शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

भाजीपाला महागला

By admin | Updated: November 6, 2014 13:42 IST

यंदा जिल्हाभरात अत्यल्प पाऊसझाल्यामुळे याचा परिणाम खरिपासह, रबी हंगामात जाणवत आहे.

नांदेड : यंदा जिल्हाभरात अत्यल्प पाऊसझाल्यामुळे याचा परिणाम खरिपासह, रबी हंगामात जाणवत आहे. विहिरी-बोअरची पाणीपातळी खालावत असल्याने महागाईचा फटका भाजी बाजारावर जाणवू लागला आहे. बुधवारच्या आठवडी बाजारात टोमॅटो, कोबी वगळता इतर सर्वच भाज्यांचे दर भडकले होते. 

वाढत्या दरामुळे शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी सर्वसामान्यांना मात्र आर्थिक झळ सोसावी लागत आहे. वाढलेल्या पालेभाज्यांच्या दरामुळे अनेकांनी पिशव्या भरुन भाजीपाला घेणे टाळल्याचे चित्र होते.
गेल्या महिन्यात भाजीपाल्याचे दर आवाक्यात होते, तर दोन महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांना टोमॅटो अक्षरश: रस्त्यावर फेकून द्यावे लागले होते. यानंतर पुन्हा टोमॅटोचे भाव प्रतिकिलो ४0 रुपयांवर पोहोचले होते. तर बुधवारच्या आठवडी बाजारात टोमॅटोला १0 ते १५ रुपये किलो एवढाच दर मिळाला. तर हिरवी मिरची ६0 रुपये किलो, वांगी ४0 रुपये किलो, फूलकोबी ४0 रुपये किलो, पानकोबी ४0 रु.किलो, कोथिंबीर १00 रु.किलो, कांदे २0 रुपये किलो, लसूण ८0 रु.किलो, बटाटे ४0 रु.किलो, ढोबळी मिरची ६0 रु. भेंडी ४0 रु. किलो, कारले ६0 रु.किलो, पालक १0 रु.जुडी, शेवग्याच्या शेंगा ८0 रुपये किलो, गवार ८0 रुपये किलो याप्रमाणे दर होते. यंदाची पावसाची अल्प स्थिती पाहता उन्हाळ्य़ात भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. 
बहुभूधारक व अल्पभूधारक शेतकर्‍यांनी उन्हाळ्य़ातील उपलब्ध विहिरी, बोअरमधील पाण्याची स्थिती लक्षात घेवून केळी, हळद, गव्हाची लागवड न करता कमी दिवसांत येणार्‍या भाजीपाला लागवडीस पसंती दिली. अनेक विहिरी-बोअरमधील पाणीपातळी घटत असल्याने उत्पादक पुन्हा अडचणीत सापडणार असून महागाईचा फटकाही सर्वसामान्यांना बसणार आहे. पावसाअभावी भाजीपाल्याची लागवड केलीच नाही. बाजारात आवक कमी होत असून दरात वाढहोत आहे. (प्रतिनिधी)