शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

कोरोनाला आम्ही घाबरणारे नाही, आत्महत्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:18 IST

२०१९ मध्ये जिल्ह्यातील १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्या होत्या. मार्च २०२० मध्ये कोरोनाचे संकट देशासमोर उभे राहिले. काही ...

२०१९ मध्ये जिल्ह्यातील १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्या होत्या. मार्च २०२० मध्ये कोरोनाचे संकट देशासमोर उभे राहिले. काही दिवसांतच शहरात पोहोचलेली कोरोना महामारी ही गावागावांत आली. त्यामुळे कोरोनापुढे सर्वच हतबल झाले. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. शहरे ओस पडली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. वर्षभरापासून हे दुष्टचक्र असेच सुरू आहे. २०२१ मध्ये परिस्थिती बदलण्याची अपेक्षा होती. ऐन उन्हाळ्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि सुरू झालेला व्यवहार पुन्हा बंद पडला. त्यामुळे अनेकांनी जीवनयात्रा संपविली. मात्र, या काळात शेतकरी लढत होता. अवकाळी निसर्गासोबतच महामारीला त्याने हिंमतीने तोंड दिले. कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी हिंमतीने कोरोना काळावर मात केली.

चौकट- संकट माझ्या एकट्यावर नाही

- कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला व्यापून टाकले आहे. त्यामुळे या काळात केवळ मीच एकटा अडचणीत नाही, तर सर्वच अडचणीत आहेत, ही सामूहिक भावना तयार झाली. एरवी स्वत:च्या अडचणीत, प्रश्नात अडकलेले अनेकजण कोरोना काळात इतरांच्या दु:खात धावून गेले. त्यामुळे वैयक्तिक सुख, दु:खाची भावनाच गळून पडली. हे एक कारण आत्महत्या घटन्यामागे असू शकते, अशी प्रतिक्रिया मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रामेश्वर बोले यांनी दिली.

- कोरोनाचे संकट म्हणून आत्महत्या

- जिल्ह्यात कोरोनाकाळात वर्षभरात ७७ आत्महत्या झाल्या. शासन, प्रशासनस्तरावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी प्रयत्न होत आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले. गतवर्षभरापासून कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाला. त्यातच ७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.