शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

संविधान जागरसाठी दोन गावांची बार्टीकडून निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समतेवर आधारित समाज निर्मितीसाठी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समतेवर आधारित समाज निर्मितीसाठी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत संविधान साक्षर ग्राम उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांसाठी जिल्ह्यात पातोंडा ता.नंदुरबार व नवलपूर ता. शहादा या दोन गावांची निवड करण्यात आली आहे.आगामी साजरी होणा:या संविधान दिनाच्या पाश्र्वभूमीवर बार्टीमार्फत संपूर्ण राज्यात संविधान साक्षर ग्राम हा उप्रकम हाती  घेण्यात घेण्यात आला आहे. हा उपक्रम बार्टीच्या समता विभागामार्फत राबविण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यात दोन अशा एकुण 72 गावांची निवड करण्यात आली               आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यात  पातोंडा ता.नंदुरबार व नवलपूर ता.शहादा या दोन गावांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमांसाठी नंदुरबार जिल्ह्यात  सात समतादूतांचे पथक कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत हे उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात प्रथम गावाचा सुक्ष्म आराखडा, नकाशा तयार करीत ग्रामस्थांच्या   नियोजित बैठका घेण्यात येत आहे. त्यासाठी सरपंच, पोलीस पाटील, आशा वर्कर्स, अंगणवाडी  कर्मचारी व शाळा मुख्याध्यापक  यांचे सहकार्य घेतले जात आहे. पातोंडा येथे ग्रामस्थांच्या बैठका व शालेय विद्याथ्र्यासाठी जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले.  यावेळी बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी, सारिका दहिवेलकर,  मिनाक्षी दांडवेकर, मुख्याध्यापक राजीव पावरा यांच्या जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.उपक्रमात भारतीय राज्यघटनेचे महत्व, अंमलबजावणी,  कायदे याविषयी माहिती दिली जात आहे.  स्थानिक अधिका:यांच्या  बैठका घेत 100 टक्के संविधान साक्षरतेची गरज, प्रचार, प्रसार या विषयावर चर्चात्मक आराखडा  तयार करण्यात येत आहे. युवा वर्ग बचत गटातील महिला, शेतकरी गट, विविध मंडळ यांच्यासमोर संविधान साक्षरतेची संकल्पना स्पष्ट करीत विद्याथ्र्यासाठी हस्तकला, चित्रकला स्पर्धा. गांडूळखत प्रकल्प, परसबाग, स्वच्छतेचे महत्व सांगत रोज प्रास्तविका वाचनाची सवय लावण्याचा प्रय} करण्यात येत आहे.

महिलांसाठी घेण्यात येणा:या कार्यशाळेत व्यसनमुक्ती, बचतीची सवय, आरोग्य व स्वच्छता, लेक वाचवा-लेक वाढवा या विषयावर प्रबोधन, महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढवणे, महिलांसाठी आरोग्य कॅम्प आयोजित करणे. ग्राम स्वच्छता अभियान राबविणे, विविध स्पर्धा  घे:यात येत आहे.4युवक-युवतींसाठीच्या कार्यशाळेत भारतीय संविधान व मुलभूत अधिकार या विषयावर शासकीय अधिकारी व प्रत्येक घरात राज्यघटना देणे राज्यघटनेची प्रास्ताविका भिंतीवर लावणे, शाळेत भारतीय संविधानाची प्रास्ताविका लावणे, नियमित वाचन घेणे, संविधान उद्देशिपत्रिकेची कोनशीला तयार करणे असे काही उपक्रम राबविण्यात येत आहे.