शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
4
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
5
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
6
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
7
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
8
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
10
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
11
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
13
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
14
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
15
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
16
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
17
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
18
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
19
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
20
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!

जिल्ह्याची केळी सातासमुद्रापार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:37 IST

हिरालाल रोकडे । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : केंद्र व राज्य राज्य शासनाची कुठलीही मदत न घेता केवळ आपल्या ...

हिरालाल रोकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : केंद्र व राज्य राज्य शासनाची कुठलीही मदत न घेता केवळ आपल्या हिमतीवर व मेहनतीच्या जोरावर ब्राह्मणपुरी ता.शहादा येथील शेतकऱ्यांनी पिकवलेली केळी आखाती देशात निर्यात करून आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली निर्यात व्यापक चळवळ ठरली असून यातून शेतकऱ्यांना हमखास व भरघोस उत्पन्न मिळत आहे.केळी हे तसे नाशवंत पीक. केळीला शासनाने हमीभाव जाहीर केलेला नाही. परिणामी वर्षभर मेहनत करूनही परप्रांतीय व्यापारी देतील तोच भाव स्वीकारायचा व दरवर्षी पारंपरिक पद्धतीने केळीचे उत्पादन घ्यायचे. यातून बºयाचदा परप्रांतीय व्यापाºयांनी परिसरातील शेतकºयांची केलेली आर्थिक फसवणूक यामुळे केळीची शेती करायची किंवा नाही अशा विवंचनेत स्थानिक शेतकरी असताना परिसरातील प्रगतीशील शेतकरी स्व.नरोत्तम मंगेश पाटील यांनी २०१६ केळी निर्यातीचा विचार केला. यासाठी त्यांनी गुजरात राज्यातील एका खाजगी कंपनीशी संपर्क साधून परदेशात निर्यातीसाठी योग्य असलेली केळी आपल्या भागात कशा पद्धतीने उत्पादित केली जाईल याबाबत माहिती व मार्गदर्शन घेऊन केळीची लागवड केली. त्यातून त्यांनी सर्वप्रथम आखाती देशात केळीची निर्यात केली. स्थानिक बाजारभावापेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याने त्यांनी सुरू केलेल्या या प्रयोगाला पुढच्यावर्षी परिसरातील अनेक शेतकºयांनी सहमती देत निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या केळीचे उत्पादन घ्यावयास सुरुवात केली. स्व.नरोत्तम पाटील यांनी केळी निर्यातीच्या लावलेल्या या रोपट्याचे परिसरातील शेतकºयांनी वटवृक्षात रूपांतर केले आहे.कोल्हापूर येथील धरती अ‍ॅग्रो व गुजरात राज्यातील देसाई अ‍ॅग्रो व एनआयए अ‍ॅग्रो या कंपन्यांच्या माध्यमातून निर्यातीसाठी योग्य असणाºया केळीची लागवड व उत्पादन घेतले जात आहे. परदेशात निर्यातीसाठी आवश्यक ते सर्व सोपस्कार या खाजगी कंपन्या करतात. केळीचे पीक तयार झाले की याच कंपन्या शेतकºयांच्या बांधापर्यंत येऊन शेतातून केळीची कापणी करून त्याची आवश्यक ती रासायनिक प्रक्रिया पार पडल्यानंतर सहा व १३ किलो वजनाचे बॉक्स पॅकिंग केले जाते. त्यानंतर ही प्रक्रिया केलेली केली मुंबईपर्यंत नेल्यानंतर तेथून परदेशात निर्यात केले जाते.ब्राह्मणपुरी येथील संजय उत्तम पाटील, विठ्ठल मंगेश पाटील, रोहिदास मंगेश पाटील, गोपाळ मंगेश पाटील, जगन्नाथ नारायण पाटील, अनिल पाटील, अंशुमन पाटील आदी शेतकºयांनी गेल्या तीन वर्षात सर्वाधिक केळी आखाती देशात निर्यात करून शेतकºयांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे केळीच्या निर्यातीसाठी केंद्र व राज्य शासनाची कुठलीही मदत अथवा मार्गदर्शन या शेतकºयांना लाभलेले नाही. केवळ स्वत:च्या हिमतीवर व मेहनतीवर या शेतकºयांनी खाजगी कंपनीच्या सहकार्याने केळीची निर्यात यशस्वीपणे पार पाडली आहे.