शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

२०१९ मध्ये प्रशासनाला दिली गेली ६१० निवेदने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भेडसावणाऱ्या दैनंदिन तसेच प्रलंबित समस्या सुटाव्यात यासाठी नागरिक प्रशासनाकडे दाद मागतात़ यासाठी निवेदन देणे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भेडसावणाऱ्या दैनंदिन तसेच प्रलंबित समस्या सुटाव्यात यासाठी नागरिक प्रशासनाकडे दाद मागतात़ यासाठी निवेदन देणे हा प्रमुख आधार असून २०१९ या वर्षात जिल्हा प्रशासनाला तब्बल ६१० निवेदने प्राप्त झाली आहेत़ नागरिकांनी दिलेल्या या निवेदनांची दखल घेण्याचे काम नव्या वर्षातही सुरु राहणार आहे़सनदशीर मार्गाने आपले म्हणणे मांडत शासनाला नेमकी समस्या मांडून देण्याच्या या प्रभावी अस्त्राचा वापर करण्यात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, सामान्य नागरिक, धार्मिक संघटना, सेवाभावी संस्था ह्या गेल्या वर्षभरात पुढे राहिल्या होत्या़ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी निवेदन दिली गेली होती़ संकलित केलेल्या निवेदनांचे वर्गीकरण करुन तक्रारी आणि समस्या या दोन प्रकारात विभाजन करुन त्यांची दखल घेतली गेली आहे़ राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मुद्द्यांची निवेदने ही थेट तेथपर्यंत पोहोचवली जातात़ जर एखाद्या विभागाची तक्रार किंवा त्यांच्याशी निगडीत समस्या असेल तर त्या विभागाच्या प्रमुखाला माहिती देऊन त्यावर कारवाई करण्यात असल्याने अनेकांच्या समस्या मार्गी लागल्या आहेत़जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनांची बरसात होत असताना जिल्हा परिषदेत मात्र निवेदनांची संख्या २०० च्या पुढेही गेलेली नाही़ यात प्रामुख्याने शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेत वेळोवेळी आंदोलने करत प्रशासनाला निवेदने दिली आहेत़ त्यांची निवेदने राज्यस्तरावर पाठवण्यात आल्याने त्यांच्या मागण्यांची पूर्तता टप्प्याटप्प्याने होत असल्याचे सांगण्यात आले आहे़जिल्हा मुख्यालयासह तहसील कार्यालयांमध्येही वर्षभर निवेदने देण्यात आली़ या निवेदनांना जिल्हा प्रशासनाकडे पाठवून त्यावर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाने केली होती़ यातील किती निवेदने निकाली निघाली याची माहिती मात्र प्रशासनाकडे नाही़४जिल्हाधिकारी यांच्या नावे जिल्हाधिकारी कार्यालयात जानेवारी महिन्यात ६६ निवदने देण्यात आली़ फेब्रुवारीमध्ये ५८, मार्च- ४२, एप्रिल- २३, मे-४५, जून-५६, जुलै-६६, आॅगस्ट-६३, सप्टेंबर-६५, आॅक्टोबर-२१ तर नोव्हेंबर महिन्यात ८१ निवेदने देण्यात आली आहेत़एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक तर आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम सुरु होता़ यादरम्यान कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने या दोन महिन्यातील निवेदने आणि आंदोलने यांची संख्या ही कमी दिसून आली होती़ डिसेंबर महिन्यात जिल्हा निवडणूकीची अधिसूचना लागू झाल्याने निवेदनांना ब्रेक लागला आहे़जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच पोलीस दलही आंदोलने, मोर्चे आणि धरणे यासाठी बंदोबस्त तैनात करुन व्यस्त होता़ जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान तब्बल २५० मोर्चे, धरणे आणि आंदोलने नंदुरबारसह ठिकठिकाणी करण्यात आली होती़ पोलीस ठाण्यांच्या पूर्वपरवानगीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय तसेच शहरातील विविध भागात ही आंदोलने करण्यात आली होती़ प्रामुख्याने राजकीय पक्षांकडून वर्षभरात मोर्चे काढण्यात आले होते़ तर विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर सामाजिक संघटनांनी आंदोलने केली़