली जात आहे.  स्थानिक अधिका:यांच्या  बैठका घेत 100 टक्के संविधान साक्षरतेची गरज, प्रचार, प्रसार या विषयावर चर्चात्मक आराखडा  तयार करण्यात येत आहे. युवा वर्ग बचत गटातील महिला, शेतकरी गट, विविध मंडळ यांच्यासमोर संविधान साक्षरतेची संकल्पना स्पष्ट करीत विद्याथ्र्यासाठी हस्तकला, चित्रकला स्पर्धा. गांडूळखत प्रकल्प, परसबाग, स्वच्छतेचे महत्व सांगत रोज प्रास्तविका वाचनाची सवय लावण्याचा प्रय} करण्यात येत आहे.

महिलांसाठी घेण्यात येणा:या कार्यशाळेत व्यसनमुक्ती, बचतीची सवय, आरोग्य व स्वच्छता, लेक वाचवा-लेक वाढवा या विषयावर प्रबोधन, महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढवणे, महिलांसाठी आरोग्य कॅम्प आयोजित करणे. ग्राम स्वच्छता अभियान राबविणे, विविध स्पर्धा  घे:यात येत आहे.4युवक-युवतींसाठीच्या कार्यशाळेत भारतीय संविधान व मुलभूत अधिकार या विषयावर शासकीय अधिकारी व प्रत्येक घरात राज्यघटना देणे राज्यघटनेची प्रास्ताविका भिंतीवर लावणे, शाळेत भारतीय संविधानाची प्रास्ताविका लावणे, नियमित वाचन घेणे, संविधान उद्देशिपत्रिकेची कोनशीला तयार करणे असे काही उपक्रम राबविण्यात येत आहे.