शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

जय नगर परिसरात शेती कामांना वेग, नद्या-नाले अजूनही कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST

ज्या शेतकऱ्यांनी मूग, उडीद, चवळी सुरुवातीला पेरले होते त्यांच्या शेंगा तोडणीयोग्य झाल्या आहेत. सतत चार-पाच दिवसांच्या पावसामुळे पिकांमधील गवत ...

ज्या शेतकऱ्यांनी मूग, उडीद, चवळी सुरुवातीला पेरले होते त्यांच्या शेंगा तोडणीयोग्य झाल्या आहेत. सतत चार-पाच दिवसांच्या पावसामुळे पिकांमधील गवत वाढल्याने शेतकऱ्यांना निंदणीच्या मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच कापसावर सततच्या पाण्यामुळे पाने आखडू लागल्याने सध्या फवारणी आणि खत लावण्यावर शेतकऱ्यांचा जोर दिसून येत आहे. पावसाने जरी उघडीप दिली असली तरी आता आकाश स्वच्छ दिसत असल्याने पुन्हा पाऊस येणार की नाही? याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कारण अजूनही जय नगर परिसरातील लोंढरे, उभादगड, खापरखेडा धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे नद्यांनाही पाणी आलेले नाही. परिणामी विहिरी तसेच कूपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. म्हणून यावर्षी जय नगरसह परिसरातील नद्या वाहिल्या तरच रब्बी हंगाम येईल, तसेच खरीप हंगामही चांगला येईल. नाही तर नद्या न वाहिल्यामुळे खरीप हंगामाचे उत्पन्न तर कमी येईलच, शिवाय रब्बी हंगामही धोक्यात येईल, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.