शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

जिल्ह्यात तीन वर्षात 2700 बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 12:38 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कुपोषणाच्या बाबतीत राज्यातच नव्हे तर देशात संवेदनशील माणल्या जणा:या नंदुरबार जिल्ह्यात ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुपोषणाच्या बाबतीत राज्यातच नव्हे तर देशात संवेदनशील माणल्या जणा:या नंदुरबार जिल्ह्यात राज्यातील इतर भागाच्या तुलनेत बालमृत्यूचे प्रमाण घटत असले तरी गेल्या तीन वर्षात दोन हजार 700 बालकांचा मृत्यू झाला आहे.             दरम्यान  प्रशासनाकडे बहुतांश बालमृत्यूची नोंदच नसल्याने हा आकडा कागदावरच कमी होत असल्याचा कयास लावला जात  आहे.सातपुडय़ातील कुपोषणाचा प्रश्न गेल्या 30 वर्षापासून सातत्याने गाजत आहे. त्यातूनच आकडेवारीचा घोळ, नावालाच राबविण्यात आलेल्या योजना, शिक्षण, आरोग्यातील अनियमितता याबाबतचे वेगवेगळे किस्से समोर आले आहे. अनेक बाबीत सुधारणा झाल्या, काही नवीन प्रयोग राबविण्यात आले. पण प्रयोग यशस्वी झाल्यानंतर काही काळ त्याची चर्चा होते. पुन्हा जैसे थे चित्र असते. त्याबाबतचे सातत्य व यंत्रणेवर नियंत्रण नसल्याने कुपोषणाचे प्रमाण प्रत्यक्षात कमी होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षातील बालमृत्यूचे चित्र पाहिल्यास आकडेवारीत घट होत असली तरी आहे ते प्रमाणदेखील चिंताजनक आहे. 2016-17 मध्ये एकूण 970 बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात 0 ते एक वयोगटातील 773 बालक मृत्यूमुखी पडले. यात ग्रामीण भागातील 400 ते शहरी व संस्थात्मक भागात 337 बालकांचा मृत्यू झाला. तर एक ते सहा वर्ष वयोगटातील 233 बालकांचा मृत्यू झाला. यातही ग्रामीण भागातील 191 बालकांचा मृत्यू झाला. 2017-18 मध्ये एकूण 883 बालकांचा मृत्यू झाला. त्यात शून्य ते एक वयोगटातील 740 तर एक ते सहा वयोगटातील 143 बालकांचा समावेश    आहे. यात एकूण ग्रामीण भागातील 479 तर शहरी भागातील 404 बालकांचा मृत्यू झाला.2018-19 मध्ये एकूण 844 बालकांचा मृत्यू झाला. त्यात शून्य ते एक गटातील 708 व एक ते सहा वयोगटातील 136 बालकांचा मृत्यू झाला आहे. यातही ग्रामीण  भागातील 426 तर शहरी भागातील 418 बालकांचा मृत्यू झाला आहे.एकूणच या तीन वर्षातील बालमृत्यूचे चित्र पाहिल्यास त्यात सातपुडय़ातील अर्थात धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील प्रमाण अधिक आहे. या दोन्ही तालुक्यात 2016-17 मध्ये 970 पैकी 320 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर 2017-18 मध्ये 883 पैकी 278 आणि 2018-19 मध्ये 844 पैकी 277 बालकांचा मृत्यू धडगाव  आणि अक्कलकुवा तालुक्यात झाले   आहे. यातही  शून्य ते एक वयोगटातील बालमृत्यूचे प्रमाण लक्षणिय आहे.