शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

नंदुरबारात रब्बीचे क्षेत्र यंदा निम्मेने घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:43 IST

गहू, हरभरा क्षेत्रालाही फटका : कुपनलिका, विहिरी अटल्या, सिंचन प्रकल्पांमध्ये ठणठणाट

नंदुरबार : : पाण्याची टंचाई व दुष्काळसदृष्य स्थिती यामुळे जिल्ह्यात यंदा रब्बीची पेरणी निम्म्यावर येणार आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात सर्वाधिक गहू आणि हरभराची पेरणी केली जाते. या दोघांचे क्षेत्र देखील यंदा मोठय़ा प्रमाणावर घटणार आहे. जिल्ह्यात रब्बी व उन्हाळी पिकांचे क्षेत्र जवळपास आठशे हेक्टरच्या आसपास आहे. दरम्यान, सिंचन प्रकल्पात आतापासूनच ठणठणाट असल्यामुळे रब्बीसाठी आवर्तने यंदा सुटणार नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात खरीप हंगाम हातचा गेला आहे. सरासरीचा केवळ 67 टक्के पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची उत्पादकता निम्म्यावर   आली होती. अनेक पिके पावसाअभावी वाया गेली होती. यामुळेच शासनाने जिल्ह्यातील सर्वच खरीप आणि रब्बी गावाची पैसेवारी 50 पैशांच्या आत जाहीर करण्यात आली आहे. खरीप प्रमाणेच आता रब्बीचाही हंगाम जेमतेमच राहणार असल्याचे चित्र आहे. सद्य स्थितीत रब्बीची पेरणी आठ ते नऊ टक्केंवर झाली आहे. येत्या काळात थंडीची तीव्रता वाढणार असल्यामुळे आताच पेरणीसाठी योग्य काळ         असल्याचे कृषी विभागाचे म्हणने आहे.गहूचे क्षेत्र सर्वाधिकजिल्ह्यात रब्बी हंगामातील गहूचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्या खालोखाल हरभराचे क्षेत्र असून ज्वारीही मोठय़ा प्रमाणावर पेरली जाते. जिल्हतील एकुण रब्बीचे क्षेत्र लक्षात घेता बागायतदार शेतकरीच सर्वाधिक रब्बीची पेरणी करतात. एकुण आठशे हेक्टर क्षेत्र असून त्यात गहूचे 217.62 हेक्टर, ज्वारीचे 241.8 हेक्टर, मकाचे 15.79 हेक्टर, हरभराचे 201.53 हेक्टर, करडई 3.98, सूर्यफूल 6.14, इतर तृणधान्य 3.2, इतर कडधान्य 3.62, इतर गळीतधान्य 20.9 हेक्टर असे एकुण रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे. याशिवाय उन्हाळी हंगामाचे 81.6 हेक्टर क्षेत्र आहे. त्यात भुईमूग 73.8, सूर्यफूल 2.2, मका 5.6 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.निम्मे क्षेत्र घटणारयंदा रब्बीचे क्षेत्र निम्मे घटणार आहे. गेल्यावर्षी पजर्न्यमान चांगले असल्यामुळे रब्बीचे क्षेत्र 100 टक्केपेक्षा अधीक झाले होते. त्यात गहूचे क्षेत्र सर्वाधिक झाले होते. यंदा मात्र, पाऊसच नसल्यामुळे आणि विहिरी, कुपनलिका यांची पाणीपातळी खोल गेल्याने पेरणी निम्मे क्षेत्रात होणार नाही.याशिवाय लघु व मध्यम सिंचन प्रकल्पात देखील ठणठणाट असल्यामुळे रब्बीसाठी पाण्याचे अवर्तने सुटण्याचा प्रश्नच राहणार नाही. त्यामुळे शेतक:यांच्या हातून यंदा रब्बी हंगाम देखील निसटला आहे.चा:याची चणचण भासणारखरीप वाया गेला, आता रब्बीही येणार नसल्यामुळे या पिकांपासून मिळणारा चाराच यंदा उपलब्ध होणार नसल्यामुळे शेतक:यांपुढे मोठी बिकट परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात शेतक:यांना चा:यासाठी शोधाशोध करावी लागणार आहे. उन्हाळ्याच्या चार महिन्यांसाठी शेतक:यांना रब्बी पिकांपासून मिळणारा चारा उपयोगी पडतो. खरीप पिकांचा चारा मार्च, एप्रिलर्पयत टिकत असतो. यंदा हे चक्रच बिघडणार असल्यामुळे शेतक:यांचे अर्थकारण विस्कटणार आहे.