शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

जिल्ह्यात तीन वर्षात 2700 बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 12:38 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कुपोषणाच्या बाबतीत राज्यातच नव्हे तर देशात संवेदनशील माणल्या जणा:या नंदुरबार जिल्ह्यात ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुपोषणाच्या बाबतीत राज्यातच नव्हे तर देशात संवेदनशील माणल्या जणा:या नंदुरबार जिल्ह्यात राज्यातील इतर भागाच्या तुलनेत बालमृत्यूचे प्रमाण घटत असले तरी गेल्या तीन वर्षात दोन हजार 700 बालकांचा मृत्यू झाला आहे.             दरम्यान  प्रशासनाकडे बहुतांश बालमृत्यूची नोंदच नसल्याने हा आकडा कागदावरच कमी होत असल्याचा कयास लावला जात  आहे.सातपुडय़ातील कुपोषणाचा प्रश्न गेल्या 30 वर्षापासून सातत्याने गाजत आहे. त्यातूनच आकडेवारीचा घोळ, नावालाच राबविण्यात आलेल्या योजना, शिक्षण, आरोग्यातील अनियमितता याबाबतचे वेगवेगळे किस्से समोर आले आहे. अनेक बाबीत सुधारणा झाल्या, काही नवीन प्रयोग राबविण्यात आले. पण प्रयोग यशस्वी झाल्यानंतर काही काळ त्याची चर्चा होते. पुन्हा जैसे थे चित्र असते. त्याबाबतचे सातत्य व यंत्रणेवर नियंत्रण नसल्याने कुपोषणाचे प्रमाण प्रत्यक्षात कमी होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षातील बालमृत्यूचे चित्र पाहिल्यास आकडेवारीत घट होत असली तरी आहे ते प्रमाणदेखील चिंताजनक आहे. 2016-17 मध्ये एकूण 970 बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात 0 ते एक वयोगटातील 773 बालक मृत्यूमुखी पडले. यात ग्रामीण भागातील 400 ते शहरी व संस्थात्मक भागात 337 बालकांचा मृत्यू झाला. तर एक ते सहा वर्ष वयोगटातील 233 बालकांचा मृत्यू झाला. यातही ग्रामीण भागातील 191 बालकांचा मृत्यू झाला. 2017-18 मध्ये एकूण 883 बालकांचा मृत्यू झाला. त्यात शून्य ते एक वयोगटातील 740 तर एक ते सहा वयोगटातील 143 बालकांचा समावेश    आहे. यात एकूण ग्रामीण भागातील 479 तर शहरी भागातील 404 बालकांचा मृत्यू झाला.2018-19 मध्ये एकूण 844 बालकांचा मृत्यू झाला. त्यात शून्य ते एक गटातील 708 व एक ते सहा वयोगटातील 136 बालकांचा मृत्यू झाला आहे. यातही ग्रामीण  भागातील 426 तर शहरी भागातील 418 बालकांचा मृत्यू झाला आहे.एकूणच या तीन वर्षातील बालमृत्यूचे चित्र पाहिल्यास त्यात सातपुडय़ातील अर्थात धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील प्रमाण अधिक आहे. या दोन्ही तालुक्यात 2016-17 मध्ये 970 पैकी 320 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर 2017-18 मध्ये 883 पैकी 278 आणि 2018-19 मध्ये 844 पैकी 277 बालकांचा मृत्यू धडगाव  आणि अक्कलकुवा तालुक्यात झाले   आहे. यातही  शून्य ते एक वयोगटातील बालमृत्यूचे प्रमाण लक्षणिय आहे.