शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांअभावी 385 प्रकरणे नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : संजय गांधी समितीची बैठक मंगळवारी प्रशासकीय इमारतीत घेण्यात आली. समितीकडे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : संजय गांधी समितीची बैठक मंगळवारी प्रशासकीय इमारतीत घेण्यात आली. समितीकडे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ व संजय गांधी निराधार योजनेचे साधारण सव्वा चारशे प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यापैकी 385 प्रकरणे विविध कागद पत्रांच्या पूर्ततेअभावी              नामंजूर करण्यात आली आहेत. वेगवेगळ्या त्रुटींमुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्रकरणे नामंजूर झाल्याने प्रशासनाने कागद पत्रांसाठी कर्मचा:यांना सक्त ताकीद देण्याची आवश्यकता आहे.तळोदा तालुकास्तरीय संजय गांधी समितीची बैठक मंगळवारी येथील मध्यवर्ती प्रशासकीय  इमारतीत घेण्यात आली. अध्यक्षस्थानी आमदार उदेसिंग पाडवी होते. या वेळी समितीचे सचिव तहसीलदार पंकज लोखंडे, नायब तहसीलदार एस.पी. गवते, सदस्य नितीन पाडवी, अनुप उदासी, रशिलाबाई देसाई, यशवंत पाडवी उपस्थित होते. या समितीकडे तालुक्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्ीकडून साधारण सव्वाचारशे प्रकरणे दाखल करण्यात आली  होती. यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजनेसाठी 268 प्रकरणे तर संजय गांधी निराधार योजनेकरीता 146 प्रकरणांचा समावेश होता. समितीच्या सदस्यांनी या सर्व दाखल प्रकरणांची सखोल पडताळणी केल्यानंतर केवळ 39 प्रकरणे मंजूर केली आहेत. 45 प्रकरणे नामंजूर तर तब्बल 330 प्रकरणांमध्ये विविध कागद पत्रांची पूर्तता व त्रुटीमुळे नाकारण्यात आली आहेत. नाकारण्यात आलेल्या म्हणजे त्रुटी आढळून आलेल्या प्रकरणांबाबत समितीने कागदपत्रांची पूर्तता  आपल्या कर्मचा:यांमार्फत करून घेण्याची सूचना समितीने प्रशासनास दिली आहे, असे असले तरी मोठय़ा प्रमाणात दाखल झालेल्या प्रस्तावांमध्ये कागद पत्रांची त्रुटी आढळून आल्यामुळे ती नामंजूर करण्यात आली आहेत. साहजिकच प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. कारण नागरी सुविधा केंद्रांमध्ये लाभार्थी कागद पत्रांची पूर्तता करून दाखल करीत असतात. तेव्हाच संबंधीतांनी पडताळणी केली तर अपूर्ण कागद पत्रांची पूर्तता करणे लाभार्थीस शक्य होईल. मात्र समितीत प्रकरणे दाखल होऊन त्रुटीमुळे पुन्हा              नामंजूर केले जाते. त्यानंतर पुन्हा महसूल कर्मचा:यांमार्फत लाभार्थीस त्रुटीची पूर्तता करावी लागत असते. आधीच लाभार्थीस रेशन कार्ड,  वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड अशी डझनभर कागदपत्रांची जुळवणी करतांना अक्षरश: नाकेनऊ येत असते. शेवटी त्याची जुळवणी केल्यानंतर प्रस्ताव दाखल करतात. शिवाय दाखल करतांनादेखील सुविधा केंद्रातून पावतीसाठी  पदरमोड करावी लागते. एवढे करूनही जेव्हा त्रुटीच्या अभावामुळे प्रकरण नामंजूर होते तेव्हा लाभाथ्र्यास   निराश व्हावे लागत असल्याची  व्यथा लाभार्थ्ीनी या वेळी बोलून दाखविली.संजय गांधी योजनेच्या नवीन प्रशासनाने प्रकरण दाखल  करण्यापूर्वी आता लाभार्थ्ीनी या विभागाकडे कागद पत्रांची पूर्तता करून घेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे लाभार्थ्ीनीदेखील त्यांच्याकडून आपली कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे जेणे करून लाभाथ्र्याची दमछाक होणार  नाही.

संजय गांधी समितीकडे 425 प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ व संजय गांधी निराधार या दोन्ही योजना मिळून 39 प्रकरणे पडताळणी अंती मंजूर करण्यात आली आहे. 45 प्रकरणे नामंजूर झाली असून, 330 प्रकरणांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याची तलाठींमार्फत लाभाथ्र्याकडून पूर्तता करण्यात येईल.