शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर चौफुलीवरील अतिक्रमण काढले

By admin | Updated: March 9, 2017 23:32 IST

इतर ठिकाणी जैसे थे स्थिती : बांधकाम विभागासह पालिकेनेही पुढाकार घेण्याची मागणी

नंदुरबार : वाघेश्वरीचौफुलीवरील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर काढले. अशीच कारवाई नवापूर चौफुली आणि करण चौफुलीवरदेखील केली तर या चौकांचेही सौंदर्य वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान, काढलेले अतिक्रमण पुन्हा होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या अशी मागणी होत आहे.शहरातील वाघेश्वरी चौफुलीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. चारही बाजूंनी लहान, मोठ्या टपºया, हातगाड्या लावण्यात येत होत्या. शिवाय अनधिकृत वाहनथांबा तयार झाला होता. परिणामी या भागातील चारही रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढली होती. सहा महिन्यात तीन जणांना या ठिकाणी जीव गमवावा लागला   होता. ही बाब लक्षात घेता या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात    यावे, अशी मागणी वाढली होती. त्याची दखल घेत अखेर   चौफुलीवरील अतिक्रमण काढण्यात आले आहे.पूर्वी या ठिकाणी कच्चे अतिक्रमण होते. त्यानंतर काहींनी त्याच ठिकाणी पक्के अतिक्रमण केले. भर रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. सध्या दोंडाईचा व्हाया विसरवाडी व कुकरमुंडा अशी वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. परिणामी शहरातील चारही चौफुलींवरील वाहतूक व्यवस्था लावताना कसरत होत असते. त्यामुळे अतिक्रमण काढणे जिकिरीचे झाले होते.पक्का रस्ता करावाअतिक्रमण काढलेल्या जागेवर डांबरीकरण करावे व पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी अडथळे लावावे, अशी  मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी दोन वेळा अतिक्रमण काढण्यात आले. परंतु लागलीच १५ दिवसांनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत               असते. या वेळीदेखील तसे होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.नवापूर चौफुलीवरही तीच स्थितीशहरातील नवापूर चौफुलीवर तीच स्थिती निर्माण झाली आहे. लगतच असलेले जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, न्यायालय, जिल्हा परिषद यासह इतर कार्यालये पहाता या चौफुलीवरील वर्दळ वाढली आहे. त्यातच वळण रस्त्यावरील दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. रहिवास अतिक्रमणासोबतच व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. शासकीय कार्यालयांचा मुख्य मार्ग असल्यामुळे नेहमीच मोर्चा, रॅली या भागातून जात असते. त्यामुळे अडथळे येत असतात. या ठिकाणचे अतिक्रमण  काढण्यात यावे, अशी मागणी होत                        आहे.हीच स्थिती शहादा रस्त्यावरील करण चौफुलीची झाली आहे. या चौफुलीवर अतिक्रमण वाढले आहे. वाढती रहदारी लक्षात घेता या चौफुलीचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढल्यानंतरच ते शक्य होणार            आहे.२५ अतिक्रमणांवर हातोडा वाघेश्वरी चौफुलीवरील जवळपास २० ते २५ कच्ची अतिक्रमणे काढण्यात आली. काही टपºया अद्यापही उभ्याच.पालिकेने ठेवलेले तक्रार निवारण केंद्राची लोखंडी टपरी तेथेच पडून. एकही दिवस हे केंद्र सुरू झाले नाही. परिणामी भंगारात जाणार लोखंडी टपरी.अतिक्रमण काढलेल्या जागेत पुन्हा व्यावसायिक जागा बळकावणार नाही यादृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज.नवापूर व कोरीटनाका चौफुलीवर अतिक्रमणे काढण्यासाठी पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेण्याची नागरिकांकडून मागणी.