शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

निकषांमुळे किसान मानधन योजनेकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विविध निकष आणि अटींमुळे प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला जिल्ह्यात अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विविध निकष आणि अटींमुळे प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला जिल्ह्यात अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. 9 ऑगस्टपासून ही योजना सुरू झाली असली तरी तिला नगण्य प्रतिसाद आहे. यासाठी गावागावात तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. किमान प्रतिमाह पेन्शन वाढविणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया शेतक:यांच्या आहेत. 9 ऑगस्ट पासून प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू करण्यात आली             आहे. 18 ते 40 वयोगटातील दोन हेक्टर्पयत शेती असलेले जिल्ह्यातील सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकरी या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. पात्र लाभाथ्र्यांना वयाची 60 वर्षे पुर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान        योजनेमध्ये लाभ घेतलेले लाभार्थी या योजनेमध्ये पात्र आहेत. योजनेत         सहभागी होण्यासाठी गाव पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये लाभार्थी नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी करताना लाभार्थी शेतक:यास          कोणत्याही  प्रकारची रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. नोंदणीनंतर लाभाथ्र्याच्या योजनेत नोंदणी केलेल्या  बँक खात्यातून लाभार्थी हिश्याची            रक्कम ऑटो डेबीटने विमा कंपनीकडे जमा होईल. शासनातर्फे तेवढ्याच प्रमाणात रक्कम जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम वयानुसार प्रतिमाह साधारण 55 ते 200 रुपयार्पयत असेल. वृद्ध शेतक:यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. लाभाथ्र्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पती किंवा प}ीला योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थी नोंदणीसाठी गावनिहाय   लाभार्थी नोंदणी कॅम्प आयोजित   करण्यात येणार आहे. तसेच लाभाथ्र्यांना पेन्शनकार्ड देण्यात येणार आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना, कर्मचारी राज्य विमा योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना किंवा प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजनेचे लाभार्थी, घटनात्मक पदावर काम करणारे व्यक्ती, आजीमाजी मंत्री, संसद सदस्य, विधीमंडळ सदस्य, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवत असेलले किंवा निवृत्त कर्मचारी, आयकर भरणारी व्यक्ती, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट, आकीर्टेक्ट आदी व्यवसायातील व्यक्ती या योजनेचा  लाभ घेण्यासाठी पात्र असणार नाहीत. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थी शेतक:यांनी ग्रामसेवक,  तलाठी किंवा कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा आणि आपले                      सरकार केंद्रात नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.