शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला आम्ही घाबरणारे नाही, आत्महत्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:18 IST

२०१९ मध्ये जिल्ह्यातील १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्या होत्या. मार्च २०२० मध्ये कोरोनाचे संकट देशासमोर उभे राहिले. काही ...

२०१९ मध्ये जिल्ह्यातील १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्या होत्या. मार्च २०२० मध्ये कोरोनाचे संकट देशासमोर उभे राहिले. काही दिवसांतच शहरात पोहोचलेली कोरोना महामारी ही गावागावांत आली. त्यामुळे कोरोनापुढे सर्वच हतबल झाले. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. शहरे ओस पडली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. वर्षभरापासून हे दुष्टचक्र असेच सुरू आहे. २०२१ मध्ये परिस्थिती बदलण्याची अपेक्षा होती. ऐन उन्हाळ्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि सुरू झालेला व्यवहार पुन्हा बंद पडला. त्यामुळे अनेकांनी जीवनयात्रा संपविली. मात्र, या काळात शेतकरी लढत होता. अवकाळी निसर्गासोबतच महामारीला त्याने हिंमतीने तोंड दिले. कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी हिंमतीने कोरोना काळावर मात केली.

चौकट- संकट माझ्या एकट्यावर नाही

- कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला व्यापून टाकले आहे. त्यामुळे या काळात केवळ मीच एकटा अडचणीत नाही, तर सर्वच अडचणीत आहेत, ही सामूहिक भावना तयार झाली. एरवी स्वत:च्या अडचणीत, प्रश्नात अडकलेले अनेकजण कोरोना काळात इतरांच्या दु:खात धावून गेले. त्यामुळे वैयक्तिक सुख, दु:खाची भावनाच गळून पडली. हे एक कारण आत्महत्या घटन्यामागे असू शकते, अशी प्रतिक्रिया मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रामेश्वर बोले यांनी दिली.

- कोरोनाचे संकट म्हणून आत्महत्या

- जिल्ह्यात कोरोनाकाळात वर्षभरात ७७ आत्महत्या झाल्या. शासन, प्रशासनस्तरावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी प्रयत्न होत आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले. गतवर्षभरापासून कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाला. त्यातच ७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.