लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या डोंगराळ भागातील ओढी येथे १ ते २४ जानेवारीदरम्यान आठ शेळ्यांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात पोलीस पाटील नानसिग वसावे यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही माहिती दिली होती. त्यानंतरदेखील परिस्थिती मात्र तशीच होती व आजारी शेळ्यांच्या संख्येत व मृत शेळ्यांच्या संख्येतदेखील सतत वाढ होत राहायची म्हणून पशुपालक व पोलीस पाटीलांनी तहसीलदार व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना २५ जानेवारी रोजी निवेदन दिले होते. त्यानंतर २७ जानेवारी रोजी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेळ्यांवर औषधोपचार केले. पुन्हा २९ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान पुन्हा सहा शेळ्या दगावल्याने पोलीस पाटील नानसिग वसावे यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देत औषधोपचार करण्याची मागणी केली होती. यानंतर पुन्हा कर्मा वसावे यांच्या एका शेळीचा मृत्यू झाला तर ४ जानेवारी रोजी उरशा वसावे यांच्या एका शेळीचा मृत्यू झाला होता. तसेच वंदना वसावे, किशोर वसावे, गोविंद वसावे, गंगाबाई वसावे, गिंबल्या वसावे यांच्या प्रत्येकी एक व उरशा वसावे आणि कर्मा वसावे यांच्या प्रत्येकी पाच, माकत्या वसावे यांच्या सहा, दिलीप वसावेंच्या आठ, ओल्या वसावेंच्या १४, अशा १ जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान ४६ शेळ्या दगावल्याने पशुपालकांचे अंदाजे दोन लाख ८८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या मृत झालेल्या पशुपालकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पशुपालकांकडून करण्यात येत आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील ओढी येथे ४६ शेळ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 13:26 IST