शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

वराह मृत झाल्याच्या खोडसाळ दूरध्वनीने प्रशासनाची बोरदला तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील बोरद येथे एकाच दिवशी तब्बल २०० वराह मेल्याचा खोडसाळपणे फोन थेट पशुसंवर्धन आयुक्तांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील बोरद येथे एकाच दिवशी तब्बल २०० वराह मेल्याचा खोडसाळपणे फोन थेट पशुसंवर्धन आयुक्तांना गेल्यानंतर ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीच या विभागाची स्थानिक यंत्रणा खडबडून जागी झाली व गाव गाठले होते. तेथे गेल्यानंतर असा कोणताच प्रकार घडलेला नव्हता; परंतु पथकाला पाहून गावकरीदेखील अवाक्‌ झाले होते. गेल्या आठवड्यात काही वराह मेल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, पथकाने गावकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. मात्र, अफवांमुळे कर्मचारी हैराण झाले होते. असा खोडसाळपणा करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.  तळोदा तालुक्यातील बोरद येथे शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल २०० वराहांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाल्याचा फोन थेट पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांना करण्यात आला होता. साहजिकच ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ आरोग्य यंत्रणेने जिल्हा पशुसंवर्धन विभागाला व या विभागाने स्थानिक पशुसंवर्धन विभागाला अशा फोन आल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली होती. या विभागाचे वैद्यकीय पथक रात्रीच बोरद गावात दाखल झाले होते. हा प्रकार ज्या ठिकाणी घडल्याचे सांगण्यात आले होते, तेथे घटनेची पाहणी केली असता असा कुठलाच प्रकार पथकाला आढळून आला नाही. पथकाने संपूर्ण गावात पाहणी केली. प्रत्यक्ष गावकऱ्यांनाही विचारणा केली असता गेल्या आठवड्यात काही वराह मेल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, अशा खोडसाळपणामुळे आरोग्य कर्मचारी हैराण झाले होते. केवळ दोन वराह मृत्युमुखी पडल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी पुन्हा पथकाने गावऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. शिवाय ‘बर्ड फ्लू’बाबत खबरदारी घेऊन जागृती करण्याचे आवाहनही केले. अशा अफवा कोणी पसरवू नयेत. आधीच बर्ड फ्लू विषयी लोकांमध्ये कमालीची भीती आहे. यापुढे अशा अफवा कोणी पसरविण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

वराहांच्या बंदोबस्ताबाबत यंत्रणा घेत नाही ठोस भूमिकाशहाराबरोबरच ग्रामीण भागात वराहांचा मोठा वावर आहे. शिवाय या मोसमात वराहांचा अचानक मृत्यू कुठेना कुठे होत आहे. बर्ड फ्लूच्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. आधीच कोरोनाची भीती आहे. त्यात आता बर्ड फ्लूची भर पडली आहे, असे असताना वराहांच्या वाढत्या उपद्रवाबाबत ग्रामपंचायती व नगर पालिका प्रशासनाने ठोस अशी भूमिका घेतली नसल्याचा आरोप आहे. त्यांच्या अशा भूमिकेमुळे वराह पालकांचे फावत आहे. केवळ तेवढ्यापुरता दिखावा करीत पुन्हा ‘जैसे थे’ चित्र होते. वास्तविक या साथींच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ महसूल प्रशासन व पशुवैद्यकीय प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. कारण आजही शहराबरोबरच ग्रामीण भागातही वराहांची संख्या मोठी  आहे. वराह मालकही आपल्या वराहांना लसीकरण करण्यास पशुआरोग्य यंत्रणेला सहकार्य करायला तयार नाहीत. दरम्यान, बोरद गावातील संपूर्ण वराहांचे लसीकरण करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय शासनाच्या सर्वच यंत्रणांना खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

बोरद गावात एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात वराहांचा मृत्यू  झाल्याची घटना घडल्याचे वरिष्ठ अधिकात्याने कळविले होते. त्यानुसार स्थानिक वैद्यकीय पथकाला तात्काळ घटना स्थळी पाठविले होते. तथापि, गेल्या आठवड्यात दोन वराह मृत्युमुखी पडल्याची घटना घडली  होती.  - डॉ.यु.डी. पाटील, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी,जिल्हा परिषद नंदुरबार