शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
3
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
4
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
5
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
7
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
8
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
9
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
11
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
12
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
13
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
14
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
15
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
16
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
17
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
18
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
19
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
20
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाळू घाटांचा तिसऱ्यांदा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:19 IST

जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. दोन वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे. अनेक ठिकाणी ...

जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. दोन वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे. अनेक ठिकाणी जास्तीचे पैसे मोजूनही वाळू मिळत नसल्याने बांधकामाचे नियोजन लांबणीवर पडले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात वाळूमाफियांनी डोके वर काढले असून, मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसा सुरूच आहे. जिल्ह्यात बिहारी, उत्तर प्रदेशातील टोळ्यांच्या मदतीने वाळू उपसा सुरू होता. मात्र, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या परप्रांतीयाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला आहे. त्याचवेळी आता स्थानिक टोळ्याही तयार झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर सक्शन पंपाचा वापर वाळू उपशासाठी करण्यात येत आहे. प्रशासनाच्या कारवाईत आतापर्यंत १० सक्शन पंप जप्त करण्यात आले आहेत. तरीही कारवाई केलेल्या ठिकाणांवर पुन्हा अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. त्यामुळे वाळूमाफिया या कारवाईला किती प्रमाणात जुमानतात ते स्पष्ट होत आहे.

जिल्हा प्रशासनाला आता तिसऱ्या ई-लिलाव फेरीत हे घाट जाण्याची अपेक्षा असली तरीही लिलाव प्रक्रियेतील प्रतिब्रास वाळूचा दर पाहता ही अपेक्षा पूर्णत्वास न जाणारीच दिसत आहे. १७ फेब्रुवारी रोजी नेमके चित्र स्पष्ट होणार आहे; पण त्याचवेळी वाळूमाफियांना आवर घालणे हे जिल्हा प्रशासनासह तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनाही मोठे आव्हान ठरणार आहे.