शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

नंदुरबारात आजवर ७० हजार क्विंटल मिरची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

२०१९-२० च्या हंगामात बाजारात एकूण १ लाख ६९ हजार क्विंटल मिरची आवक झाली होती. या आवकमुळे २०२१ या ...

२०१९-२० च्या हंगामात बाजारात एकूण १ लाख ६९ हजार क्विंटल मिरची आवक झाली होती. या आवकमुळे २०२१ या वर्षात मार्चपर्यंत मिरची उद्योग सुरू राहील अशी अपेक्षा होती. परंतु २०२० च्या नोव्हेंबरपर्यंत मिरची उत्पादनाला चुरडा-मुरडा सारख्या रोगाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी अडचणीत आले होते. यातून नंदुरबार बाजारपेठेत कमी अधिक प्रमाणात मिरची आवक होत राहिली आहे. बाजारात आज घडीस पाच ते बारा हजार रूपये प्रति क्विंटल दर देत शेतकऱ्यांकडून व्यापारी मिरची खरेदी करत आहेत. तूर्तास बाजारात दर दिवशी एक हजार क्विंटल मिरची आवक होत आहे. यातील बहुतांश मिरची ही गुजरात राज्यातील आहे. लाली व व्हीएनआर हे दोन वाण सध्या बाजारात अधिक प्रमाणात चालत असल्याचे दिसून आले आहे. यंदा मिरची आवक कमी झाल्याने दरांमध्ये वाढ असल्याने त्याचा परिणाम पूरक उद्योगातून उत्पादित केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर होणार असून तयार चटणीचे दर १० टक्के वाढतील असा अंदाज बाजारातून वर्तवला जात आहे.