शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

जिल्हा परिषद शाळांमधील ३१५ वर्गखोल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातील अनेक शाळाखोल्यांची अवस्था जीर्ण बनली आहे. ३१५ पेक्षा अधिक शाळाखोल्या निर्लेखित करून त्यांचे ...

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातील अनेक शाळाखोल्यांची अवस्था जीर्ण बनली आहे. ३१५ पेक्षा अधिक शाळाखोल्या निर्लेखित करून त्यांचे नव्याने बांधकाम करण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी ८० शाळाखोल्यांच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असून लवकरच त्यांचे बांधकाम केले जाणार आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांतील शाळाखोल्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. सर्वाधिक शाळाखोल्यांची दुरवस्था ही सातपुड्यातील दुर्गम भागात आहेत. या शाळाखोल्या बांधकामासाठी विविध योजनांतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील शैक्षणिक वर्षात यातील निम्म्यापेक्षा अधिक शाळाखोल्या बांधून मिळतील यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

यंदा कोरोनामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उघडल्याच नाहीत. त्यांची देखरेख व दुरुस्तीदेखील झाली नाही. परिणामी शाळाखोल्या खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्राथमिक शाळांची संख्या १९०० असून शाळाखोल्यांची संख्या तीन हजार ७८३ इतकी आहे. त्यातील तब्बल ३१९ शाळाखोल्या या खराब झाल्या असून त्यांना निर्लेखित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात तीन हजार ५६३ शाळाखोल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आहेत, तर २१८ खोल्या या मोफत उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. अर्थात मोफत खोल्या या त्या-त्या गावातील ग्रामपंचायतींनी सभागृहे व खासगी घरे या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. सुमारे ८० खोल्यांचे बांधकाम होणार असून त्यातील काही आकांक्षित जिल्हा निधीतून होणार आहेत.

गळक्या शाळाखोल्यांमुळे अपघाताची भीती...

n अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील ५० पेक्षा अधिक शाळाखोल्या या गळक्या आहेत. पावसाळ्यात शिक्षकांना प्लास्टिक कागद किंवा ताडपत्री लावून गळती थांबवावी लागते. अशावेळी मोठा अपघात होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे अशा शाळाखोल्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जातो, परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. खापर व परिसरातील सपाटीवरील गावांमधील शाळाखोल्यांची अवस्थादेखील दयनीय आहे. त्याबाबतही ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.

n सातपुड्यातील अनेक गावांमधील शाळा या कुडाच्या घरात भरविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता राहत नाही. शिक्षकांनादेखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दुर्गम भागातील अशा गाव व पाड्यांमध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्यामुळे ही समस्या आहे. त्यावर उपाय म्हणून बांबू शाळेचा प्रयोग राबविण्याचे ठरविण्यात आले, परंतु तो देखील यशस्वी होऊ शकला नाही; नंतर फायबर शीटपासून शाळाखोल्या बांधण्याचे ठरविण्यात आले, परंतु त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.