शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

जयनगरसह परिसरातील गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी घर दुरुस्ती कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

ग्रामीण जीवनातील मातीची घरे गावोगावी आजही दिसून येतात. आरसीसी घरांच्या जमान्यातही हीच मातीची घरे ग्रामीण जीवनाची साक्ष देतात. सध्या ...

ग्रामीण जीवनातील मातीची घरे गावोगावी आजही दिसून येतात. आरसीसी घरांच्या जमान्यातही हीच मातीची घरे ग्रामीण जीवनाची साक्ष देतात. सध्या ग्रामीण भागातील मातीच्या घरांना धाब्यावर पावसाळ्यात पाणी गळू नये, म्हणून प्लास्टिकचा कागद टाकण्याचे काम चालू आहे. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागात धाब्यावर कागदाऐवजी चिकट माती (खारी) टाकली जायची. मात्र, यामुळे दरवर्षी चिकट मातीमुळे धाब्यावर वजन वाढायचे. म्हणून कालानुरूप चिकट माती बंद होऊन बऱ्याच वर्षांपासून ग्रामीण भागात पावसाळ्याचे पाणी गळू नये म्हणून प्लास्टिकचा कागद पूर्ण धाब्यवर टाकला जात आहे.

तसेच दरवर्षी पावसाच्या पाण्यामुळे धाब्यावर असलेली मातीची वंडीदेखील खराब होते. यांचीदेखील मातीने डागडुजी करायचे काम ग्रामीण भागात सगळ्या मातीच्या घरांवर सुरू असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात अनेक घरे अशी आहेत, की दरवर्षी दोन - तीन चौकडींची माती लाकडांसहीत काढावी लागते. जुने लाकूड चांगले असेल तर जुने लाकूड मेस्त्रीकडून व्यवस्थित करून अथवा नवे लाकूड आणून ते लाकूड धाब्यावर व्यवस्थित ठेवून त्याच्यावर नवीन मातीचा पेन (गाऱ्याचा जाड थर) टाकला जातो. अशा घरांची अनेक ठिकाणी परिस्थिती असून, अनेक कुटुंब जुनी माती व लाकडे काढून पुन्हा त्याच्यावरून नवीन लाकडे ठेवून गाऱ्याचा जाड थर धाब्यावर टाकीत आहेत.

जयनगर येथे अनेक कुटुंबांनी आपल्या धाब्यावर प्लास्टिकचा कागद टाकून मातीची वंडी दुरुस्ती केली आहे. येथील जगदीश हरी पाटील यांनी तर आपल्या दहा चौकडीच्या घरातील चार चौकडीची धाब्यावरची पूर्ण माती आणि लाकडे काढून नवी पेन (गाऱ्याचा जाड थर) टाकला आहे. अनेक कुटुंबांनी मातीच्या घराची पत्र्याची मावठी नवे पत्रे आणून बसविण्याचे काम चालू केले आहे.

माझे घर खूपच जुने वडिलोपार्जित असून, पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गळत असते. अनेक वर्षांपासून शेतीतही चांगले उत्पन्न व भाव मिळत नसल्यामुळे नवे घर बांधण्याऐवजी मातीच्याच घराची डागडुजी करावी लागत आहे.

जगदीश हरी पाटील, जयनगर, ता. शहादा.