शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

भाजीपाला महागला

By admin | Updated: November 6, 2014 13:42 IST

यंदा जिल्हाभरात अत्यल्प पाऊसझाल्यामुळे याचा परिणाम खरिपासह, रबी हंगामात जाणवत आहे.

नांदेड : यंदा जिल्हाभरात अत्यल्प पाऊसझाल्यामुळे याचा परिणाम खरिपासह, रबी हंगामात जाणवत आहे. विहिरी-बोअरची पाणीपातळी खालावत असल्याने महागाईचा फटका भाजी बाजारावर जाणवू लागला आहे. बुधवारच्या आठवडी बाजारात टोमॅटो, कोबी वगळता इतर सर्वच भाज्यांचे दर भडकले होते. 

वाढत्या दरामुळे शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी सर्वसामान्यांना मात्र आर्थिक झळ सोसावी लागत आहे. वाढलेल्या पालेभाज्यांच्या दरामुळे अनेकांनी पिशव्या भरुन भाजीपाला घेणे टाळल्याचे चित्र होते.
गेल्या महिन्यात भाजीपाल्याचे दर आवाक्यात होते, तर दोन महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांना टोमॅटो अक्षरश: रस्त्यावर फेकून द्यावे लागले होते. यानंतर पुन्हा टोमॅटोचे भाव प्रतिकिलो ४0 रुपयांवर पोहोचले होते. तर बुधवारच्या आठवडी बाजारात टोमॅटोला १0 ते १५ रुपये किलो एवढाच दर मिळाला. तर हिरवी मिरची ६0 रुपये किलो, वांगी ४0 रुपये किलो, फूलकोबी ४0 रुपये किलो, पानकोबी ४0 रु.किलो, कोथिंबीर १00 रु.किलो, कांदे २0 रुपये किलो, लसूण ८0 रु.किलो, बटाटे ४0 रु.किलो, ढोबळी मिरची ६0 रु. भेंडी ४0 रु. किलो, कारले ६0 रु.किलो, पालक १0 रु.जुडी, शेवग्याच्या शेंगा ८0 रुपये किलो, गवार ८0 रुपये किलो याप्रमाणे दर होते. यंदाची पावसाची अल्प स्थिती पाहता उन्हाळ्य़ात भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. 
बहुभूधारक व अल्पभूधारक शेतकर्‍यांनी उन्हाळ्य़ातील उपलब्ध विहिरी, बोअरमधील पाण्याची स्थिती लक्षात घेवून केळी, हळद, गव्हाची लागवड न करता कमी दिवसांत येणार्‍या भाजीपाला लागवडीस पसंती दिली. अनेक विहिरी-बोअरमधील पाणीपातळी घटत असल्याने उत्पादक पुन्हा अडचणीत सापडणार असून महागाईचा फटकाही सर्वसामान्यांना बसणार आहे. पावसाअभावी भाजीपाल्याची लागवड केलीच नाही. बाजारात आवक कमी होत असून दरात वाढहोत आहे. (प्रतिनिधी)