शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२७ हजार शेतकऱ्यांना महसूल प्रशासनाकडून मोफत सातबारा देण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:38 IST

तळोदा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुढील महिन्याच्या गांधी जयंतीस राज्यातील शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा देण्याचे अभियान शासन राबविणार असून, तळोदा ...

तळोदा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुढील महिन्याच्या गांधी जयंतीस राज्यातील शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा देण्याचे अभियान शासन राबविणार असून, तळोदा तालुक्यातील साधारण २७ हजार शेतकऱ्यांना महसूल प्रशासनाकडून मोफत सातबारा देण्यात येणार आहेत.

भारत हा कृषिप्रधान देश असून, शासनाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरीदेखील तेवढाच महत्त्वाचा दुवा आहे. कारण देशाबरोबरच राज्याच्या प्रगतीत शेतकऱ्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना घरपोच डिजिटल सातबारा तोही मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या २ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीपासून हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. या अभियानातून तळोदा तालुक्यातील साधारण २७ हजार खातेधारक शेतकरी आहेत. त्यांनाही हे सातबारा घरपोच महसूल प्रशासनाचे तलाठी देणार आहेत. तसे नियोजनदेखील सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना मोफत सातबारा पुरविला जाणार असल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या या धोरणात्मक निर्णयाचे स्वागत केले आहे.

अभियानामुळे शेतकऱ्यांची फिरफिर टळणार

सातबारा हा शेतकऱ्याच्या संपत्तीचा महत्त्वाचा पुरावा आहे. त्यामुळे कुठल्याही योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना त्याची आवश्यकता भासत असते. नेमके तो तलाठ्याकडून काढण्यासाठी शेतकऱ्यांना ग्रामीण भागातून सारखी फिरफिर करावी लागत असते. कुठे तलाठी ठिकाणावर नसतो तर कुठे ऑनलाईनचा खेळखंडोबा यामुळे त्याची दमछाक होऊन अक्षरश: वैतागत असतो. एवढे करूनही काम होत नसल्याने त्यांचा वेळ, पैसा वाया जात असतो. आता राज्य सरकारने त्यास परिपूर्ण असा डिजिटल सातबारा तोही घरपोच विनामूल्य देणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु त्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्हा सेतू समिती करेल खर्च

महसूल प्रशासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत डिजिटल सातबऱ्याचा खर्च जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेली जिल्हा सेतू समिती करेल. त्याची जबाबदारीदेखील शासनाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर दिली आहे. शिवाय यासाठी जमावबंदी आयुक्त व भूमी अभिलेख यांच्यावरही सोपविण्यात आली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा देण्याचे अभियान शासन २ ऑक्टोबरपासून राबविणार असून, तळोदा तालुक्यातील २७ हजार शेतकऱ्यांनादेखील मोफत डिजिटल सातबारा देण्याबाबत नियोजन सुरू आहे.

-गिरीश वखारे, तहसीलदार, तळोदा.