शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांमधील ३१५ वर्गखोल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातील अनेक शाळाखोल्यांची अवस्था जीर्ण बनली आहे. ३१५ पेक्षा अधिक शाळाखोल्या निर्लेखित करून त्यांचे ...

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातील अनेक शाळाखोल्यांची अवस्था जीर्ण बनली आहे. ३१५ पेक्षा अधिक शाळाखोल्या निर्लेखित करून त्यांचे नव्याने बांधकाम करण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी ८० शाळाखोल्यांच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असून लवकरच त्यांचे बांधकाम केले जाणार आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांतील शाळाखोल्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. सर्वाधिक शाळाखोल्यांची दुरवस्था ही सातपुड्यातील दुर्गम भागात आहेत. या शाळाखोल्या बांधकामासाठी विविध योजनांतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील शैक्षणिक वर्षात यातील निम्म्यापेक्षा अधिक शाळाखोल्या बांधून मिळतील यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

यंदा कोरोनामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उघडल्याच नाहीत. त्यांची देखरेख व दुरुस्तीदेखील झाली नाही. परिणामी शाळाखोल्या खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्राथमिक शाळांची संख्या १९०० असून शाळाखोल्यांची संख्या तीन हजार ७८३ इतकी आहे. त्यातील तब्बल ३१९ शाळाखोल्या या खराब झाल्या असून त्यांना निर्लेखित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात तीन हजार ५६३ शाळाखोल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आहेत, तर २१८ खोल्या या मोफत उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. अर्थात मोफत खोल्या या त्या-त्या गावातील ग्रामपंचायतींनी सभागृहे व खासगी घरे या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. सुमारे ८० खोल्यांचे बांधकाम होणार असून त्यातील काही आकांक्षित जिल्हा निधीतून होणार आहेत.

गळक्या शाळाखोल्यांमुळे अपघाताची भीती...

n अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील ५० पेक्षा अधिक शाळाखोल्या या गळक्या आहेत. पावसाळ्यात शिक्षकांना प्लास्टिक कागद किंवा ताडपत्री लावून गळती थांबवावी लागते. अशावेळी मोठा अपघात होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे अशा शाळाखोल्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जातो, परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. खापर व परिसरातील सपाटीवरील गावांमधील शाळाखोल्यांची अवस्थादेखील दयनीय आहे. त्याबाबतही ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.

n सातपुड्यातील अनेक गावांमधील शाळा या कुडाच्या घरात भरविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता राहत नाही. शिक्षकांनादेखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दुर्गम भागातील अशा गाव व पाड्यांमध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्यामुळे ही समस्या आहे. त्यावर उपाय म्हणून बांबू शाळेचा प्रयोग राबविण्याचे ठरविण्यात आले, परंतु तो देखील यशस्वी होऊ शकला नाही; नंतर फायबर शीटपासून शाळाखोल्या बांधण्याचे ठरविण्यात आले, परंतु त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.