शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

१८६ बसेसना केला ‘कोट’; प्रवाशांनाे बिनधास्त ठेवा ‘बोट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:36 IST

नंदुरबार : राज्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये, यासाठी एस. टी. बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली ...

नंदुरबार : राज्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये, यासाठी एस. टी. बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात धुळे विभागातील ५८४ बसेसना कोटिंग करण्याचे निश्चित करण्यात आले होते. यात नंदुरबार जिल्ह्यातील चार आगारांच्या १८६ बसेसचे कोटिंग पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्यात सुमारे १५२ बसेसचे कोटिंग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात नंदुरबार आगारातील बसेसचे कोटिंग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. याअंतर्गत बसेसची योग्य पद्धतीने स्वच्छता करत नियुक्त केलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पारदर्शी अशी ॲन्टिमायक्रोबियल कोटिंगची प्रक्रिया पूर्ण केली. डोळ्यांना दिसून न येणारे हे कोटिंग प्रवाशांना कोरोनाच्या संसर्गापासून दूर ठेवणार आहे. पहिल्या टप्प्यात काेटिंग करण्यात आलेल्या बसेस विविध मार्गांवर सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चारही आगारांतून या बसेस शहरातील विविध भागात चालविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोटिंगचा दुसरा टप्पाही लवकर सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

एका बसला दोनवेळा होणार कोटिंग

नंदुरबार आगारात सर्वाधिक वेगाने कोटिंगचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दोन दिवसात सर्व ६९ बसेसचे कोटिंग करण्यात आल्याची माहिती आहे. कोटिंग केलेल्या बसेसना सहा महिन्यांतून दाेनवेळा तर वर्षातून चारवेळा कोटिंग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील बसेसही विक्रमी वेळेत कोटिंग करण्यात येणार असून, चारही आगारांमध्ये ही कार्यवाही लवकरच सुरु होणार आहे.

बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतरही धोका होणार नाही

कोटिंग केल्यानंतर एस. टी. बसेसमध्ये कोरोना संसर्गाचा धोका कमी होणार आहे. यातून सुरक्षित प्रवास करणे नागरिकांना शक्य होणार असल्याची माहिती देण्यात आली. बाधित व्यक्तीने प्रवास केल्यानंतरही ही सुविधा असली तरी एखाद्या व्यक्तीच्या बाजूला बाधित व्यक्ती बसला असल्यास प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे मास्कचा वापर सक्तीचा राहणार असल्याने संसर्गाचा धोका कमी होईल, असे एस. टी.कडून सांगण्यात आले. सोमवारी ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केलेल्या बसेस धावत असल्याचे सांगण्यात आले. धुळे, नाशिक, पुणे, मुंबईसह ग्रामीण भागातही कोटिंग केलेल्या बसेस सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

एस. टी.ने प्रवास करणे ही गरज आहे. ग्रामीण भागात ही एकमेव सोय आहे. कोटिंग वगैरे काय केली, हे कळले नाही. परंतु एस. टी.च्या हँडल व सीट हँडल स्वच्छ केल्याचे दिसून आले.

- प्रमोद पवार, धानोरा. ता. नंदुरबार.

एस. टी.ने कोटिंगचा चांगला उपक्रम राबवला आहे. या उपक्रमामुळे कोरोनामुक्त प्रवास घडणार आहे. या प्रवासातून संसर्गाचा धोका कमी होणार आहे. कोटिंगमुळे सुरक्षेची हमी आहे.

- वैभव पाटील, नंदुरबार.

पहिल्या टप्प्यात नंदुरबार आगारातील ६९ बसेसचे कोटिंग पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना कोरोनामुक्त प्रवास करता येणार आहे.

- मनोज पवार, आगारप्रमुख, नंदुरबार.