शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन अपघाताची वाट पहात आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद शाळा खोल्यांच्या दुरवस्थेसंदर्भात जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत चांगलीच चर्चा झाली. एखाद्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद शाळा खोल्यांच्या दुरवस्थेसंदर्भात जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत चांगलीच चर्चा झाली. एखाद्या अपघाताची वाट पहात आहात काय? असा प्रश्न उपस्थित करून समाज कल्याण सभापती आत्माराम बागले यांनी या विषयाचे गांभिर्य सभागृहाच्या लक्षात आणून दिले. ‘लोकमत’ने  शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी शाळा खोल्या व इमारतींबाबतचे सविस्तर आणि वस्तूनिष्ठ माहितीचे विशेष पान प्रसिद्ध केले होते. त्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्यासह सर्व विषय समिती सभापत व सदस्य उपस्थित होते. बैठकीत शिक्षक बदल्या, पाणी ेटंचाई, महिला बालकल्याण विभागाचा नियतव्यय यासह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेत जिल्हा परिषदेच्या पडक्या शाळा इमारती आणि खोल्यांचा विषय निघाला. समाज कल्याण सभापती आत्माराम बागले यांनी हा प्रश्न उपस्थित केला. शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ने जिल्हाभरातील शाळा इमारतींवर सचित्र वृत्त अर्थात विशेष पान प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. बागले यांनी पडक्या इमारती व खोल्यांबाबत प्रशासनाने गंभीर व्हावे, अपघाताची वाट पहात आहात काय?, मुलांचे जीवाची काळजी नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी निर्लेखीत केलेल्या इमारती पाडण्यात येणार असल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी तालुकानिहाय प्रपोजल मागवून कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले, प्रभारी उपशिक्षणाधिकारी राहुल चौधरी यांनी 296 शाळा खोल्या जिर्ण अवस्थेत असल्याची माहिती दिली. पुढील बैठकीत कार्यवाहीबाबत माहिती द्यावी असे सभापती बागले यांनी यावेळी अधिका:यांना बजावले. बैठकीत आंतरजिल्हा बदलीने विस्थापीत झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देतांना मोठय़ा प्रमाणावर गैरकारभार झाल्याचा आरोप सदस्य रतन पाडवी यांनी केला. उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी समुपदेशनाची माहिती पदाधिका:यांना देखील दिली जात नसल्याचे सांगितले. या सर्व प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. सीईओ गौडा यांनी शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली असतांनाही ते जिल्हा परिषदेच्या चकरा का मारतात असा प्रश्न शिक्षणाधिका:यांना विचारला. प्रभारी उपशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांना त्यांच्या गटशिक्षणाधिकारी पदस्थापनेवर तातडीने पाठविण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली. प्रकाशा बॅरेजच्या पाण्याबाबत नियोजन करण्याची सुचना अभिजीत पाटील यांनी केली. शेडय़ूलप्रमाणे पाणी सोडले जाते किंवा कसे याची माहिती घ्यावी व तसे पत्र पाटबंधारे विभागाला द्यावे अशीही मागणी त्यांनी केली. बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. चर्चेत निलीमा पावरा, सिताराम राऊत या सदस्यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचलन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे यांनी केले. 

बैठकीत महिला बालकल्याण विभागाच्या 80  लाखाच्या नियतव्यावर चर्चा करण्यात आली. त्यावर विविध योजनांसाठी किती व कसा निधी दिला जाईल याची चाचपणी करण्यात आली. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेसाठी 36 लाख रुपये, अंगणवाडी बांधकामासाठी 10.37 लाख रुपये, व्हीसीडीसीसाठी एक कोटी रुपये तर पाळणा घरांसाठी 22 लाख रुपये नियतव्ययाअंतर्गत मंजुर करण्याबाबत चर्चा करण्यात आली.