शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

५७ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:24 IST

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींची मुदत १८ जुलै २०२१ ला संपत आहे. त्यामुळे साहजिकच विद्यमान ...

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींची मुदत १८ जुलै २०२१ ला संपत आहे. त्यामुळे साहजिकच विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षाचा कालावधी देखील संपला आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकाच्या नियुक्तीसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे यांनी शुक्रवारी तसे आदेश देखील काढले आहेत. सर्वात जास्त ग्रामपंचायती तळोदा तालुक्यात ३५, अक्कलकुवा १३ तर धडगाव तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये बोरद, वाण्याविहीर, तोरणमाळ, प्रतापपूर, मोदलपाडा, चिनोदा, आमालाड या मोठ्या ग्रामपंचायतींचा ही समावेश आहे. या ग्रामपंचायतींमधील वॉर्ड रचना आधीच पूर्ण करण्यात आली आहे. साहजिकच निवडणूक आयोग आता केव्हा निवडणुका घेते याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे.

प्रशासकांपुढे कामकाजाचे आव्हान

जिल्ह्यातील ५७ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने जिल्हा परिषदेने त्यांच्यावर प्रशासकाची नियुक्ती केली असली तरी प्रशासकांना अपला कार्यभार सांभाळण्याचे आव्हान कायम आहे. कारण आधीच पंचायत समित्यांमध्ये वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची प्रचंड वाणवा आहे. त्या कर्मचाऱ्यांना एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचे कामकाज दिले आहे. साहजिकच त्यांच्यापुढे कामाचा ही मोठा ताण वाढला आहे. विशेषतः तळोदा तालुक्यात हे चित्र पहावयास मिळत आहे. आधीच सातपुड्यातील ग्रामीण दऱ्याखोऱ्यात तालुका पसरला आहे. याशिवाय अनेक ग्रुप ग्रामपंचायती समाविष्ट आहेत. त्यामुळे काम करताना प्रशासकांची चांगलीच दमछाक होणार आहे. त्यातही आता दहावी-बारावीचे निकाल लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाने याबाबत प्रशासकांना गावात नियमित जाणे सक्तीचे आहे.

अवघ्या १६ प्रशासकांवरच भार

तब्बल ५७ ग्रामपंचायतींची मुदत संपली असली तरी या सर्व ग्रामपंचायतींचा भार केवळ १६ अधिकाऱ्यांवरच सोपविण्यात आला आहे. काही प्रशासकांवर तब्बल चार ग्रामपंचायतींचा भार आहे. यापूर्वी देखील इतर ग्रामपंचायतींवर त्यांना कामकाज करावे लागत आहे.