शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

सारंगखेडा पर्यटन हब व प्रकाशा, तोरणमाळ विकासाच्या घोषणा हवेतच विरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:22 IST

नंदुरबार : सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून पर्यटन हब करायचे आणि प्रकाशा तीर्थक्षेत्र व तोरणमाळ पर्यटन केंद्राचा चेहरामोहरा बदलायची घोषणा ...

नंदुरबार : सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून पर्यटन हब करायचे आणि प्रकाशा तीर्थक्षेत्र व तोरणमाळ पर्यटन केंद्राचा चेहरामोहरा बदलायची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन पर्यटनमंत्री जयपाल रावल यांनी केली होती. परंतु सरकार बदलले आणि सर्व घोषणाही हवेतच विरल्याची स्थिती आहे. चेतक फेस्टिव्हलला निधीदेखील देण्यास बंद केल्याचे गेल्यावर्षी स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळे पुन्हा उपेक्षित राहिली आहेत.

सारंगखेडा येथील पहिल्या चेतक फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी अर्थात चार वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींचा लवाजमा सारंगखेडा येथे दाखल झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री यांनी विविध घोषणा केल्या होत्या. त्यामुळे जिल्हावासीयांना पर्यटनस्थळाचा आणि धार्मिक क्षेत्राचा विकास होईल अशी आशा लागली होती. परंतु सतत तीन वर्ष मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलला हजेरी लावून गेले, कार्यवाही मात्र पुढे सरकली नाही. त्यानंतर गेल्यावर्षी सरकार बदलले आणि चेतक फेस्टिव्हलचा निधी देणे बंद झाले. केलेल्या घोषणाही कागदावरच राहिल्या.

..काय होत्या घोषणा

सारंगखेडा यात्रेत घोडे खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होते. देशभरातील नामवंत घोडे, विविध प्रजातींचे घोडे येथे विक्रीस येतात. ही बाब लक्षात घेता सारंगखेडा येथे अश्व प्रजनन केंद्र व अत्याधुनिक पशुवैद्यकीय दवाखाना स्थापन करण्यात येणार होता. देशभरातील घोड्यांच्या प्रजातींचे संशोधन व प्रजननसंदर्भात येथे काम होणार होते. त्यासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली होती. अश्व प्रजनन केंद्राचे आणि अश्व संग्रहालयाचेे प्राथमिक स्ट्रक्चरदेखील तयार झाले होते. निधी देऊन ते काम सुरू होणार तोच राज्यातील सरकार बदलले आणि हा प्रोजेक्ट फाइलबंद झाला.

याच ठिकाणी तापीवर मोठे बॅरेज आहे. सारंगेखडा ते प्रकाशा या दोन बॅरेजच्या पाण्यामुळे तापी बारमाही भरलेली असते. त्याचा उपयोग करून येथे जलपर्यटनाला वाव देऊन जलक्रीडेचे विविध साहित्य आणण्याचे ठरले. नाशिक येथील गंगापूर धरणात असलेल्या एमटीडीसीच्या बोटी येथे दाखल झाल्या; परंतु यात्रेनंतर त्या एकाजागी बांधून ठेवण्यात आल्या. आता त्या पुन्हा गंगापूर धरणात गेल्या.

सारंगखेडाप्रमाणेच दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा तीर्थक्षेत्राचादेखील विकास करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. परंतु तोही कागदावरच राहिला. प्रकाशा केवळ तीर्थक्षेत्र विकास निधीतून तोकडा निधी मिळून त्याद्वारे कामे केली जात आहेत.

तोरणमाळ येथील पर्यटन केंद्राचा विकासदेखील पुढे सरकू शकला नाही. येथील रोपवे, पॅराग्लायडिंग, इको टुरिझम, हेलिकॅाप्टर राइड या घोषणा स्वप्नवत होत्या व अद्यापही स्वप्नच बनून राहिल्या आहेत.

नवीन सरकारने तरी यातील काही प्रस्तावांच्या फाइलींवरील धूळ झटकावी, अशी अपेक्षा जिल्हावासीयांची आहे.