शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
4
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
5
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
6
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
7
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
8
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
9
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
10
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
11
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
12
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
13
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
14
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
15
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
16
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
17
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
18
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती

प्रशासन अपघाताची वाट पहात आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद शाळा खोल्यांच्या दुरवस्थेसंदर्भात जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत चांगलीच चर्चा झाली. एखाद्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद शाळा खोल्यांच्या दुरवस्थेसंदर्भात जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत चांगलीच चर्चा झाली. एखाद्या अपघाताची वाट पहात आहात काय? असा प्रश्न उपस्थित करून समाज कल्याण सभापती आत्माराम बागले यांनी या विषयाचे गांभिर्य सभागृहाच्या लक्षात आणून दिले. ‘लोकमत’ने  शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी शाळा खोल्या व इमारतींबाबतचे सविस्तर आणि वस्तूनिष्ठ माहितीचे विशेष पान प्रसिद्ध केले होते. त्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्यासह सर्व विषय समिती सभापत व सदस्य उपस्थित होते. बैठकीत शिक्षक बदल्या, पाणी ेटंचाई, महिला बालकल्याण विभागाचा नियतव्यय यासह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेत जिल्हा परिषदेच्या पडक्या शाळा इमारती आणि खोल्यांचा विषय निघाला. समाज कल्याण सभापती आत्माराम बागले यांनी हा प्रश्न उपस्थित केला. शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ने जिल्हाभरातील शाळा इमारतींवर सचित्र वृत्त अर्थात विशेष पान प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. बागले यांनी पडक्या इमारती व खोल्यांबाबत प्रशासनाने गंभीर व्हावे, अपघाताची वाट पहात आहात काय?, मुलांचे जीवाची काळजी नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी निर्लेखीत केलेल्या इमारती पाडण्यात येणार असल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी तालुकानिहाय प्रपोजल मागवून कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले, प्रभारी उपशिक्षणाधिकारी राहुल चौधरी यांनी 296 शाळा खोल्या जिर्ण अवस्थेत असल्याची माहिती दिली. पुढील बैठकीत कार्यवाहीबाबत माहिती द्यावी असे सभापती बागले यांनी यावेळी अधिका:यांना बजावले. बैठकीत आंतरजिल्हा बदलीने विस्थापीत झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देतांना मोठय़ा प्रमाणावर गैरकारभार झाल्याचा आरोप सदस्य रतन पाडवी यांनी केला. उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी समुपदेशनाची माहिती पदाधिका:यांना देखील दिली जात नसल्याचे सांगितले. या सर्व प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. सीईओ गौडा यांनी शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली असतांनाही ते जिल्हा परिषदेच्या चकरा का मारतात असा प्रश्न शिक्षणाधिका:यांना विचारला. प्रभारी उपशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांना त्यांच्या गटशिक्षणाधिकारी पदस्थापनेवर तातडीने पाठविण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली. प्रकाशा बॅरेजच्या पाण्याबाबत नियोजन करण्याची सुचना अभिजीत पाटील यांनी केली. शेडय़ूलप्रमाणे पाणी सोडले जाते किंवा कसे याची माहिती घ्यावी व तसे पत्र पाटबंधारे विभागाला द्यावे अशीही मागणी त्यांनी केली. बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. चर्चेत निलीमा पावरा, सिताराम राऊत या सदस्यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचलन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे यांनी केले. 

बैठकीत महिला बालकल्याण विभागाच्या 80  लाखाच्या नियतव्यावर चर्चा करण्यात आली. त्यावर विविध योजनांसाठी किती व कसा निधी दिला जाईल याची चाचपणी करण्यात आली. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेसाठी 36 लाख रुपये, अंगणवाडी बांधकामासाठी 10.37 लाख रुपये, व्हीसीडीसीसाठी एक कोटी रुपये तर पाळणा घरांसाठी 22 लाख रुपये नियतव्ययाअंतर्गत मंजुर करण्याबाबत चर्चा करण्यात आली.