शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

अक्कलकोट येथील स्वामींच्या पादुका स्वामी समर्थ मंदिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:20 IST

विष्णूपुरी मूलभूत सुविधांचा अभाव नांदेड- विष्णूपुरी येथील नवी आबादी भागातील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रिपब्लिकन ...

विष्णूपुरी मूलभूत सुविधांचा अभाव

नांदेड- विष्णूपुरी येथील नवी आबादी भागातील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. या वसाहतीत बहुतांश मजूर वर्ग राहतो. या नागरिकांना आतापर्यंत घरकुल, पाणी, लाईट, रस्ते, नाली या मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. निवेदनावर नाथा कांबळे, दयानंद गायकवाड, सूर्यकांत चौंदते, वंदनाबाई जाधव, नामदेव बुद्धे, गयाबाई चव्हाण, सरस्वतीबाई बारसे, आदींच्या सह्या आहेत.

ऑटोचालकांचा बेशिस्तपणा वाढला

नांदेड- शहरातील मुख्य रस्त्यावर काही ऑटोचालकांच्या बेशिस्तपणाचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. अनेकदा ऑटोचालक आपले वाहन रस्त्याच्या मध्यभागी अचानक उभे करून प्रवाशांना घेत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन किरकोळ अपघात होत आहेत. कलामंदिर परिसर, श्रीनगर, वर्कशॉप, तरोडा नाका, आदी भागात ऑटोचालकांच्या बेशिस्तपणामुळे इतर वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

सिडकोतील पथदिवे बंद

नांदेड- महापालिका हद्दीत असलेल्या सिडकाे, हडको परिसरातील अनेक पथदिवे बंद असल्याने या भागात आंधाराचे साम्राज्य आहे. या अंधाराचा फायदा घेऊन भुरटे चोर सक्रिय झाले आहेत. रात्रीच्या वेळेस या मार्गाहून नागरिकांना ये- जा करणे भीतीदायक बनले आहे. मनपा प्रशासनाने पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शिवशाहीचा प्रवास विनामूल्य

नांदेड- अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वसाधारण व निमआराम बसेसबरोबरच शिवशाही बसने विनामूल्य प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. महाव्यवस्थापक यांनी विभाग नियंत्रकांना १३ जानेवारी रोजी एका पत्रान्वये कळविले आहे. शिवशाही बसमधून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना विनामूल्य प्रवासाची सवलत देण्यात येत नाही, अशा तक्रारी राज्य परिवहन महामंडळाकडे प्राप्त झाल्या होत्या.

ड्रेनेज दुरुस्तीची असर्जन परिसरात मागणी

नांदेड- असर्जन परिसरातील क्रांतिनगर, जयभवानीनगर, जयप्रकाशनगर भागात अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवा सुविधांचा अभाव आहे. या भागातील ड्रेनेज दुरुस्ती, पाणी, नाल्या, पथदिवे, आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर आकाश चव्हाण, नेमीचंद भोकरे, शुभम गुरडे, धम्मपाल गोवंदे, शिवाजी गोडबोले, दिलीप वैद्य, शंकर उबाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.