शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

जयनगरसह परिसरातील गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी घर दुरुस्ती कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

ग्रामीण जीवनातील मातीची घरे गावोगावी आजही दिसून येतात. आरसीसी घरांच्या जमान्यातही हीच मातीची घरे ग्रामीण जीवनाची साक्ष देतात. सध्या ...

ग्रामीण जीवनातील मातीची घरे गावोगावी आजही दिसून येतात. आरसीसी घरांच्या जमान्यातही हीच मातीची घरे ग्रामीण जीवनाची साक्ष देतात. सध्या ग्रामीण भागातील मातीच्या घरांना धाब्यावर पावसाळ्यात पाणी गळू नये, म्हणून प्लास्टिकचा कागद टाकण्याचे काम चालू आहे. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागात धाब्यावर कागदाऐवजी चिकट माती (खारी) टाकली जायची. मात्र, यामुळे दरवर्षी चिकट मातीमुळे धाब्यावर वजन वाढायचे. म्हणून कालानुरूप चिकट माती बंद होऊन बऱ्याच वर्षांपासून ग्रामीण भागात पावसाळ्याचे पाणी गळू नये म्हणून प्लास्टिकचा कागद पूर्ण धाब्यवर टाकला जात आहे.

तसेच दरवर्षी पावसाच्या पाण्यामुळे धाब्यावर असलेली मातीची वंडीदेखील खराब होते. यांचीदेखील मातीने डागडुजी करायचे काम ग्रामीण भागात सगळ्या मातीच्या घरांवर सुरू असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात अनेक घरे अशी आहेत, की दरवर्षी दोन - तीन चौकडींची माती लाकडांसहीत काढावी लागते. जुने लाकूड चांगले असेल तर जुने लाकूड मेस्त्रीकडून व्यवस्थित करून अथवा नवे लाकूड आणून ते लाकूड धाब्यावर व्यवस्थित ठेवून त्याच्यावर नवीन मातीचा पेन (गाऱ्याचा जाड थर) टाकला जातो. अशा घरांची अनेक ठिकाणी परिस्थिती असून, अनेक कुटुंब जुनी माती व लाकडे काढून पुन्हा त्याच्यावरून नवीन लाकडे ठेवून गाऱ्याचा जाड थर धाब्यावर टाकीत आहेत.

जयनगर येथे अनेक कुटुंबांनी आपल्या धाब्यावर प्लास्टिकचा कागद टाकून मातीची वंडी दुरुस्ती केली आहे. येथील जगदीश हरी पाटील यांनी तर आपल्या दहा चौकडीच्या घरातील चार चौकडीची धाब्यावरची पूर्ण माती आणि लाकडे काढून नवी पेन (गाऱ्याचा जाड थर) टाकला आहे. अनेक कुटुंबांनी मातीच्या घराची पत्र्याची मावठी नवे पत्रे आणून बसविण्याचे काम चालू केले आहे.

माझे घर खूपच जुने वडिलोपार्जित असून, पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गळत असते. अनेक वर्षांपासून शेतीतही चांगले उत्पन्न व भाव मिळत नसल्यामुळे नवे घर बांधण्याऐवजी मातीच्याच घराची डागडुजी करावी लागत आहे.

जगदीश हरी पाटील, जयनगर, ता. शहादा.