शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
3
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
4
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
5
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
6
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
7
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
8
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
9
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
10
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
11
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
12
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
13
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
14
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
15
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
16
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
17
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
18
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
19
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
20
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

कागदपत्रांअभावी 385 प्रकरणे नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : संजय गांधी समितीची बैठक मंगळवारी प्रशासकीय इमारतीत घेण्यात आली. समितीकडे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : संजय गांधी समितीची बैठक मंगळवारी प्रशासकीय इमारतीत घेण्यात आली. समितीकडे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ व संजय गांधी निराधार योजनेचे साधारण सव्वा चारशे प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यापैकी 385 प्रकरणे विविध कागद पत्रांच्या पूर्ततेअभावी              नामंजूर करण्यात आली आहेत. वेगवेगळ्या त्रुटींमुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्रकरणे नामंजूर झाल्याने प्रशासनाने कागद पत्रांसाठी कर्मचा:यांना सक्त ताकीद देण्याची आवश्यकता आहे.तळोदा तालुकास्तरीय संजय गांधी समितीची बैठक मंगळवारी येथील मध्यवर्ती प्रशासकीय  इमारतीत घेण्यात आली. अध्यक्षस्थानी आमदार उदेसिंग पाडवी होते. या वेळी समितीचे सचिव तहसीलदार पंकज लोखंडे, नायब तहसीलदार एस.पी. गवते, सदस्य नितीन पाडवी, अनुप उदासी, रशिलाबाई देसाई, यशवंत पाडवी उपस्थित होते. या समितीकडे तालुक्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्ीकडून साधारण सव्वाचारशे प्रकरणे दाखल करण्यात आली  होती. यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजनेसाठी 268 प्रकरणे तर संजय गांधी निराधार योजनेकरीता 146 प्रकरणांचा समावेश होता. समितीच्या सदस्यांनी या सर्व दाखल प्रकरणांची सखोल पडताळणी केल्यानंतर केवळ 39 प्रकरणे मंजूर केली आहेत. 45 प्रकरणे नामंजूर तर तब्बल 330 प्रकरणांमध्ये विविध कागद पत्रांची पूर्तता व त्रुटीमुळे नाकारण्यात आली आहेत. नाकारण्यात आलेल्या म्हणजे त्रुटी आढळून आलेल्या प्रकरणांबाबत समितीने कागदपत्रांची पूर्तता  आपल्या कर्मचा:यांमार्फत करून घेण्याची सूचना समितीने प्रशासनास दिली आहे, असे असले तरी मोठय़ा प्रमाणात दाखल झालेल्या प्रस्तावांमध्ये कागद पत्रांची त्रुटी आढळून आल्यामुळे ती नामंजूर करण्यात आली आहेत. साहजिकच प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. कारण नागरी सुविधा केंद्रांमध्ये लाभार्थी कागद पत्रांची पूर्तता करून दाखल करीत असतात. तेव्हाच संबंधीतांनी पडताळणी केली तर अपूर्ण कागद पत्रांची पूर्तता करणे लाभार्थीस शक्य होईल. मात्र समितीत प्रकरणे दाखल होऊन त्रुटीमुळे पुन्हा              नामंजूर केले जाते. त्यानंतर पुन्हा महसूल कर्मचा:यांमार्फत लाभार्थीस त्रुटीची पूर्तता करावी लागत असते. आधीच लाभार्थीस रेशन कार्ड,  वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड अशी डझनभर कागदपत्रांची जुळवणी करतांना अक्षरश: नाकेनऊ येत असते. शेवटी त्याची जुळवणी केल्यानंतर प्रस्ताव दाखल करतात. शिवाय दाखल करतांनादेखील सुविधा केंद्रातून पावतीसाठी  पदरमोड करावी लागते. एवढे करूनही जेव्हा त्रुटीच्या अभावामुळे प्रकरण नामंजूर होते तेव्हा लाभाथ्र्यास   निराश व्हावे लागत असल्याची  व्यथा लाभार्थ्ीनी या वेळी बोलून दाखविली.संजय गांधी योजनेच्या नवीन प्रशासनाने प्रकरण दाखल  करण्यापूर्वी आता लाभार्थ्ीनी या विभागाकडे कागद पत्रांची पूर्तता करून घेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे लाभार्थ्ीनीदेखील त्यांच्याकडून आपली कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे जेणे करून लाभाथ्र्याची दमछाक होणार  नाही.

संजय गांधी समितीकडे 425 प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ व संजय गांधी निराधार या दोन्ही योजना मिळून 39 प्रकरणे पडताळणी अंती मंजूर करण्यात आली आहे. 45 प्रकरणे नामंजूर झाली असून, 330 प्रकरणांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याची तलाठींमार्फत लाभाथ्र्याकडून पूर्तता करण्यात येईल.