शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

नवापुरात १३ पथके तळ ठोकून, आणखी वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर येथे पशुसंवर्धन विभागाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. बर्ड फ्लू नसला तरी त्या अनुषंगानेच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नवापूर येथे पशुसंवर्धन विभागाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. बर्ड फ्लू नसला तरी त्या अनुषंगानेच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. १३ पथके येथे तळ ठोकून आहेत. सद्या कुक्कुट पक्षी मरण्याचे जे प्रमाण आहे ते एकूण संख्येच्या तुलनेत फारसे जास्त नाही. त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही. तरीही आवश्यक ती सर्व खबरदारी जिल्हाधिकारी व पशुसंवर्धन आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जात असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॅा.के.टी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

नवापुरात कुक्कुट पक्षी मरण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले आहे, ही धोक्याची बाब आहे का?

नवापुरात एकूण २८ पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल नऊ लाखांपेक्षा अधिक कुक्कुटपक्षी आहेत. त्यामुळे विविध कारणांनी दररोज एवढे पक्षी मरण्याचे प्रमाण हे त्या तुलनेत सामान्य आहे. परंतु सद्या बर्ड फ्लूची चर्चा असल्याने त्याकडे लक्ष वेधले गेले. गेल्या तीन आठवड्यापासून पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकारी आणि विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना सुरू केल्या आहेत. नमुने तपासणीसाठी पुणे व भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत.

सध्या नवापुरात काय उपाययोजना सुरू केल्या आहेत?

नवापुरात पशुसंवर्धन विभागाचे १३ पथके तळ ठोकून आहेत. आपण स्वत: व इतर वरिष्ठ अधिकारी येथेच थांबून आहोत. १३ पथकांमध्ये प्रत्येकी पथकात एक पशुधन अधिकारी, एक सहायक किंवा पर्यवेक्षक अधिकारी व दोन ते तीन वर्ग चारचे कर्मचारी यांचा समावेश आहे. पथकांकडून दररोज सकाळ व सायंकाळी सर्वेक्षण करून त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला जात आहे. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन केले जात आहे. आणखी पथके वाढविणार आहोत.

अतिरिक्त पथकांसाठी मागणी...

प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून अतिरिक्त पथकांची मागणी केली आहे. त्यांनी ते देण्याचे मान्य केले आहे. मनुष्यबळ उपलब्ध होताच उपाययोजनांना आणखी गती येणार आहे. प्रादेशिक आयुक्त यांनी नवापुरात भेट देऊन उपाययोजनांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

इतर ठिकाणीही उपाययोजना

नवापूर व्यतिरिक्त जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात १७५ पोल्ट्री फार्म आहेत. त्यात जवळपास १४ लाखापेक्षा अधिक कुक्कुटपक्षी आहेत. त्यादृष्टीने उपाययोजना केल्या गेल्या आहेत.

परराज्यातून येऊ नये...

जिल्हा गुजरात व मध्य प्रदेश सीमेलगत असल्यामुळे जिल्ह्यात बाहेरील कुक्कुट किंवा इतर पक्षी येऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उपाययोजना केल्या गेल्या आहेत.