शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

अक्कलकोट येथील स्वामींच्या पादुका स्वामी समर्थ मंदिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:20 IST

विष्णूपुरी मूलभूत सुविधांचा अभाव नांदेड- विष्णूपुरी येथील नवी आबादी भागातील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रिपब्लिकन ...

विष्णूपुरी मूलभूत सुविधांचा अभाव

नांदेड- विष्णूपुरी येथील नवी आबादी भागातील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. या वसाहतीत बहुतांश मजूर वर्ग राहतो. या नागरिकांना आतापर्यंत घरकुल, पाणी, लाईट, रस्ते, नाली या मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. निवेदनावर नाथा कांबळे, दयानंद गायकवाड, सूर्यकांत चौंदते, वंदनाबाई जाधव, नामदेव बुद्धे, गयाबाई चव्हाण, सरस्वतीबाई बारसे, आदींच्या सह्या आहेत.

ऑटोचालकांचा बेशिस्तपणा वाढला

नांदेड- शहरातील मुख्य रस्त्यावर काही ऑटोचालकांच्या बेशिस्तपणाचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. अनेकदा ऑटोचालक आपले वाहन रस्त्याच्या मध्यभागी अचानक उभे करून प्रवाशांना घेत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन किरकोळ अपघात होत आहेत. कलामंदिर परिसर, श्रीनगर, वर्कशॉप, तरोडा नाका, आदी भागात ऑटोचालकांच्या बेशिस्तपणामुळे इतर वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

सिडकोतील पथदिवे बंद

नांदेड- महापालिका हद्दीत असलेल्या सिडकाे, हडको परिसरातील अनेक पथदिवे बंद असल्याने या भागात आंधाराचे साम्राज्य आहे. या अंधाराचा फायदा घेऊन भुरटे चोर सक्रिय झाले आहेत. रात्रीच्या वेळेस या मार्गाहून नागरिकांना ये- जा करणे भीतीदायक बनले आहे. मनपा प्रशासनाने पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शिवशाहीचा प्रवास विनामूल्य

नांदेड- अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वसाधारण व निमआराम बसेसबरोबरच शिवशाही बसने विनामूल्य प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. महाव्यवस्थापक यांनी विभाग नियंत्रकांना १३ जानेवारी रोजी एका पत्रान्वये कळविले आहे. शिवशाही बसमधून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना विनामूल्य प्रवासाची सवलत देण्यात येत नाही, अशा तक्रारी राज्य परिवहन महामंडळाकडे प्राप्त झाल्या होत्या.

ड्रेनेज दुरुस्तीची असर्जन परिसरात मागणी

नांदेड- असर्जन परिसरातील क्रांतिनगर, जयभवानीनगर, जयप्रकाशनगर भागात अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवा सुविधांचा अभाव आहे. या भागातील ड्रेनेज दुरुस्ती, पाणी, नाल्या, पथदिवे, आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर आकाश चव्हाण, नेमीचंद भोकरे, शुभम गुरडे, धम्मपाल गोवंदे, शिवाजी गोडबोले, दिलीप वैद्य, शंकर उबाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.