शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
4
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
5
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
6
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
7
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
8
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
9
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
11
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
12
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
13
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
14
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
15
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
16
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
17
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

कृषी पर्यटनाला वाव देत फुलवली शेती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:31 IST

राधेश्याम कुलथे । लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनातून वेळ काढून लोक पर्यटनाकडे आकर्षित होत आहेत. ...

राधेश्याम कुलथे ।लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनातून वेळ काढून लोक पर्यटनाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कृषी पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहे. ही संधी ओळखून शहादा तालुक्यातील जवखेडा येथील कृषीभूषण शेतकरी हिरालाल ओंकार पाटील यांनी आपल्या २० एकर क्षेत्रात कृषी पर्यटन केंद्र उभारून नंदनवन फुलवले आहे. याठिकाणी असलेल्या वनस्पतींच्या माहितीसाठी हे केंद्र पर्यटकांचे आकर्षित केंद्र बनले आहे. या केंद्रात विविध प्रकारचे आयुर्वेदीक वृक्ष लागवड करून उत्पन्न घेण्यात येत आहे.शहादा तालुक्यातील जवखेडा येथील प्रगतीशील शेतकरी कृषीभूषण हिरालाल ओंकार पाटील (७१) यांनी आपल्या शेतात इतर पिकांबरोबरच आंतर पीक म्हणून सुमारे १४ एकर क्षेत्रात पाच हजार रक्तचंदनाच्या झाडांची लागवड केली आहे. या झाडांपासून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले. शेती व्यवसाय हा तर प्रत्येक शेतकरी करतो. परंतु वेगळे काही अंतर पीक म्हणून इतर पिकांचेही उत्पन्न घेण्याचा विचार करून आपल्या शेतात हा प्रयोग हिरालाल पाटील यांनी यशस्वी केला. त्यांनी आपल्या कृषी पर्यटन केंद्रात शेताच्या बांधावर १५ वर्षीपूर्वी रक्तचंदन व सफेद चंदनच्या झाडांची लागवड केली होती. या २५ झाडांची आताची किंमत ९० ते ९५ लाख रुपये एवढी असून कर्नाटक येथे ते विक्रीला पाठवण्यात येणार आहे.रखवालदाराची नजरकृषी पर्यटन केंद्रात अनुसूचित प्रकार घडू नाही यासाठी श्रावण शंकर गायकवाड व त्यांची पत्नी गौरी गायकवाड हे केंद्रात रखवालदारी करून पिकांवर लक्ष ठेवतात. आयुर्वेदीक वृक्षांची व इतर पिकांसह येणाऱ्या पर्यटकांची हेळसांड यासाठी हे दाम्पत्य मेहनत घेतात.रक्त चंदनाची रोपे कर्नाटक येथून तीन ते चार फूट उंचीचे प्रती रोप ७० रुपयेप्रमाणे मागविण्यात आले. सुमारे १५० एकराच्या बांधावर या झाडांची लागवड केली. त्यांची उंची ३० ते ४० फूट उंचीची झाली आहे. शेती पुस्तके, कृषीविषयक माहितीपर मार्गदर्शन देणाºया वृत्तपत्रांच्या माध्यमातून हिरालाल पाटील यांनी आपल्या कृषी पर्यटन केंद्राबरोबरच शेतीला जणू विविध पिकांच्या प्रयोगासाठी प्रयोगशाळा बनविली आहे.हिरालाल पाटील यांनी नैसर्गिक शेती, देशी गायींच्या मलमूत्रापासून सेंद्रीय खताचा वापर करणे या तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन घेतले. पुढे सेंद्रीय खताचा वापर करून पिके घेण्याचा मानस त्यांनी या वेळी व्यक्त केला. त्यांनी आपल्या कृषी पर्यटन केंद्रात मिलिडूबिया, टरबूज, खरबूज, वाटाणे, वाल, गिलकी, बीट, टमाटे, वांगे, कोबी या पालेभाज्यांसह रूद्राक्ष, रक्तचंदनाची लागवड केली आहे. त्यात त्यांना विक्रमी उत्पन्न मिळत आहे.जवखेडा येथील कृषीभूषण हिरालाल पाटील यांनी कृषी पर्यटन केंद्र व शेतीच्या बांधांवर रक्तचंदनाची झाडे लावली आहे. या झाडांना पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनची व्यवस्था केली आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी आंतर पिकात ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. रक्तचंदनाच्या एका झाडाला दिवसातून आठ ते दहा लीटर पाणी देण्यात येते. त्याचबरोबर जवळच असलेल्या पिकांनाही त्या पाण्याचा निचरा होऊन फायदा होतो. कृषी पर्यटन केंद्राला भेट देणाºया शेतकऱ्यांना हिरालाल पाटील हे मार्गदर्शन करतात. त्यात पाण्याचे महत्त्व, सेंद्रीय शेतीचे प्रयोग यासह शेतीविषयक विविध बाबींची माहिती ते शेतकºयांना देतात.