शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

अखेर चौफुलीवरील अतिक्रमण काढले

By admin | Updated: March 9, 2017 23:32 IST

इतर ठिकाणी जैसे थे स्थिती : बांधकाम विभागासह पालिकेनेही पुढाकार घेण्याची मागणी

नंदुरबार : वाघेश्वरीचौफुलीवरील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर काढले. अशीच कारवाई नवापूर चौफुली आणि करण चौफुलीवरदेखील केली तर या चौकांचेही सौंदर्य वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान, काढलेले अतिक्रमण पुन्हा होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या अशी मागणी होत आहे.शहरातील वाघेश्वरी चौफुलीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. चारही बाजूंनी लहान, मोठ्या टपºया, हातगाड्या लावण्यात येत होत्या. शिवाय अनधिकृत वाहनथांबा तयार झाला होता. परिणामी या भागातील चारही रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढली होती. सहा महिन्यात तीन जणांना या ठिकाणी जीव गमवावा लागला   होता. ही बाब लक्षात घेता या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात    यावे, अशी मागणी वाढली होती. त्याची दखल घेत अखेर   चौफुलीवरील अतिक्रमण काढण्यात आले आहे.पूर्वी या ठिकाणी कच्चे अतिक्रमण होते. त्यानंतर काहींनी त्याच ठिकाणी पक्के अतिक्रमण केले. भर रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. सध्या दोंडाईचा व्हाया विसरवाडी व कुकरमुंडा अशी वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. परिणामी शहरातील चारही चौफुलींवरील वाहतूक व्यवस्था लावताना कसरत होत असते. त्यामुळे अतिक्रमण काढणे जिकिरीचे झाले होते.पक्का रस्ता करावाअतिक्रमण काढलेल्या जागेवर डांबरीकरण करावे व पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी अडथळे लावावे, अशी  मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी दोन वेळा अतिक्रमण काढण्यात आले. परंतु लागलीच १५ दिवसांनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत               असते. या वेळीदेखील तसे होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.नवापूर चौफुलीवरही तीच स्थितीशहरातील नवापूर चौफुलीवर तीच स्थिती निर्माण झाली आहे. लगतच असलेले जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, न्यायालय, जिल्हा परिषद यासह इतर कार्यालये पहाता या चौफुलीवरील वर्दळ वाढली आहे. त्यातच वळण रस्त्यावरील दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. रहिवास अतिक्रमणासोबतच व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. शासकीय कार्यालयांचा मुख्य मार्ग असल्यामुळे नेहमीच मोर्चा, रॅली या भागातून जात असते. त्यामुळे अडथळे येत असतात. या ठिकाणचे अतिक्रमण  काढण्यात यावे, अशी मागणी होत                        आहे.हीच स्थिती शहादा रस्त्यावरील करण चौफुलीची झाली आहे. या चौफुलीवर अतिक्रमण वाढले आहे. वाढती रहदारी लक्षात घेता या चौफुलीचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढल्यानंतरच ते शक्य होणार            आहे.२५ अतिक्रमणांवर हातोडा वाघेश्वरी चौफुलीवरील जवळपास २० ते २५ कच्ची अतिक्रमणे काढण्यात आली. काही टपºया अद्यापही उभ्याच.पालिकेने ठेवलेले तक्रार निवारण केंद्राची लोखंडी टपरी तेथेच पडून. एकही दिवस हे केंद्र सुरू झाले नाही. परिणामी भंगारात जाणार लोखंडी टपरी.अतिक्रमण काढलेल्या जागेत पुन्हा व्यावसायिक जागा बळकावणार नाही यादृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज.नवापूर व कोरीटनाका चौफुलीवर अतिक्रमणे काढण्यासाठी पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेण्याची नागरिकांकडून मागणी.