शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

मोबाइल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST

नांदेड : कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यात रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात ...

नांदेड : कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यात रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली होती; परंतु अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंदच होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मोबाइल विक्रीसह दुरुस्तीची दुकानेही बंद होती. त्यामुळे मोबाइल नादुरुस्त झालेल्यांची मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात घरातच अडकून पडल्याने मोबाइलचा वापर वाढला होता.

त्यातही ऑनलाइन कामकाज आणि शिक्षणही मोबाइलवरच सुरू होते. मोबाइलच नादुरुस्त झाल्याने अनेकांना हात मोडल्यासारखे झाले होते. आजच्या स्पर्धेच्या युगात मोबाइल ही अत्यावश्यक वस्तू झाली आहे. लॉकडाऊनमध्ये घरातच असल्याने नेटचा वापरही वाढला होता. दिवसभर मोबाइलवरच मनोरंजन करण्याशिवाय पर्याय नव्हता. अतिवापरामुळे मोबाइलची बॅटरी खराब होणे, स्क्रीन गार्ड जाणे, स्पिकरमध्ये आवाज स्पष्ट न येणे, यासह पाण्याचा संपर्क आल्यास स्क्रीनवर काहीच न दिसणे, अशा प्रकारच्या अडचणी आल्या होत्या. आता गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा अनलॉक करण्यात आला आहे. त्यामुळे मोबाइल दुरुस्तीसाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. एवढे दिवस दुकान बंद असल्यामुळे ग्राहक अडकून पडले होते. आता गर्दी होत असल्याने मोबाइल शॉपी चालक सकाळी दुकाने लवकर उघडत आहेत.

कारण काय?

n अतिवापर आणि वारंवार चार्ज केल्यामुळे बॅटरी खराब होण्याचे प्रमाण वाढले.

n स्क्रीन गार्ड खराब झाले.

n लहान मुलांनी गेम पाहताना भांडण केल्याने मोबाइल खाली पडला, त्यामुळे त्याची बॉडी बदलणे.

n पाण्याशी संपर्क आल्यामुळे स्क्रीन पूर्णपणे ब्लॅक होणे.

n चार्जिंग पॉइंट खराब होणे.

n मोबाइलमधून स्पष्टपणे आवाज न येणे. यासारखी दुरुस्तीचे कारणे आहेत.