शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील 86 हजार शेतकरी बसले आस लावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 12:37 IST

बोंडअळीमुळे नुकसानीचा कहर : प्रशासनाला पाठवावा लागला दुस:यांदा प्रस्ताव

मनोज शेलार । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 22 : कापूस बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील तब्बल 85 हजार 895 शेतक:यांना 89 कोटी 65 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने पुन्हा शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. आधीचा प्रस्ताव शासनाने नाकारल्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतक:यांना नुकसान भरपाई मिळालेली असतांना जिल्ह्यातील शेतकरी वंचीत राहिले होते. आता नवीन प्रस्तावाबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून आहे.नंदुरबार जिल्ह्यात एकुण खरीप क्षेत्रापैकी केवळ कापूस पिकाचेच क्षेत्र तब्बल 35 टक्केपेक्षा अधीक आहे. दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. गेल्यावर्षी तब्बल एक लाख चार हजार 981 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. परंतु सप्टेंबरनंतर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतक:यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याचा पंचनामा देखील करण्यात आला. परंतु नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने शेतक:यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविलेला आहे. त्याबाबत अद्यापही काही निर्णय झालेला नाही.उत्पादन आले होते निम्म्यावरबोंड अळीचा प्रादुर्भाव सप्टेंबरमध्ये झाला होता. त्यामुळे शेतक:यांच्या हाती केवळ 60 ते 70 टक्के उत्पादन आले होते. बोंडअळीमुळे शेतक:यांचे अर्थकारण देखील कोलमडले होते. त्यामुळे अनेक शेतक:यांनी नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच कापसाचे पीक काढून फेकले होते.पंचनाम्यांचे आदेश उशीराबोंडअळी नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश शासनाने उशीराने काढले होते. तोर्पयत अनेक शेतक:यांनी आपल्या शेतातील कपाशी काढून फेकली होती. परंतु सातबारावर ज्यांचे कापूस पीक लागले होते अशा सर्वाची नोंद घेण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील तब्बल 85 हजार 895 शेतक:यांचे 33 टक्केपेक्षा अधीक नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यांमध्ये करण्यात आली होती.नुकसान भरपाई नाकारलीशासनाने बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतक:यांना नुकसान भरपाई टाळली होती. वास्तविक राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यातील शेतकरी पात्र असतांना नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी का पात्र ठरले नाहीत याबाबत मात्र प्रशासनाला देखील योग्य खुलासा करता आला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पीक पैसेवारी सर्वच गावांची 50 पैसेपेक्षा अधीक होती. त्यामुळे जिल्ह्यात एकही गाव दुष्काळग्रस्त जाहीर झालेले नव्हते. पावसाची सरासरी देखील 90 टक्केर्पयत होती. या सर्व बाबी   पहाता शासनाने नुकसान भरपाई देण्याचे टाळल्याचे बोलले जात   आहे.शेतक:यांमध्ये संतापवास्तविक इतर ठिकाणी नुकसान भरपाई मिळत असतांना जिल्ह्यातील शेतकरीच त्यापासून वंचीत राहिल्याने शेतक:यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविला आहे. त्याबाबत निर्णय होणे अपेक्षीत असतांना अद्याप काहीही हालचाल झालेली नाही.प्रस्ताव मंजुर झाल्यास 89 कोटी रुपये मिळणारजिल्ह्यात कापूस पिकावर गेल्या हंगामात गुलाबी बोंड अळीचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यात जिरायत 55 हजार 754 तर बागायत 40 हजार 47 हेक्टरचा समावेश होता. एकुण 95 हजार 802 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले होते. या क्षेत्राचे पंचनामे करून प्रशासनाने एकुण 89 कोटी 65 लाख रुपयांचे नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे आता नव्याने पाठविला आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या कृषीच्या बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. परंतु कृषी विभागाला आणि प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आले नव्हते.