शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ७५० मृतांची पोर्टलवर नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST

नंदुरबार : जिल्ह्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील कोरोना बळींची संख्या वाढली आहे. गत दीड वर्षांपासून सुरू असलेल्या ...

नंदुरबार : जिल्ह्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील कोरोना बळींची संख्या वाढली आहे. गत दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या महामारीमुळे जिल्ह्यात तब्बल ७५७ जणांचा मृत्यू झाला असून, या बळींची नोंद केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पोर्टलवर झाली आहे. यासाठी जिल्ह्यात वाॅर रूम तयार करून नोंदण्या सुरू आहेत.

कोरोनाबाधितांना चांगले उपचार देण्यासाठी एकीकडे प्रयत्न होत असताना दुसरीकडे कोरोनामुळे उपचार सुरू असताना मृत झालेल्यांच्या मृत्यूच्या नोंदी केंद्र व राज्य सरकारच्या संकेतस्थळावर केल्या जात आहेत. यातून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची अचूक संख्या समोर येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने कक्षांची निर्मिती केली असून, याठिकाणी हे नोंदीचे कामकाज सुरू आहे. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय तसेच खासगी कोविड रुग्णालयांमध्ये मृत झालेल्यांच्या नोंदी या ऑनलाईन पद्धतीने करून त्या जिल्हास्तरावर कक्षाला तातडीने कळवल्या गेल्याने जिल्ह्यातील मृतांची आकडेवारी कायम अपडेट राहिली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे शहरी भागात आढळून आले आहेत. यात नंदुरबार शहर व तालुक्याच्या काही भागात १५ हजार ६८९ रुग्ण आजवर समोर आले होते. यातील ३२७ जणांचा मृत्यू झाला होता. शहादा शहर व तालुक्यात एकूण ११ हजार ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यातील १९१ जणांचा मृत्यू झाला. उर्वरित मृत्यू इतर चार तालुक्यांत झाले आहेत.

प्रशासनाची वाॅर रूम

जिल्हाधिकारी यांच्या सूचनेने जिल्हाधिकारी कार्यालयात वाॅर रूम तयार करण्यात आली आहे. याठिकाणी नियुक्त १० कर्मचारी सर्व माहिती देतात. त्यांच्याकडून मृतांच्या नोंदीचे कामकाज तातडीने होत आहे.

जि. प. कर्मचारी..

जिल्हा परिषदेकडून मृतांच्या नोंदी करण्यासाठी चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे कर्मचारी कोणत्याही रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात कोरोनामुळे एखादी व्यक्ती मृत झाल्यास तातडीने नोंद करून घेत आहेत.

केंद्र आणि राज्य शासनाकडे नोंदी वेळेवर दिल्या जात आहेत. कोणत्याही प्रकारची तफावत जिल्ह्यात नाही. कोरोनामुळे जेवढे मृत्यू तेवढ्याच नोंदी करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

-डाॅ. एन. डी. बोडके,

जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार. ­

...तर सुविधांवर परिणाम ­

जिल्हा प्रशासनाकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची नोंदणी करणे अधिक गरजेचे आहे. या नोंदणीतून त्या-त्या भागातील कोरोनाची नेमकी स्थिती समोर येते. मृतांच्या संपर्कात आलेल्यांची यातून माहिती मिळते.

मृतांचा अंत्यविधी हा पालिका स्मशानभूमीत करणे आवश्यक असल्याने आधी नोंदणी करून मृताचा दाखला तयार करण्यात येत आहे. यातून वारसांना दाखला मिळण्याच्या अडचणी दूर होत आहेत.

जिल्हा आरोग्य विभाग, महसूल विभाग, ग्रामीण भागात ग्रामपंचायती तसेच आरोग्य विभाग यांच्याकडून संयुक्तपणे नोंदणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा डाटा राज्य शासनाकडेही दिला जातो.