शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

तळेगावात देशमुख परिवारातील भाऊबंदकीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बी. व्ही. चव्हाण उमरी : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे व सर्वाधिक लोकसंख्येच्या तळेगावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बी. व्ही. चव्हाण

उमरी : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे व सर्वाधिक लोकसंख्येच्या तळेगावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने देशमुख परिवारातील भाऊबंदकीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. निवडणुका येतात जातात. मात्र, परिवारातील सख्य संबंध कायम राखले गेले पाहिजेत. किरकोळ कारणांवरून निर्माण झालेली कटुता दीर्घकालीन व पारंपरिक संघर्षात परिवर्तित होऊ शकते. हे टाळण्यासाठी दोन्ही बाजूंनी तेवढेच प्रयत्न होणे आवश्यक आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले गावातील मूळचे रहिवासी ग्रामपंचायतीच्या राजकीय आखाड्यात उतरल्याने या निवडणुकीला आणखी रंग भरला आहे. ही निवडणूक स्थानिक विकासकामांच्या मुद्द्यावर लढविली जावी. ज्यातून आदर्श गावाची संकल्पना जनतेसमोर यावी. नागरी सोयी-सुविधांची पूर्तता व्हावी. हा मुख्य उद्देश असला तरी सध्या मात्र तळेगावात एकाच वाड्यात राहणाऱ्या देशमुख परिवारातील भाऊबंदकीतील वाद पुन्हा प्रचाराच्या भाषणातून जाहीररीत्या पुढे येत आहे. एकेकाळी टंचाईग्रस्त असणारे तळेगाव आजघडीला पाणीपुरवठ्याच्या बाबतीत स्वावलंबी झाले आहे. गेल्या पाच वर्षांत येथील पाणी योजना, ग्रामपंचायत कार्यालयाची अत्याधुनिक इमारत, सभागृहे अशी काही कामे येथे उभी राहिली आहे त्या परिस्थितीत समाधान मानणे कदापि शक्य नाही. यापेक्षाही गावाची प्रगती होण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे. प्रगतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवणे जरूरीचे आहे. १३ जागांसाठी होत असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत ३ अपक्षांसह एकूण २७ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार हे निवृत्त कर्मचारी अथवा त्यांचे नातेवाईक यापैकी आहेत. साडेछत्तीस गावची वतनदारी असलेल्या दुर्मीळ अशा देशमुख परिवारातील ज्योतीताई विक्रम देशमुख व संतोषी सुरेशराव देशमुख या दोघी जाऊबाई वाॅर्ड क्रमांक २ मधून एकमेकींच्या विरोधात रिंगणात आहेत. येणाऱ्या सरपंचपदाच्या आरक्षणात संधी मिळण्याचे दोघींचेही उद्दिष्ट आहे. जाहीर झालेले आरक्षण कायम राहिल्यास हेही तेवढेच सत्य आहे. कुणीही आले तरी सरपंचपद मात्र देशमुखांच्या वाड्यातच जाणार. सर्वसामान्य लोकांना यात काय मिळणार? हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरणारा आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी अधिक संघर्षाच्या भूमिकेत न गेलेलेच बरे ! असाही सल्ला गावातील बुजुर्ग मंडळी तरुणांना देत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात पेटून उठल्याचे चित्र सध्यातरी तळेगावात आहे. प्रचाराच्या कॉर्नर सभांतून ही स्थिती प्रकर्षाने दिसून येत आहे. अगदी याच्या उलट माजी आमदार बापूसाहेब देशमुख-गोरठेकर यांच्या गावात दिसून येते. ११ सदस्यसंख्येच्या गोरठा ग्रा. पं. निवडणूक आखाड्यात एका अपक्षांसह एकूण २३ उमेदवार आहेत. गोरठेकरांनी आपल्या परिवारातील एकाही सदस्याला या निवडणुकीत उतरविले नाही. सुरुवातीला असे प्रयत्न करणाऱ्यांना त्यांनी साफ फटकारले. उलटपक्षी गावातील सर्वसामान्य परिवारातील जातनिहाय एकेकाला उमेदवारीची संधी दिली. यातून परिवारवाद व एकाधिकारशाही संपुष्टात आली. हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच गेल्या तीन टर्मपासून ही परंपरा जोपासली जात आहे म्हणून ग्रा. पं. निवडणुकीच्या निमित्ताने येथील वाद-विवाद, भांडणे पूर्णतः बाजूला सारण्यात नेते यशस्वी ठरले आहेत. गोरठा गावात कसलीच सभा नाही, बैठक नाही. उमेदवार व मतदार आपापल्या व्यक्तिगत कामांमध्ये व्यस्त आहेत. हे विशेष होय. उमरी तालुक्यातील गोरठेकरांचे नेतृत्व मानणाऱ्यांनी निदानपक्षी गोरठा पॅटर्नचा आदर्श आता प्रचारात तरी अंमलात आणावा, असे अपेक्षित आहे.