शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी ऊस करपला तर केळीवर फिरवला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 13:05 IST

गुलाबसिंग गिरासे ।  लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील मोड शिवारात उसाच्या बियाण्यासाठी लावलेला ऊस पाण्याअभावी करपल्याने शेतक:याला ...

गुलाबसिंग गिरासे । लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोड शिवारात उसाच्या बियाण्यासाठी लावलेला ऊस पाण्याअभावी करपल्याने शेतक:याला प्रचंड नुकसान सहन करावे लागले तर कळमसरे शिवारातही पाण्याची पातळी खोल गेल्याने एका शेतक:यावर केळीच्या उभ्या झाडांवर नांगर फिरविण्याची वेळ आली. पजर्न्यमानाची स्थिती दरवर्षी अशीच राहिली तर सुजलाम् सुफलाम् असलेल्या या परिसरातील शेतक:यांवर मोठे संकट येणार आहे.तळोदा तालुक्यातील मोड येथील शेतकरी प्रवीण रमण नवले यांनी आपल्या मोड शिवारातील पाच एकर क्षेत्रात बियाण्यासाठी उसाची लागवड केली होती. कर्नाल 238 या जातीच्या उसाची बियाण्यासाठी त्यांनी जुलै 2018 मध्ये लागवड केली होती. जास्त उत्पन्न देणारी ही उसाची जात असल्याने परिसरातील शेतक:यांनाही त्याचा लाभ होईल म्हणून नवले यांनी पाच एकर क्षेत्रात लागवड केली. हे बियाणे तयार झाल्यानंतर शेतक:यांना विकून उर्वरित बियाणे स्वत:च्या शेतात लागवड करण्याचे नियोजन नवले यांनी केले होते. परंतु मागीलवर्षी पाऊस कमी झाल्याने या परिसरातील पाण्याची पातळी कधी नव्हे एवढी खोल गेली आहे. त्यातच नवले यांच्या शेतातील कूपनलिकाही आटली. त्यामुळे उसाची वाढ खुंटून हे बियाण्यासाठी लावलेले उसाचे पीक अक्षरश:                करपत आहेत. तापमानाची स्थिती अशी राहिली व पाऊस लांबला तर उसाचे बियाणे या शेतक:याला काढून फेकावे लागणार आहे. या पिकासाठी त्यांना आतार्पयत एकरी 32 हजार रुपये खर्च आला आहे. पाण्याअभावी उसाचे पीक वाया जाणार असल्याने या शेतक:यांला आर्थिक नुकसानीचा फटका बसणार  आहे.कळमसरे, ता.तळोदा शिवारातील केळी उत्पादक शेतकरी भगवान गोविंद लोहार यांनी आपल्या शेतात केळी पिकाची लागवड केली होती. त्यांच्या शेतातील केळीच्या झाडांची साडेतीन ते चार फुटार्पयत वाढ झाल्यानंतर कुपनलिका आटली. वाढते तापमान व केळी पिकाला पुरेसे पाणी न               मिळाल्याने झाडांची वाढ खुंटून ते कमजोर झाल्याने शेवटी लोहार यांच्यावर           केळीच्या झाडांवर नांगर फिरविण्याची वेळ आली. ट्रॅक्टरद्वारे रोटाव्हेटर मारून या शेतक:याला केळीचे पीक नेस्तनाबूत करावे लागले. लोहार यांचाही केळी पिकासाठी एकरी 27 हजार रुपये खर्च झाल्याने त्यांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागले.पावसाची स्थिती जर दरवर्षी अशीच राहिली तर आतार्पयत शेतीच्या बाबतीत सुजलाम् सुफलाम् म्हणून ओळखल्या जाणा:या या परिसरातील शेतक:यांवर मोठे संकट कोसळण्याची भीती जाणकार शेतक:यांकडून व्यक्त होत आहे. तळोदा तालुक्यातील मोड व बोरद परिसरातील शेतक:यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार केळी, ऊस, पपई आदी महागडय़ा पिकांची लागवड केली. मात्र यंदा तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाण्याची पातळी झपाटय़ाने खोल गेली. परिणामी शेतक:यांना छातीवर दगड ठेवून या पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. यंदा पडलेला दुष्काळ व त्यातच पाण्याअभावी पिके नष्ट होत असल्याने या पिकांसाठी केलेला खर्च वाया जात आहे. परिणामी शेतक:यांवर कजर्बाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने या नुकसानीची दखल घेऊन या परिसरातील शेतक:यांना आर्थिक मदतीसाठी प्रय} करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.