शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कामगारांना लाॅकडाऊनची अन् उद्योजकांना परतलेले कामगार पुन्हा गावी जाण्याची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST

जिल्ह्यात कृषी, फॅब्रिकेशन, टीन उद्योग, सोयाबीन ऑईल उद्योग, अन्नप्रक्रिया उद्योगांसह विविध उद्योगांचा समावेश आहे. या ठिकाणी जवळपास ४० हजारांहून ...

जिल्ह्यात कृषी, फॅब्रिकेशन, टीन उद्योग, सोयाबीन ऑईल उद्योग, अन्नप्रक्रिया उद्योगांसह विविध उद्योगांचा समावेश आहे. या ठिकाणी जवळपास ४० हजारांहून अधिक कामगार कर्तव्यावर आहेत. परंतु, नोंदणीकृत कामगारांची संख्या साडेतीन ते चार हजार एवढीच आहे. सध्या कर्तव्यावर असलेल्या कामगारांपैकी बहुतांश कामगार गावी परतण्याच्या मार्गावर आहेत; तर बांधकाम, हॉटेल व्यवसाय बंद असल्याने या क्षेत्रांत काम करणारे जवळपास २५ हजारांहून अधिक कामगार अडचणीत सापडलेले आहेत. त्यात अनेकांनी पर्यायी कामांचा शोध घेतला आहे. अनेकजण कोविड केअर सेंटरमध्ये अथवा भाजीपाला, इतर साहित्यविक्रीचे काम करीत आहेत.

हाताला काम नाही, इथे तरी काय करणार?

वर्षभरापूर्वी कोरोनामुळे अचानक गावी जाण्याची वेळ आमच्यावर आली होती. मालकाने पुन्हा उद्योग सुरू झाल्याने बोलावले. परंतु, कोरोना वाढत असताना लाॅकडाऊनची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

- राजूसिंह परमार, सिडको.

एमआयडीसीमधील एका कारखान्यात काम करतो. परंतु, अर्धा पगार दिला जात आहे. त्यात कारखानाही बंद असल्याने सावकाराने पुढील महिन्यापासून पगार मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे गावाकडे जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरात काही सुधारणा झाली नाही, त्यामुळे आगामी काळात काय होणार? त्यापेक्षा गावी जाऊन जीव वाचवलेला बरा.

- प्रकाश जाधव, सिंधूनगर.

लॉकडाऊन लागणार आहे. गतवर्षी अचानक लॉकडाऊन लागल्याने गावाकडे जाण्यासाठी अनंत अडचणीचा सामना करावा लागला. यावेळी सर्व सामान घेऊन गावी जाणार आहोत. पुन्हा शहराकडे येणारच नाही. शेतात मिळेल ते काम करून जगू, परंतु या महाकाय बिमारीपासून दूर राहण्यासाठी शहर सोडलेलेच बरे. परिस्थिती सुधारेल, असे वाटत नाही.

- गजेंद्र कदम, श्रीनगर.

उद्योग ७० टक्क्यांवर आले आहेत. त्यात बँकांचे हप्ते, गावी गेलेल्यांपैकी अर्धेच कामगार कर्तव्यावर आले आहेत. त्यात मालाचा उठाव असायला हवा तेवढा नाही. अशा परिस्थितीत उद्योग कसा चालविणार? त्यातच पुन्हा लाॅकडाऊन लागणार असल्याने कामगार धास्तावले आहेत. परिस्थिती कठीण असून प्रत्येकाने आपले संरक्षण करणे गरजेचे आहे. परंतु, यामध्ये सर्वाधिक जास्त उद्योग जगताचे नुकसान होत आहे.

- राजू पारसेवार, उद्योजक.

नोंदणीकृत कामगारांची संख्या कमी असली तर प्रत्यक्षात काम करणारे कामगार, मजूर, हमाल मोठ्या संख्येने आहेत. त्यात परप्रांतीय हमाल, मजुरांचा अधिक समावेश आहे. आजच्या परिस्थितीत प्रत्येकाला आपला जीव वाचविण्याचे पडले आहे. अशा परिस्थितीत कामगारही गावाकडे जाणार हे सहाजिकच आहे. परंतु, त्यामुळे उद्योगांवर मोठा परिणाम होईल.

- हर्षद शहा, उद्योजक.

आमच्याकडे अन्नप्रक्रिया उद्योग आहे. तो सुरूच ठेवावा लागणार; परंतु कामगारांची अडचण येत आहे. कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागतो. गतवर्षी गावी गेलेल्यांपैकी अनेकजण परतले नाहीत. त्यातच पुन्हा लाॅकडाऊनच्या भीतीने अनेकजण स्थलांतरित होण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळे कामगारांअभावी उद्योगास फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- अजयकुमार बाहेती, उद्योजक.

गतवर्षीची आठवण

गतवर्षी अचानक लॉकडाऊन लागल्याने कामगारांना गावी परतण्यासाठी पायपीट करावी लागली होती. त्यात श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या; परंतु अनेकांना कोसाे दूर पायी चालावे लागले होते. पुन्हा लाॅकडाऊन म्हटले की चित्र डोळ्यांसमोर येत आहे.